शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

उल्हासनगर समतानगर नाल्याच्या पुलाची दुरुस्ती करा, अन्यथा परिसर होणार जलमय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 20:25 IST

गेल्या वर्षी कुर्ला कॅम्प समतानगर रस्त्यावरील खचलेल्या नाल्याचा पुलाची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी न झाल्यास नाला तुंबून परिसर जलमय होणार असल्याची भीती स्वछता निरीक्षकानें व्यक्त केली.

सदानंद नाईक उल्हासनगर : गेल्या वर्षी कुर्ला कॅम्प समतानगर रस्त्यावरील खचलेल्या नाल्याचा पुलाची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी न झाल्यास नाला तुंबून परिसर जलमय होणार असल्याची भीती स्वछता निरीक्षकानें व्यक्त केली. महापालिका बांधकाम विभाग, उपायुक्त, प्रभाग अधिकारी, महापौर आदींना स्वच्छता निरीक्षकानें पत्र दिल्याने, महापालिकेचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.उल्हासनगर पूर्वेतील कुर्ला कॅम्प ते कैलास कॉलनी रस्त्यावरील समतानगर येथे मुख्य रस्त्याचा पूल व सरंक्षण कठडा गेल्या पावसाळ्यात खचला. याप्रकाराने एकच खळबळ उडून पुलाच्या दुरुस्तीची मागणी स्थानिक नगरसेवकांनी लावून धरली. दरम्यान महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी बंद केली. तसेच लवकरच पुलाची दुरुस्ती केली जाईल. असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात दुसरा पावसाळा तोंडावर आल्यावरही पुलाची दुरुस्ती करण्यात आली नाही. ऐन पावसाळ्यात नाल्यावरील पूल खचल्यास पावसाचे पाणी तुंबून रवींद्रनागर, समतानागर, साईनाथ कॉलनी, तानाजी नगर, वडारपाडा परिसर जलमय होण्याची भीती चक्क महापालिकेच्या स्थानिक स्वच्छता निरीक्षकाने व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे.महापालिकेच्या आयुक्त पदी डॉ राजा दयानिधी यांची नियुक्ती झाली तेंव्हा पासून, महापालिका कारभारात सावळागोंधळ उडाल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे. गेल्या एका वर्षांपासून कुर्ला कॅम्प समतानगर मुख्य रस्त्यावरील खचलेल्या पुलाची दुरुस्ती न झाल्याने, आयुक्तांच्या कारभारावर टीकेची झोळ उठली. तोंडावर आलेल्या पावसाळ्यापूर्वी पुलाची दुरुस्ती न झाल्यास, नाल्याचे पाणी तुंबून परिसर जलमय होण्याची भीती महापालिकेचा स्वच्छता निरीक्षक व्यक्त करीत आहे. तसे झाल्यास शेकडो नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून होत आहे. महापालिका आयुक्तांनी भविष्यातील वित्त व जीवितहानी लक्षात घेऊन, पुलाची दुरुस्ती करा. अशी मागणी वेळोवेळी केल्याची माहिती काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी दिली. तसेच नगरसेविका मीना सोंडे, अंजली साळवे, कविता बागुल, नगरसेवक प्रमोद टाले, राजेश वानखडे आदींनीही यापूर्वीच पुलाच्या दुरुस्तीची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली.तानाजीनगर परिसरात भीतीचे वातावरण कुर्ला कॅम्प ते कैलास कॉलनी मुख्य रस्त्यावरील समतानगर येथील पूल खचल्याने, पावसाळ्यात पाणी तुंबून रवींद्रनगर, तानाजीनगर, वडारपाडा, साईनाथ कॉलनी आदी परिसर जलमय होण्याची भीती स्वच्छता निरीक्षकानें व्यक्त केली. याप्रकाराने पावसाळ्या पूर्वीच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुलाच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे