शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कळवा-ऐरोली रेल्वेमार्गासह पनवेल स्थानकबाधितांना रेंटलची घरे; ३१९२ घरे राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 07:22 IST

पुनर्वसनाचा अडथळा होणार दूर

नारायण जाधव 

ठाणे : कल्याण-कर्जत-कसाऱ्याच्या प्रवाशांना ठाण्याला न येता लोकलने थेट नवी मुंबईत जाण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कळवा-ऐरोली या मार्गात बाधित होणाºया झोपडीधारकांसह पनवेल रेल्वे स्थानकाच्या विकासात अडथळा ठरणाºया झोपडीधारकांना आपल्या हिश्शाची रेंटलची घरे देण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. यामुळे दोन्हीप्रकल्पांतील बाधितांच्या पुनर्वसनाचा तिढा सुटून त्यांना गती मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

याबाबतच्या धोरणास एमएमआरडीएने आपल्या जुलै महिन्याच्या सभेत मंजुरी दिली आहे. यानुसार, कळवा-ऐरोली या मार्गातील बाधितांसाठी २१००, तर पनवेल रेल्वे स्थानकाच्या बाधितांसाठी १०९२ घरे राखीव ठेवण्यात आली आहेत. या घरांसाठी रेडीरेकनरप्रमाणे दर आकारण्यासही एमएमआरडीएने मान्यता दिली आहे. या निर्णयानुसार कळवा-ऐरोली मार्गातील बाधितांना ठाण्यातच घरे मिळणार आहेत. सध्या यापैकी ठाणे महापालिकेकडे ९२४ घरे शिल्लक आहेत. पनवेल टर्मिनस बाधितांना पनवेलमध्येच सॅन्वो रिसॉर्टमधील १०९२ घरे सिडकोकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत.प्रवाशांना मिळणार दिलासाकळवा-ऐरोली रेल्वेमार्ग एमयूटीपी-३ मध्ये प्रस्तावित केला आहे. यात कळवा येथे मफतलाल कंपनीनजीक उन्नत रेल्वेमार्ग बांधून तो थेट ऐरोलीनजीक ठाणे-वाशी-पनवेल मार्गास जोडण्यात येणार आहे. यामुळे कल्याण-कर्जत-कसाºयाच्या प्रवाशांना ठाणे रेल्वे स्थानक मार्गे नवी मुंबईत न जाता थेट यामार्गे जाता येणार आहे. यामुळे एकीकडे त्यांचा ठाण्याचा वळसा कमी होणार आहे, तर दुसरीकडे ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा ताणही कमी होणार आहे.बाधितांसाठी त्याच महानगरात घरेसध्या एमएमआरडीएच्या धोरणानुसार रेंटलच्या घरांपैकी ५० टक्के सदनिका गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवल्या आहेत. मात्र, यापुढे त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात ती देणे अशक्य आहे. कारण, मुंबई महानगर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात अनेक प्रकल्पांचे काम सुरू आहे. भविष्यातही अनेक प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. यामुळे त्यात बाधित होणाऱ्यांसाठी त्या शहरातच घरे देणे आवश्यक असल्याने रेंटलची घरेवाटपाच्या धोरणात एमएमआरडीएने बदल केला आहे.गिरणी कामगारांच्या घरांचा ताबा म्हाडाकडे देणारगिरणी कामगारांसाठीची घरे एमएमआरडीए आता म्हाडास हस्तांतरित करणार असून त्यांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांसाठी त्यांची सोडत काढणे, प्रथम देकारपत्र देण्यापासून ते सदनिकांचा ताबा देण्याची संपूर्ण प्रक्रिया म्हाडास करावी लागणार आहे. शिवाय, या घरांच्या देखभालीची जबाबदारीही म्हाडावर ढकलण्यात आली आहे.

टॅग्स :railwayरेल्वे