शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

कल्याणच्या उच्चभ्रू वसाहतींमध्येही पाण्याचा ठणठणाट, रहिवासी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:23 IST

येथील पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील काही गृहसंकुलांना गेल्या महिनाभरापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने येथील रहिवासी पाणीटंचाईने त्रस्त आहेत.

कल्याण : येथील पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील काही गृहसंकुलांना गेल्या महिनाभरापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने येथील रहिवासी पाणीटंचाईने त्रस्त आहेत. पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने, काही संकुलांमध्ये बोअरवेलच्या पाण्याचा आधार घेतला जात आहे. पण त्या पाण्याच्या वापरलाही मर्यादा असल्याने पुरेसे पाणी रहिवाशांना मिळत नाही.बारवी आणि आंध्र धरणांतील झपाट्याने कमी होत असलेला पाणीसाठा पाहता, लघुपाटबंधारे विभागाने ठाणे जिल्ह्यातील सर्वच प्राधिकरणांना एका आठवड्यात ३० तास पाणीकपातीचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने केडीएमसीकडून प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याबरोबरच १ जानेवारीपासून महिन्याच्या चौथ्या शनिवारीसुध्दा पाणी बंद ठेवले जात आहे. धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन १५ जुलैपर्यंत करण्यासाठी कल्याण डोंबिवलीत आधीपासूनच २२ टक्के पाणीकपात लागू केली होती. तेव्हा मंगळवारी पाणी पुरवठा बंद असायचा; परंतू नव्याने जारी केलेल्या आदेशानुसार ही कपात सहा तासांनी वाढविण्यात आल्याने आता चौथ्या शनिवारीही पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे.दरम्यान, कपातीसाठी मंगळवार आणि महिन्यातील चौथा शनिवार पाणीपुरवठा बंद ठेवल्यानंतरही त्याच्या दुसऱ्या दिवशी पुरेशा दाबाने पाणी येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. त्यात पाणी येण्याची वेळ ठराविक नसल्याने पाणी कधी येते आणि जाते याचाही थांगपत्ता लागत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कल्याण पश्चिमेकडील छोट्या चाळी आणि इमारतींबरोबरच मोठमोठया गृहसंकुलांनाही पाणीटंचाईची झळ बसत आहे. न्यू कल्याण तसेच उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळख असलेल्या खडकपाड्यामध्ये ७० ते ८० गृहसंकुले आहेत. यातील काही गृहसंकुलांना गेल्या महिनाभरापासून कमी दाबाने पाणी येत आहे. साधारण ७० टक्के रहिवाशांना पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. प्रामुख्याने आर. जे. कॉम्प्लेक्स, स्प्रिंग, ब्रम्हांड या गृहसंकुलांसह आजुबाजुच्या परिसरात ही समस्या जाणवत आहे. प्रारंभी ५ ते ६ तास मुबलक पाणी मिळायचे; परंतू आता केवळ दोन तासच पाणी उपलब्ध होत आहे.आर. जे. कॉम्प्लेक्स, स्प्रिंग, ब्रम्हांड या गृहसंकुलांमध्ये पाणी कमी दाबाने येत असल्याने तळमजल्यावरील पाण्याच्या टाक्या अर्ध्याच भरतात. ते पाणी घराघरात पोहोचताना अत्यल्प प्रमाणात मिळते. मंगळवार आणि चौथा शनिवार पाणी पुरवठा पूर्ण दिवस बंद ठेवल्यानंतरही अन्य दिवशी कमी दाबाने पाणी मिळते, हे योग्य नाही, अशा भावना रहिवाशांच्या आहेत. दरम्यान, काही संकुलांतील रहिवाशांनी स्थानिक नगरसेवक अर्जुन भोईर यांची भेट घेऊन पाणी टंचाईच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे.काही गृहसंकुलांना कमी दाबाने पाणी मिळते ही वस्तुस्थिती आहे. कपातीनंतरही पाणी पुरेशा प्रमाणात मिळत नाही, अशाही तक्रारी आल्या आहेत. कपात वगळता अन्य दिवशी सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, यासंदर्भात नियोजनासाठी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत.- अर्जुन भोईर, स्थानिक नगरसेवक खडकपाडा

टॅग्स :Waterपाणी