शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

पुलाच्या दुरुस्तीचे काम लष्कराकडे सोपवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 23:45 IST

पूर्व-पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल सोमवारपासून बंद करण्याच्या सूचना मध्य रेल्वे प्रशासनाने दिल्या होत्या.

डोंबिवली : पूर्व-पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल सोमवारपासून बंद करण्याच्या सूचना मध्य रेल्वे प्रशासनाने दिल्या होत्या. मात्र, केडीएमसीच्या अधिकाऱ्यांचा कानाडोळा आणि सत्ताधाऱ्यांचा चालढकलपणा यामुळे पुलाच्या दुरुस्तीकडे कानाडोळा होत आहे. याला जबाबदार कोण, असा सवाल करून दुरुस्तीचे काम सैन्यदलाकडे देण्यात यावे, अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे.मनसेचे शहरप्रमुख राजेश कदम, जिल्हा संघटक हर्षद पाटील, गटनेते मंदार हळबे, प्रल्हाद म्हात्रे, युवा संघटक सागर जेधे, सुदेश चुडनाईक आदींनी सोमवारी डोंबिवली मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी सैन्यदलाला काम द्यावे, ही मागणी पुढे आली.आपत्कालीन स्थितीमध्ये विशेष तरतूद या नियमान्वये तुम्ही टेंडर न काढता काम करण्याची आवश्यकता आहे, पण तसे झालेले नाही. टेंडर काढण्यात कोणाला स्वारस्य आहे, असा सवालही हळबे यांनी केला.त्यामुळे आता मनसे स्टाइलने अधिकाºयांच्या केबिनमध्ये जाऊन आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. दोन दिवसांमध्ये कामासंदर्भात हालचाली न झाल्यास मनसे काय पवित्रा घेते, हेही स्पष्ट होणार असल्याचे प्रल्हाद म्हात्रे म्हणाले. ठाकुर्लीचा उड्डाणपूल हा पूर्ण क्षमतेचा नाही, तर त्याचे काम करतानाच तो चांगल्या क्षमतेचा का केला नाही, असा सवालही म्हात्रेंनी केला.>‘जबाबदारी कोणाची?’सध्या महापालिका महापौर विनीता राणे चालवत आहेत की, स्थायी समितीचे सभापती दीपेश म्हात्रे, असा सवाल हर्षद पाटील यांनी केला.उड्डाणपुलासंदर्भात २० मे रोजी रेल्वेने पालिकेला पत्र दिले. ते मिळाल्यापासून एक बैठक झाली. त्यातून गोंधळ आणखी वाढला आहे. त्यामुळे याबाबत जबाबदारी कोणाची, हे स्पष्ट करावे, असे ते म्हणाले.