शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

आर्थिक समस्येमुळे तुरुंगात अडकलेल्या १२० न्यायालयीन बंद्यांना विधी सेवा प्राधिकरणाकडून दिलासा 

By सुरेश लोखंडे | Updated: May 8, 2023 18:21 IST

आतापर्यंत १२० न्यायालयीन बंद्यांना या प्रणालीमुळे दिलासा मिळाला आहे.

ठाणे : केवळ आर्थिक अडचणींमुळे अनेक वर्षे तुरुंगात असलेल्या कैद्यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने ठाणे जिल्हा न्यायालयात स्थापन केलेल्या बचाव पक्ष प्रणालीच्या माध्यमातून मोफत विधी सहाय्य मिळवून दिले. त्यामुळे बंद्यांची कैदेतून सुटका झाली आहे. आतापर्यंत १२० न्यायालयीन बंद्यांना या प्रणालीमुळे दिलासा मिळाला, असे या प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील गरीब व्यक्ती, न्यायालयीन बंदी, शिक्षाधीन बंदी, महिला, बालके, कामगार यांना मोफत विधी सहाय्य देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण काम करत आहे. न्यायालयीन बंदी, कारागृहामध्ये दिवसेंदिवस क्षमतेपेक्षा जास्त बंद्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रशासन, कारागृह व पोलीस प्रशासनावर ताण वाढत आहे. बहुतांश बंदी हे केवळ आर्थिक विवंचनेमुळे बचावासाठी विधीज्ञ नेमू शकत नाहीत. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांना तुरूंगात डांबून रहावे लागते हे प्रकर्षाने लक्षात आले. यातून मार्ग काढण्यासाठी न्यायालयीन बंद्यांसह आर्थिकदृष्टया मागासलेल्या व्यक्तींसाठी मोफत व गुणवत्तायुक्त बचाव पक्ष प्रणालीची स्थापण्यात करण्यात आली.

या बचाव पक्ष प्रणालीचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अभय ओक यांच्या हस्ते आभासी पध्दतीने करण्यात आले. ठाणे जिल्ह्यात १३ मार्चपासून ठाणे न्यायालयात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सुर्यवंशी यांचे नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे बचाव प्रणालीचे कामकाज सुरू झाले. त्याव्दारे आतापर्यंत १२० न्यायालयीन बंद्यांना लाभ झाला आहे. यासाठी बचाव पक्ष प्रणालीच्या कामाची सुरुवात ठाणे मध्यवर्ती कारागृहापासून झाली आहे. या प्रक्रियेत ठाणे तुरुंग अधिक्षक हर्षद अहिरराव व सर्व तुरुंग प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळत आहे. या योजनेचा जास्तीत जास्त गरजू कैदी, आरोपींनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालय