शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

रोजगाराअभावी हजारो आदिवासींचे स्थलांतर, कुटुंबकबिल्यासह होणारी भटकंती थांबवण्याची विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 03:12 IST

मुरबाड : शासनाने आदिवासीबांधवांना रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी विविध शासकीय योजना अमलात आणल्या

मुरबाड : शासनाने आदिवासीबांधवांना रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी विविध शासकीय योजना अमलात आणल्या, तरी त्या ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचत नसल्याने त्यांना रोजगारासाठी वणवण भटकंती करावीच लागते. तरीही, रोजगार उपलब्ध होत नसल्याने आपल्या कुटुंबकबिल्यासह रोजगाराच्या शोधात शहरी भागात वीटभट्ट्यांवर जुन्नर, पुणे येथे कांदा, बटाटा लागवडीसाठी ग्रामीण भागातील तांडेच्या तांडे स्थलांतरित होत असल्याचे दिसते. यामुळे शेकडो वाड्या, पाडे ओस पडत आहेत.तालुक्यातील डोंगराळ भागातील आदिवासी वाड्यापाड्यात हजारोंच्या संख्येने आदिवासीबांधव वास्तव्य करतात.या समाजाला पोट भरण्यासाठी कोणतेच साधन नसल्याने तो रानावनात भटकंती करून कंदमुळे, रानमेवा जमा करून तो विकून रोजगाराचे साधन म्हणून आपला उदरनिर्वाह करतो. मात्र, काहींना ते देखील शक्य नसल्याने मोलमजुरी करावी लागते.त्यामुळे शेतीची कामे संपताच तो रोजगारासाठी शहरी भागात वीटभट्ट्यांवर जुन्नर, पुणे येथे कांदा, बटाटा लागवडीसाठी स्थलांतरित होतो.जून महिन्यापर्यंत सुमारे आठ महिने ते तिकडेच राहतात. परत येताना पुढील वर्षाचा बयाना म्हणून आगाऊ रक्कमदेखील अंगावर घेऊनयेतात.त्यामुळे असे स्थलांतर करण्यापेक्षा जर येथेच काही रोजगार उपलब्ध झाला, तर वारंवार कुटुंबकबिल्यासह होणारी भटकंती तरी थांबेल, असे या आदिवासींचे म्हणणे आहे.>पुढारी आमच्या मतांची अपेक्षा करतात. परंतु, आमच्यासाठी आलेल्या योजनांची पारदर्शकरीत्या अंमलबजावणी व्हावी किंवा आमच्या रोजगारासाठी तसेच शैक्षणिक उन्नतीसाठी कोणतेही प्रयत्न न करता आम्हाला राबवून घेतात. रोजगार हमी योजनेतदेखील आमचा उल्लेख मजूर म्हणून केला जातो. रेशनिंगवर आलेल्या धान्यातही आमची दिशाभूल केली जाते. ही सर्व कारणे आमच्या स्थलांतरासाठी कारणीभूत आहेत. - एक स्थलांतरित मजूरशासनाच्या रोजगार हमी योजनेंतर्गत वन विभाग, कृषी विभाग आणि स्थानिक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणारी विविध कामे यावर मजूर मिळवण्यासाठी स्थानिक मजुरांची नोंदणी केली जाते. ज्या मजुरांना कामाची आवश्यकता असते, त्यांनी संबंधित यंत्रणेकडे कामाची मागणी केल्यास त्यांना १५ दिवसांत रोजगार उपलब्ध झाला नाही, तर त्यांना शासनाकडून बेकारभत्ता दिला जातो. परंतु, त्यांना रोजगार हमी योजनेतून दररोज मजुरी मिळत नाही. शिवाय, ती मजुरी बाजारभावापेक्षा कमी असल्याने आदिवासी मजूर हा स्थानिक ठिकाणी रोजगार न घेता तो रोख मजुरीच्या आमिषाला बळी पडून इतरत्र स्थलांतरित होतो. - प्रशासकीय अधिकारी,तहसीलदार कार्यालय, मुरबाड