शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
2
संजय राऊत दोन महिने राहणार सार्वजनिक जीवनापासून दूर, समोर आलं चिंताजनक कारण, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली
3
IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत
4
पुढच्या महिन्यात येतोय फिजिक्सवालाचा आयपीओ, ₹३८२० कोटी उभारणार, काय आहेत अधिक डिटेल्स?
5
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
6
WhatsApp वर येणार Facebook सारखं नवं फीचर; प्रोफाईलवर लावता येणार सुंदर कव्हर फोटो
7
धक्कादायक! रोहित आर्याने उर्मिला कोठारे, गिरीश ओक यांनाही स्टुडिओत बोलवलेलं, मुलांसोबत फोटोही काढले अन्...
8
राज ठाकरेंच्या मनसेचं उद्धवसेनेत विलिनीकरण होणार?; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा, 'तो' फोटो दाखवला
9
"बुलडोजरनं चिरडून 'त्यांना' 'जहन्नुम'मध्ये...", बिहारमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
10
Vastu Tips: खिडकीत, अंगणात पोपटाचे येणे हे तर लक्ष्मी कृपेचे शुभ चिन्ह; पाहा वास्तू संकेत!
11
अपहरणाचा सीन, फिल्म प्रोजेक्ट..., रोहित आर्याने मराठी अभिनेत्रीला केलेला मेसेज; स्क्रीनशॉट दाखवत म्हणाली....
12
महिलांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये लग्न पत्रिका आली, क्लिक करताच फोन हँग झाला अन्...; नव्या सायबर ट्रॅपने उडवली झोप!
13
आता घरबसल्या करा आधार कार्ड अपडेट; 'ई-आधार ॲप' लवकरच लॉन्च, काय-काय बदलता येणार?
14
Deepak Kesarkar : "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?
15
टीम इंडियाचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांची नवी इनिंग; घेतली तेलंगणाच्या मंत्रिपदाची शपथ
16
रोहित आर्यामुळे मुंबई हादरली! यामीच्या सिनेमातील कथेसारखं सेम टू सेम किडनॅपिंग, तुम्ही पाहिलाय का 'तो' चित्रपट?
17
शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा
18
युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का! रशियाच्या 'या' अटी व्हाईट हाऊसला मान्य नाहीत
19
शेतकऱ्यांना 3000 रुपये, पाटण्याजवळ नवं शहर अन्...; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प पत्रात' NDA नं दिली मोठी आश्वासनं
20
'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार...

आजारांवरील संशोधनासाठी पाच जनावरांवर रोज उपचार करण्याची डॉक्टरांना सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 15:29 IST

एका दिवसात कमीत कमी पाच जनावरांवरील उपचार व त्याचा इतंभूत अहवाल एका डॉक्टरास रोज देण्याची सक्त केंद्राच्या पशुसंवर्धन विभागाने केली आहे. यामुळे आता पशुधन डॉक्टराना रोज जनावराना शोधून त्यांच्यावर औषधोपचार करावाच लागणार आहे.

ठळक मुद्दे ग्रामीण, दुर्गम व शहरी जनावरे विविध आजारांनी दगावू नयेजीव घेणे आजार रोखण्यासाठी केंद्र शासनाने रोजदार मोहीमएकाच वेळी उद्भवणाऱ्या प्रादुर्भावावर तज्ज्ञ त्वरीत संशोधन

ठाणे : जनावरांना होणारे जीव घेणे आजार रोखण्यासाठी केंद्र शासनाने रोजदार मोहीम आता घेतली आहे. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या नियंत्रणातील दवाखान्यात रोज कमीत कमी पाच जनावरांवर औषधोपचार करण्याची सक्ती डॉक्टरांना करण्यात आली. एवढेच नव्हे तर उपचार केलेल्या या प्रत्येक जनावराच्या उपचाराची इतंभूत माहितीचा अहवाल त्याच दिवशी केंद्राच्या पशुसंवर्धन विभागाकडे अ‍ॅपव्दारे पाठवण्याची तंबी या डॉक्टरांवर केंद्र शासनाने केली आहे.        ग्रामीण, दुर्गम व शहरी जनावरे विविध आजारांनी दगावू नये. आजारास अनुसरून त्यांच्यावर वेळीच औषधी उपचार होणे अपेक्षित आहे. एवढेच नव्हे तर एकाच वेळी उपचार झालेल्या जनावरांच्या आजारांची लक्षणे, त्यावरील उपचार, जनावराचे व मालकाचे आणि गावाचे नाव इत्यादी माहितीचा अहवाल या डॉक्टरांना अ‍ॅपव्दारे रोज केंद्र शासनास आता द्यावा लागणार आहे. एका दिवसात कमीत कमी पाच जनावरांवरील उपचार व त्याचा इतंभूत अहवाल एका डॉक्टरास रोज देण्याची सक्त केंद्राच्या पशुसंवर्धन विभागाने केली आहे. यामुळे आता पशुधन डॉक्टराना रोज जनावराना शोधून त्यांच्यावर औषधोपचार करावाच लागणार आहे. या सक्तीमुळे या डॉक्टरांची पॅक्टीसची गती वाढून त्यात दैनंदिन सक्रियता वाढीस लागणार आहे.प्रत्येक दिवशी देशभरातील डॉक्टरांनी पाच जनावरांवर आजारांच्या लक्षणास अनुसरून केलेला उपचारांवर केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागातील तज्ज्ञांव्दारे संशोधन केले जाईल. संबंधीत परिसरातील जनावरांनाच्या आजारांचे समान लक्षण दिसून आल्यास केंद्राच्या तज्ञांव्दारे संबंधीत डॉक्टरांना औषधोपचार करण्यचे मार्गदर्शन होईल. एवढेच नव्हे तर कोणत्या कालावधीत, हवामानात जनावरांना कोणत्या आजारास तोंड द्यावे लागते, देशाच्या वेगवेगळ्या भागातील जनावरांवर कोणत्या आजरांचा प्रादुर्भाव होतो. एकाच वेळी उद्भवणाऱ्या प्रादुर्भावावर तज्ज्ञ त्वरीत संशोधन करून त्यावरील उपाययोजनांचे सखोल मार्गदर्शन डॉक्टरांना देखील करणार आहे. यानंतर सभोतालचे जनावरे या आजारास बळी पडू नये, त्यासाठी वेळीच उपाययोजना, सखोल मार्गदर्शनही या पशूधन डॉक्टरांना केंद्राकडून अ‍ॅपव्दारे मिळणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे उपसंचालक विजय धुमाळ व ठाणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे डॉ. लक्ष्मण पवार यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :thaneठाणेAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार