शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणच्या उच्चभ्रू वसाहतींमध्येही पाण्याचा ठणठणाट, रहिवासी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:23 IST

येथील पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील काही गृहसंकुलांना गेल्या महिनाभरापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने येथील रहिवासी पाणीटंचाईने त्रस्त आहेत.

कल्याण : येथील पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील काही गृहसंकुलांना गेल्या महिनाभरापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने येथील रहिवासी पाणीटंचाईने त्रस्त आहेत. पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने, काही संकुलांमध्ये बोअरवेलच्या पाण्याचा आधार घेतला जात आहे. पण त्या पाण्याच्या वापरलाही मर्यादा असल्याने पुरेसे पाणी रहिवाशांना मिळत नाही.बारवी आणि आंध्र धरणांतील झपाट्याने कमी होत असलेला पाणीसाठा पाहता, लघुपाटबंधारे विभागाने ठाणे जिल्ह्यातील सर्वच प्राधिकरणांना एका आठवड्यात ३० तास पाणीकपातीचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने केडीएमसीकडून प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याबरोबरच १ जानेवारीपासून महिन्याच्या चौथ्या शनिवारीसुध्दा पाणी बंद ठेवले जात आहे. धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन १५ जुलैपर्यंत करण्यासाठी कल्याण डोंबिवलीत आधीपासूनच २२ टक्के पाणीकपात लागू केली होती. तेव्हा मंगळवारी पाणी पुरवठा बंद असायचा; परंतू नव्याने जारी केलेल्या आदेशानुसार ही कपात सहा तासांनी वाढविण्यात आल्याने आता चौथ्या शनिवारीही पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे.दरम्यान, कपातीसाठी मंगळवार आणि महिन्यातील चौथा शनिवार पाणीपुरवठा बंद ठेवल्यानंतरही त्याच्या दुसऱ्या दिवशी पुरेशा दाबाने पाणी येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. त्यात पाणी येण्याची वेळ ठराविक नसल्याने पाणी कधी येते आणि जाते याचाही थांगपत्ता लागत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कल्याण पश्चिमेकडील छोट्या चाळी आणि इमारतींबरोबरच मोठमोठया गृहसंकुलांनाही पाणीटंचाईची झळ बसत आहे. न्यू कल्याण तसेच उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळख असलेल्या खडकपाड्यामध्ये ७० ते ८० गृहसंकुले आहेत. यातील काही गृहसंकुलांना गेल्या महिनाभरापासून कमी दाबाने पाणी येत आहे. साधारण ७० टक्के रहिवाशांना पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. प्रामुख्याने आर. जे. कॉम्प्लेक्स, स्प्रिंग, ब्रम्हांड या गृहसंकुलांसह आजुबाजुच्या परिसरात ही समस्या जाणवत आहे. प्रारंभी ५ ते ६ तास मुबलक पाणी मिळायचे; परंतू आता केवळ दोन तासच पाणी उपलब्ध होत आहे.आर. जे. कॉम्प्लेक्स, स्प्रिंग, ब्रम्हांड या गृहसंकुलांमध्ये पाणी कमी दाबाने येत असल्याने तळमजल्यावरील पाण्याच्या टाक्या अर्ध्याच भरतात. ते पाणी घराघरात पोहोचताना अत्यल्प प्रमाणात मिळते. मंगळवार आणि चौथा शनिवार पाणी पुरवठा पूर्ण दिवस बंद ठेवल्यानंतरही अन्य दिवशी कमी दाबाने पाणी मिळते, हे योग्य नाही, अशा भावना रहिवाशांच्या आहेत. दरम्यान, काही संकुलांतील रहिवाशांनी स्थानिक नगरसेवक अर्जुन भोईर यांची भेट घेऊन पाणी टंचाईच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे.काही गृहसंकुलांना कमी दाबाने पाणी मिळते ही वस्तुस्थिती आहे. कपातीनंतरही पाणी पुरेशा प्रमाणात मिळत नाही, अशाही तक्रारी आल्या आहेत. कपात वगळता अन्य दिवशी सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, यासंदर्भात नियोजनासाठी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत.- अर्जुन भोईर, स्थानिक नगरसेवक खडकपाडा

टॅग्स :Waterपाणी