शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
3
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
4
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
5
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
6
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
7
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
8
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
9
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
10
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
11
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
12
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
13
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
14
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
15
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
16
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
17
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
18
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
19
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
20
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

बनावट कागदपत्रांच्या आधारे ‘रेरा’चे प्रमाणपत्र, उच्च न्यायालयात याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 16:07 IST

रेरा कायदा हा महाराष्ट्रात २०१६ साली आला. त्यांची अंमलबजावणी २०१७ रोजी सुरु झाली. वास्तविशारद पाटील यांचा बांधकाम व्यवसायाशी संबंध असल्याने त्यांना एक प्रकरणात असे दिसून आले की

ठळक मुद्देरेरा कायदा हा महाराष्ट्रात २०१६ साली आला. त्यांची अंमलबजावणी २०१७ रोजी सुरु झाली. वास्तविशारद पाटील यांचा बांधकाम व्यवसायाशी संबंध असल्याने त्यांना एक प्रकरणात असे दिसून आले की

कल्याण- घर घेताना ग्राहकांची फसवणूक होऊ नये, यासाठी राज्य सरकारने रेरा कायद्यान्वये प्रमाणपत्र असण्याची सक्ती केली. मात्र काही बिल्डर महापालिकेत बनावट कागदपत्रंच्या आधारे परवानगी मिळविल्याचे भासवून रेराचे प्रमाण पत्र मिळवित आहे. सरकार व ग्राहकांची फसवणूक थांबविण्याची मागणी करणारी याचिका कल्याणचे वास्तूविशारद संदीप पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

रेरा कायदा हा महाराष्ट्रात २०१६ साली आला. त्यांची अंमलबजावणी २०१७ रोजी सुरु झाली. वास्तविशारद पाटील यांचा बांधकाम व्यवसायाशी संबंध असल्याने त्यांना एक प्रकरणात असे दिसून आले की, एका बिल्डरने रेराचे प्रमाणपत्र घेतल्याचे त्यांच्या प्रकल्पाच्या ठिकाणी नमूद केले आहे. मात्र त्याने महापालिकेतून घेतलेल्या परवानगीचा क्रमांक महापालिकेतून जाऊन तपासला असता त्याठिकाणी महापालिकेच्या नगरविकास खात्याने अशा प्रकारची कोणतीही परवागनी संबंधित बिल्डरला दिलेलीच नाही. हा प्रकार पाटील यांनी माहितीच्या अधिकारात उघड केला. हा प्रकार कल्याण डोंबिवली महापालिकेत घडल्याचे उघड झाले आहे. महापालिकेने परवानगी दिल्याची बनावट कागदपत्रे सादर करुन रेराचे प्रमाणपत्र मिळविले गेले आहे. रेराचे प्रमाणपत्र खरे आणि त्यासाठी सादर केलेली कागदपत्रे बनावट असा हा प्रकार आहे. त्यामुळे पुन्हा राज्य सरकारसह संबंधित प्रकल्पांमध्ये घर घेणा:यांच्या माथी फसवणूकच येणार. ही गंभीर बाब लक्षात घेता पाटील यांनी उच्च न्यायालयात या प्रकरणी दाद मागण्यासाठी याचिका दाखल केली आहे. त्यांच्या वतीने या प्रकरणात वकील प्रसाद भुजबळ हे काम पाहणार आहेत. या याचिकेद्वारे त्यांनी मागणी केली आहे की, रेराने प्रमाण पत्र देण्यापूर्वी बांधकामधारकाच्या कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी. त्याचबरोबर महापालिका व रेरा यांच्या अधिकारी वर्गात सन्वय हवा. तसेच यापूर्वी रेराने दिलेल्या सगळ्य़ा प्रमाणपत्रंची पुनर्तपासणी करण्यात यावी. रेराची अंमलबजावणी करण्यापूर्वी पाटील यांनी काही मुद्यावर राज्याचे तत्कालीन मुख्यमत्र्यांसह सर्व विधानसभा व विधान परिषदेच्या सदस्यांचे लक्ष वेधून काही सूचना केल्या होत्या. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMumbaiमुंबईthaneठाणे