शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

बदलापूरमध्ये सागर इन्व्हेस्टमेंटची पुनरावृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:40 IST

दोन वर्षांपूर्वी बदलापुरातील बहुचर्चित सागर इन्व्हेस्टमेंटमध्ये शेकडो गुंतवणूकदारांची लाखोंची फसवणूक झाली होती. हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा बदलापूरमध्ये नवा घोटाळा समोर आला आहे.

अंबरनाथ : दोन वर्षांपूर्वी बदलापुरातील बहुचर्चित सागर इन्व्हेस्टमेंटमध्ये शेकडो गुंतवणूकदारांची लाखोंची फसवणूक झाली होती. हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा बदलापूरमध्ये नवा घोटाळा समोर आला आहे. मुंबादेवी फंडाच्या माध्यमातून नागरिकांना जास्त व्याज देण्याच्या आमिषावर ही फसवणूक करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार ५८ नागरिकांची मिळून एकूण एक कोटी ६५ लाखांची फसवणूक झाली आहे. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.बदलापूरमधील सागर इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या माध्यमातून सुहास समुद्र आणि त्यांचा मुलगा श्रीराम यांनी बदलापुरातच नव्हे, तर ठाणे आणि पुणे जिल्ह्यांतील गुंतवणूकदारांचे कोट्यवधी लंपास केले. जास्त व्याजदराच्या आमिषाला बळी पडून शेकडो गुंतवणूकदारांनी या योजनेत गुंतवणूक केली होती. अखेर, हा घोटाळा उघड झाल्यावर अनेकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले. अखेर, याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हाही दाखल झाला. अटकसत्र झाल्यावर आजही गुंतवणूकदार न्यायालयात न्याय मिळण्याची प्रतीक्षा करत आहे.बदलापूरमध्ये या प्रकरणाची सर्वत्र चर्चा झालेली असतानाही पुन्हा सागर इन्व्हेस्टमेंटसारखाच प्रकार घडला आहे. बदलापूरच्या संभाजीनगर भागात राहणारे प्रदीप दिनकर कंदलकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी सविता देशमुख आणि दत्तात्रेय देशमुख यांनी जास्त व्याजाचे आमिष दाखवत कंदलकर यांच्याकडून विशिष्ट रक्कम ठेव म्हणून घेतली. त्याचे व्याजही वेळेवर दिले. वेळेत व्याज मिळत असल्याने कंदलकर यांनी आणखी जास्त रक्कम या मुंबादेवी फंडात गुंतवली. १२ लाख ६८ हजार रुपये त्यांनी बँकेतून आरोपीच्या खात्यात टाकले. तर, उर्वरित २३ लाख ३२ हजार रुपये रोख स्वरूपात गुंतवणूक करण्यास भाग पाडले. व्याज मिळणार या आशेवर त्यांनी ही रक्कम दिली. मात्र, महिनाभरानंतर त्यांना व्याजाची रक्कम मिळत नसल्याने त्यांनी आरोपींकडे आपले पैसे परत देण्याची मागणी केली. पैशांच्या मोबदल्यात आरोपी देशमुख यांनी त्यांची चारचाकी गाडी त्यांच्या नावावर करून देण्याचे मान्य केले. मात्र, ती गाडीही दिली नाही. अखेर, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कंदलकर यांनी बदलापूर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणात कंदलकर हे एकमेव गुंतवणूकदार नसून देशमुख यांच्याविरोधात बदलापुरातील ५८ गुंतवणूकदारांनी फसवणुकीची तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी फसवणुकीचा आकडा हा एक कोटी ६५ लाखांच्या घरात असल्याचे स्पष्ट केले आहे.प्राथमिक तपासात ५८ जणांचे तक्रार अर्ज आले आहेत. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणखी कुणाची या प्रकरणात तक्रार असेल, तर त्यांनी बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी. याप्रकरणी किती जणांची फसवणूक झाली आहे, याचा तपास सुरू आहे.- लक्ष्मण सारिपुत्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी