शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

पुलाच्या दुरुस्तीचे काम लष्कराकडे सोपवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 23:45 IST

पूर्व-पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल सोमवारपासून बंद करण्याच्या सूचना मध्य रेल्वे प्रशासनाने दिल्या होत्या.

डोंबिवली : पूर्व-पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल सोमवारपासून बंद करण्याच्या सूचना मध्य रेल्वे प्रशासनाने दिल्या होत्या. मात्र, केडीएमसीच्या अधिकाऱ्यांचा कानाडोळा आणि सत्ताधाऱ्यांचा चालढकलपणा यामुळे पुलाच्या दुरुस्तीकडे कानाडोळा होत आहे. याला जबाबदार कोण, असा सवाल करून दुरुस्तीचे काम सैन्यदलाकडे देण्यात यावे, अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे.मनसेचे शहरप्रमुख राजेश कदम, जिल्हा संघटक हर्षद पाटील, गटनेते मंदार हळबे, प्रल्हाद म्हात्रे, युवा संघटक सागर जेधे, सुदेश चुडनाईक आदींनी सोमवारी डोंबिवली मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी सैन्यदलाला काम द्यावे, ही मागणी पुढे आली.आपत्कालीन स्थितीमध्ये विशेष तरतूद या नियमान्वये तुम्ही टेंडर न काढता काम करण्याची आवश्यकता आहे, पण तसे झालेले नाही. टेंडर काढण्यात कोणाला स्वारस्य आहे, असा सवालही हळबे यांनी केला.त्यामुळे आता मनसे स्टाइलने अधिकाºयांच्या केबिनमध्ये जाऊन आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. दोन दिवसांमध्ये कामासंदर्भात हालचाली न झाल्यास मनसे काय पवित्रा घेते, हेही स्पष्ट होणार असल्याचे प्रल्हाद म्हात्रे म्हणाले. ठाकुर्लीचा उड्डाणपूल हा पूर्ण क्षमतेचा नाही, तर त्याचे काम करतानाच तो चांगल्या क्षमतेचा का केला नाही, असा सवालही म्हात्रेंनी केला.>‘जबाबदारी कोणाची?’सध्या महापालिका महापौर विनीता राणे चालवत आहेत की, स्थायी समितीचे सभापती दीपेश म्हात्रे, असा सवाल हर्षद पाटील यांनी केला.उड्डाणपुलासंदर्भात २० मे रोजी रेल्वेने पालिकेला पत्र दिले. ते मिळाल्यापासून एक बैठक झाली. त्यातून गोंधळ आणखी वाढला आहे. त्यामुळे याबाबत जबाबदारी कोणाची, हे स्पष्ट करावे, असे ते म्हणाले.