शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

भिवंडीत वीटभट्टीवरील ११ वेठबिगार मजुरांची सुटका!

By नितीन पंडित | Updated: December 27, 2023 18:43 IST

श्रमजीवीचे विवेक पंडित यांचा पुढाकार .

भिवंडी: तालुक्यातील चिंबीपाडा परिसरात वीटभट्टी मालकाने आदिवासी मजुरांना आपल्या वीटभट्टीवर विठबिगरी म्हणून ठेऊन त्यांची आर्थिक पिळवणूक केल्याचा प्रकार श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी उघडकीस आणला असून याप्रकरणी वीटभट्टी मालकाविरोधात भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंबिपाडा येथे सिद्दीकी शेख यांची वीटभट्टी असून त्या ठिकाणी मंजू संतोष पवार तिचा पती संतोष पवार,मुलगा संदीप,सुनील व वडील लक्ष्मण सवरा हे मागील ८ वर्षां पासून वीटभट्टीवर मजुरी करीत आहेत.त्यासाठी ५ हजार रुपये बयाणा देऊन कामावर घेऊन गेला.त्यांनतर आठवड्याला फक्त ८०० रुपये इतका कमी मोबदला देऊन राबवून घेत होता.तर इतरत्र कामावर जाण्यास वीटभट्टी मालकाला सांगितल्यावर तुमचे पैसे अजून फिटले नाहीत असे धमकावून काम करून घेत असताना त्यांना मारहाण व शिवीगाळ सुद्धा करीत असे.

याबाबत मंजू संतोष पवार हिने गावातील श्रमजीवी संघटनेच्या अलका भोईर यांना माहिती दिली.त्यांनतर संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर, जिल्हाध्यक्ष अशोक सापटे यांना दिली. त्यांनी संस्थापक विवेक पंडित यांना याबाबत कल्पना देताच पंडितांनी मंगळवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास वीटभट्टीवर धाव घेत पाहणी केली. त्या ठिकाणी मंजू संतोष पवार हिच्यासह मंजी लक्ष्मण सवरा वय ३५ गंजाड ता.डहाणू,सुनिता लक्ष्मण वाघे वय ३५ धावड पाडा वज्रेश्वरी ता.भिवंडी,संगीता सदू नडगा वय ४२ जामसर जव्हार,नामदेव अर्जुन वाघे वय ६५ ब्रह्मण पाडा,मनीषा झिपर सवरा वय ५५ टेंभवली ,सविता पारधी वय ३५ नानिवली ता.पालघर,सुनिता सुकऱ्या घाटाळ वय ४५ बोईसर,दिपाली सुरेश पवार वय ३० दलेपाडा पडघा,मंदा रमेश हडळ वय ४०  डहाणू,लक्ष्मी झिपर सवरा वय १५ शिलोत्तर,सुनील संतोष भोई वय १८ चाविंद्रा हे वेठबिगार म्हणून काम करीत असल्याचे आढळून आले. 

याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात मंजू संतोष पवार यांनी दिलेल्या तक्रारी वरून वीटभट्टी मालक सिद्दीकी शेख याच्याविरोधात अट्रोसिटी सह विठबिगरी कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून विवेक पंडित यांनी तहसीलदार अधिक पाटील यांची भेट घेऊन त्यांना तात्काळ वेठबिगार मुक्तीचे प्रमाणपत्र दिले आहेत.पोलिस फरार वीटभट्टी मालकाचा शोध घेत आहेत.

देशाला स्वतंत्र मिळून ७६ वर्षे झाली तरीही मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आदिवासी कातकरी समाजातील मजुरांची पिळवणूक होत आहे हे दुर्दैवी असून अशा मालकांविरोधात कठोर कारवाई करून या मजुरांचे पुनर्वसन करण्याची मागणी विवेक पंडित यांनी केली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी