शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

हिंमत असेल राजीनामा द्या; तुमच्याविरुद्ध निवडणूक लढतो; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री शिंदेंना ठाण्यातून आव्हान 

By जितेंद्र कालेकर | Updated: February 18, 2024 23:17 IST

अमावस्या आणि पोर्णिमेलाच मुख्यमंत्री शिंदे हे आपल्या गावी शेती करायला जातात. ते चंद्राच्या प्रकाशात कशाची शेती करतात? असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

ठाणे: हिंमत असेल तर राजीनामा द्या, तुमच्याविरुद्ध ठाण्यातून निवडणूक लढतो, असे खुले आव्हानच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रविवारी दिले. ठाण्यातील घाेडबंदर भागात त्यांनी शिवसेना शाखांना भेटी दिल्या. त्यावेळी आपल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

अमावस्या आणि पोर्णिमेलाच मुख्यमंत्री शिंदे हे आपल्या गावी शेती करायला जातात. ते चंद्राच्या प्रकाशात कशाची शेती करतात? असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. त्यांच्या गावी जायला रस्ताही नाही. पण दोन दोन हेलिकॉप्टर्स त्यांच्या शेतात उतरतात. असे हे राज्यातील गरिब शेतकरी असल्याचा मिश्कील टाेलाही त्यांनी लगावला.

यावेळी मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारवर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले राज्यात एकही रोजगार नाही. नवा उद्योग नाही. लहान लहान दुकानांवर नाहक कारवाई केली जाते. पण केंद्र सरकारकडून जीएसटीचा पैसा आणण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. राज्यात असे हे अवकाळी सरकार डोक्यावर बसविले आहे. 

उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली. नगरविकास खात्यासाठी शिंदे मातोश्रीवर रडल्याचीही त्यांनी आठवण करुन दिली. शिंदेना मंत्रालयात मोकळा हात दिला. मात्र, ईडी आणि आयटीमधून वाचण्यासाठीच उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रीया झाल्या त्याच काळात त्यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचा पुनरुच्चारही आदित्य यांनी यावेळी केला. पहिल्या तिकीटापासून ते मंत्री होण्यापर्यंत सर्व काही दिले. तरी पक्ष चोरल्याचा आरोपही त्यांनी केला. ठाण्यात आणि राज्यात गुंड आणि कॉन्ट्रॅक्टर यांचेच पोस्टर दिसतात, असंही ते म्हणाले. या सरकाने हिंमत दाखवली असती तर ठाण्यासह इतर महापालिकांची निवडणूक घेतली असती.

भाजपने २०२२ मध्ये शिवसेना फोडली. २०२३ मध्ये राष्ट्रवादी आणि आता २०२४ मध्ये काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही ते म्हणाले. देश आणि महाराष्ट्र हिताचे आपले हिंदुत्व असून संविधानाच्या संरक्षणासाठी ठाणेकरांनी साथ देण्याचे भावनिक आवाहनही त्यांनी केले. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आपण त्यांच्याविरोधात निवडणूक लढू, असे आव्हानही त्यांनी यावेळी शिंदे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातून दिले.

यावेळी घाेडबंदर रोड, मनोरमानगर भागातील शाखांना त्यांनी भेटी दिल्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील जिजामातानगर येथील उद्धव ठाकरे गटाच्या नविन शाखेचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले. चंदनवाडी शाखेला भेट देऊन खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, माजी नगरसेवक नरेश मणेरा, संतोष शिर्के, प्रदीप पूर्णेकर, अमोल हिंगे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांशी त्यांनी यावेळी चर्चा करुन ठाण्यात शिवसैनिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा आढावा घेतला. यावेळी मोठया प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुरुवातीला कोपरीतील आनंदनगर चेकनाका भागात आदित्य यांचे शिवसैनिकांनी जंगी स्वागत केले. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारण