शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रांच्या आधारे ‘रेरा’चे प्रमाणपत्र, उच्च न्यायालयात याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 16:07 IST

रेरा कायदा हा महाराष्ट्रात २०१६ साली आला. त्यांची अंमलबजावणी २०१७ रोजी सुरु झाली. वास्तविशारद पाटील यांचा बांधकाम व्यवसायाशी संबंध असल्याने त्यांना एक प्रकरणात असे दिसून आले की

ठळक मुद्देरेरा कायदा हा महाराष्ट्रात २०१६ साली आला. त्यांची अंमलबजावणी २०१७ रोजी सुरु झाली. वास्तविशारद पाटील यांचा बांधकाम व्यवसायाशी संबंध असल्याने त्यांना एक प्रकरणात असे दिसून आले की

कल्याण- घर घेताना ग्राहकांची फसवणूक होऊ नये, यासाठी राज्य सरकारने रेरा कायद्यान्वये प्रमाणपत्र असण्याची सक्ती केली. मात्र काही बिल्डर महापालिकेत बनावट कागदपत्रंच्या आधारे परवानगी मिळविल्याचे भासवून रेराचे प्रमाण पत्र मिळवित आहे. सरकार व ग्राहकांची फसवणूक थांबविण्याची मागणी करणारी याचिका कल्याणचे वास्तूविशारद संदीप पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

रेरा कायदा हा महाराष्ट्रात २०१६ साली आला. त्यांची अंमलबजावणी २०१७ रोजी सुरु झाली. वास्तविशारद पाटील यांचा बांधकाम व्यवसायाशी संबंध असल्याने त्यांना एक प्रकरणात असे दिसून आले की, एका बिल्डरने रेराचे प्रमाणपत्र घेतल्याचे त्यांच्या प्रकल्पाच्या ठिकाणी नमूद केले आहे. मात्र त्याने महापालिकेतून घेतलेल्या परवानगीचा क्रमांक महापालिकेतून जाऊन तपासला असता त्याठिकाणी महापालिकेच्या नगरविकास खात्याने अशा प्रकारची कोणतीही परवागनी संबंधित बिल्डरला दिलेलीच नाही. हा प्रकार पाटील यांनी माहितीच्या अधिकारात उघड केला. हा प्रकार कल्याण डोंबिवली महापालिकेत घडल्याचे उघड झाले आहे. महापालिकेने परवानगी दिल्याची बनावट कागदपत्रे सादर करुन रेराचे प्रमाणपत्र मिळविले गेले आहे. रेराचे प्रमाणपत्र खरे आणि त्यासाठी सादर केलेली कागदपत्रे बनावट असा हा प्रकार आहे. त्यामुळे पुन्हा राज्य सरकारसह संबंधित प्रकल्पांमध्ये घर घेणा:यांच्या माथी फसवणूकच येणार. ही गंभीर बाब लक्षात घेता पाटील यांनी उच्च न्यायालयात या प्रकरणी दाद मागण्यासाठी याचिका दाखल केली आहे. त्यांच्या वतीने या प्रकरणात वकील प्रसाद भुजबळ हे काम पाहणार आहेत. या याचिकेद्वारे त्यांनी मागणी केली आहे की, रेराने प्रमाण पत्र देण्यापूर्वी बांधकामधारकाच्या कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी. त्याचबरोबर महापालिका व रेरा यांच्या अधिकारी वर्गात सन्वय हवा. तसेच यापूर्वी रेराने दिलेल्या सगळ्य़ा प्रमाणपत्रंची पुनर्तपासणी करण्यात यावी. रेराची अंमलबजावणी करण्यापूर्वी पाटील यांनी काही मुद्यावर राज्याचे तत्कालीन मुख्यमत्र्यांसह सर्व विधानसभा व विधान परिषदेच्या सदस्यांचे लक्ष वेधून काही सूचना केल्या होत्या. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMumbaiमुंबईthaneठाणे