शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

कळवा-ऐरोली रेल्वेमार्गासह पनवेल स्थानकबाधितांना रेंटलची घरे; ३१९२ घरे राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 07:22 IST

पुनर्वसनाचा अडथळा होणार दूर

नारायण जाधव 

ठाणे : कल्याण-कर्जत-कसाऱ्याच्या प्रवाशांना ठाण्याला न येता लोकलने थेट नवी मुंबईत जाण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कळवा-ऐरोली या मार्गात बाधित होणाºया झोपडीधारकांसह पनवेल रेल्वे स्थानकाच्या विकासात अडथळा ठरणाºया झोपडीधारकांना आपल्या हिश्शाची रेंटलची घरे देण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. यामुळे दोन्हीप्रकल्पांतील बाधितांच्या पुनर्वसनाचा तिढा सुटून त्यांना गती मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

याबाबतच्या धोरणास एमएमआरडीएने आपल्या जुलै महिन्याच्या सभेत मंजुरी दिली आहे. यानुसार, कळवा-ऐरोली या मार्गातील बाधितांसाठी २१००, तर पनवेल रेल्वे स्थानकाच्या बाधितांसाठी १०९२ घरे राखीव ठेवण्यात आली आहेत. या घरांसाठी रेडीरेकनरप्रमाणे दर आकारण्यासही एमएमआरडीएने मान्यता दिली आहे. या निर्णयानुसार कळवा-ऐरोली मार्गातील बाधितांना ठाण्यातच घरे मिळणार आहेत. सध्या यापैकी ठाणे महापालिकेकडे ९२४ घरे शिल्लक आहेत. पनवेल टर्मिनस बाधितांना पनवेलमध्येच सॅन्वो रिसॉर्टमधील १०९२ घरे सिडकोकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत.प्रवाशांना मिळणार दिलासाकळवा-ऐरोली रेल्वेमार्ग एमयूटीपी-३ मध्ये प्रस्तावित केला आहे. यात कळवा येथे मफतलाल कंपनीनजीक उन्नत रेल्वेमार्ग बांधून तो थेट ऐरोलीनजीक ठाणे-वाशी-पनवेल मार्गास जोडण्यात येणार आहे. यामुळे कल्याण-कर्जत-कसाºयाच्या प्रवाशांना ठाणे रेल्वे स्थानक मार्गे नवी मुंबईत न जाता थेट यामार्गे जाता येणार आहे. यामुळे एकीकडे त्यांचा ठाण्याचा वळसा कमी होणार आहे, तर दुसरीकडे ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा ताणही कमी होणार आहे.बाधितांसाठी त्याच महानगरात घरेसध्या एमएमआरडीएच्या धोरणानुसार रेंटलच्या घरांपैकी ५० टक्के सदनिका गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवल्या आहेत. मात्र, यापुढे त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात ती देणे अशक्य आहे. कारण, मुंबई महानगर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात अनेक प्रकल्पांचे काम सुरू आहे. भविष्यातही अनेक प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. यामुळे त्यात बाधित होणाऱ्यांसाठी त्या शहरातच घरे देणे आवश्यक असल्याने रेंटलची घरेवाटपाच्या धोरणात एमएमआरडीएने बदल केला आहे.गिरणी कामगारांच्या घरांचा ताबा म्हाडाकडे देणारगिरणी कामगारांसाठीची घरे एमएमआरडीए आता म्हाडास हस्तांतरित करणार असून त्यांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांसाठी त्यांची सोडत काढणे, प्रथम देकारपत्र देण्यापासून ते सदनिकांचा ताबा देण्याची संपूर्ण प्रक्रिया म्हाडास करावी लागणार आहे. शिवाय, या घरांच्या देखभालीची जबाबदारीही म्हाडावर ढकलण्यात आली आहे.

टॅग्स :railwayरेल्वे