शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

उर्वरित लाभार्थ्यांनी तातडीने कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 00:59 IST

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी : ६७ हजार लाभार्थ्यांची माहिती वेबपोर्टलवर

ठाणे : जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील ९५४ गावांमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण होत आली आहे. जिल्ह्यात ६९ हजार २६६ पात्र शेतकरी कुटुंबे असून त्यापैकी ६६ हजार ५३७ शेतकऱ्यांची माहिती एनआयसीच्या पोर्टलवर अपलोड झाली आहे. या कामामुळे जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. ज्यांनी अद्याप माहिती व कागदपत्रे दिली नसतील, अशांनी ती त्वरित उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत कल्याण तालुक्यातील पात्र कुटुंबांची संख्या ७५५६ आहे. अंबरनाथ तालुक्यात ही संख्या ४७३७, तर भिवंडी तालुक्यात पात्र कुटुंबांची संख्या १६१४१ इतकी आहे. शहापूर तालुक्यात पात्र कुटुंबांची संख्या १८ हजार ५८७ इतकी आहे. मुरबाड तालुक्यात पात्र कुटुंबांची संख्या १९५१६ असून ती सर्वाधिक आहे. ठाणे तालुक्यातील पात्र कुटुंबांची संख्या २७२९ आहे. याव्यतिरिक्त अद्यापही कागदपत्रे जमा न केलेल्या आणि ज्यांची जमीन पाच एकरपेक्षा कमी असेल, अशा शेतकरी कुटुंबांनी तसेच जी कुटुंबे स्थलांतरित झाली असतील किंवा ज्या शेतकºयांचा मृत्यू झाला असेल, त्यांच्या कुटुंबीयांनी कागदपत्रे, आधारकार्ड, बँकेचे पासबुक आणि बँकेचा आयएफएस कोड यांच्यासह तातडीने गावचे तलाठी, कृषी सहायक अथवा ग्रामसेवक यांच्याकडे सादर करावीत, असे आवाहन केले आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी