शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पूर्वीच्या कवितेत धून असल्याने त्या लक्षात राहत- अरूण मैड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 17:20 IST

कवितेमध्ये एक धून असते. ही धून पूर्वी प्रत्येक कवितेत ओतप्रोत भरलेली असायची. त्यामुळे कविता लक्षात राहत होत्या, असे मत प्रा. अरूण मैड यांनी व्यक्त केले. 

डोंबिवली : कवितेमध्ये एक धून असते. ही धून पूर्वी प्रत्येक कवितेत ओतप्रोत भरलेली असायची. त्यामुळे कविता लक्षात राहत होत्या, असे मत प्रा. अरूण मैड यांनी व्यक्त केले.     पु.ल. कट्टा यांच्यातर्फे पाऊसधून या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पाऊस कविता सादर करण्यासाठी आवाहान केले होते. त्याला कवींकडून उदंड प्रतिसाद मिळाला. सुधाकर वसईकर,सीमा झुंझारराव, सुशांत भालेराव, हिमनील बोरसे, महेश देशपांडे, विजय जाधव, विजय पंडित, गिरीष लटके, स्वाती गोडबोले-दामले, वासुदेव सांबरे, लक्ष्मीकांत धुमाळ, अथर्व खांडगे, विष्णु खांजोडे आदी कवींनी सभागृहातील प्रेक्षकांना पावसाच्या भाव विश्वात नेले. प्रत्येक क वीचा आणि कवियत्रीचा पाऊस वेगळा होता. कुणाचा पाऊस प्रेमाला साद घालणारा तर कुणाचा पाऊस आजर्व करणारा होता. कुणाचा पाऊस अवखळ, नाठाळ होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी रमेश आव्हाड होते. तसेच कट्टयाचे संयोजक अजरुन डोमाडे, सारिका घुगे आदी मान्यवर उपस्थित होते.     मैड म्हणाले, ग्रेस खरंतर कुणाला कळलेच नाही असे सांगून त्यांच्या कवितेत गूढता आहे ती जाणवते पण कळत नाही. तिचे वेगवेगळे अर्थ निघतात. शांताबाई शेळके यांची ‘वादळ वार सुटलं गं’ ही कविता म्हणजे कवितेला कशी लय असावी, धून असते याचे उत्तम उदाहरण आहे. पुढच्या काळात कविता मुक्तछंदात लिहीली जाऊ लागली. त्यात दलित कवितेने जोश भरला आणि कवितेचं रूपचं पालटून टाकलं. मात्र पूर्वीच्या कविता लक्षात राहत असत. आताच्या कविता लक्षात राहत नाही, अशी खंत ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.     कवी गिरीष लटके यांनी आपल्या शैलीत कविता सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. विजय पंडित यांनी हिंदी आणि उर्दू कविता उत्कटतेने सादर क रून प्रेक्षकांना भारावून टाकले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहूल डोमाडे यांनी केले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली