शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

अंबरनाथ येथील ‘सूर्योदय’ला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 03:09 IST

अंबरनाथ येथील सूर्योदय सोसायटीमधील सदनिका नियमानुकूल करण्यासाठी सर्वसामान्य सदनिकाधारकांना किमान पाच हजार ते कमाल ५० हजार रुपयांपेक्षा जास्त दंड आकारला जाणार नाही.

अंबरनाथ : अंबरनाथ येथील सूर्योदय सोसायटीमधील सदनिका नियमानुकूल करण्यासाठी सर्वसामान्य सदनिकाधारकांना किमान पाच हजार ते कमाल ५० हजार रुपयांपेक्षा जास्त दंड आकारला जाणार नाही. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोसायटीच्या बैठकीत हा मुद्दा स्पष्ट केल्याने अंबरनाथमधील सर्वाधिक जुन्या आणि मोठ्या सोसायटीचा दीर्घ काळापासून प्रलंबित असलेला भूखंडाचा वाद निकालात निघाल्यासारखा आहे.अंबरनाथ येथील सर्वात जुन्या सूर्योदय सोसायटीमध्ये निवासी प्रयोजनार्थ देण्यात आलेल्या भूखंडाचा शर्तभंग नियमानुकूल करण्यासाठी सूर्योदय सभागृहात एकदिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अंबरनाथचे तहसीलदार जयराज देशमुख, नायब तहसीलदार संभाजी शेलार, सूर्योदय सोसायटीच्या अध्यक्षा शोभा शेट्टी, सरचिटणीस नरेंद्र काळे, माजी नगराध्यक्ष विजय पवार, लीलाधर पाटील, विष्णू पाटील यांच्यासह महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.सोसायटीची जागा वादाच्या भोवºयात सापडल्याने २००५ सालापासून येथील खरेदी विक्र ी व हस्तांतरण प्रक्रि या बंद आहे. त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. सोसायटीच्या सदस्यांनी वारंवार हा प्रश्न शासनदरबारी मांडला. याबाबत विधानसभेमध्येही मुद्दा उपस्थित झाला होता. या प्रश्नावर शासनदरबारी अनेक बैठकाही घेण्यात आल्या. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबितच होता. सततच्या पाठपुराव्यानंतर या सोसायटीतील सदनिका नियमानुकूल करण्याचा निर्णय झाल्यानंतर, त्यासाठी दंड आकारणी किती केली जाणार आहे, याबाबत संभ्रम होता. सोसायटीतील रहिवाशांचे गैरसमज दूर करण्यासाठी शिबिराचे आयोजन केल्याचे आमदार किणीकर म्हणाले.अधिकाºयांनी केले रहिवाशांचे गैरसमज दूरसदनिका नियमानुकूल करताना लाखो रु पये भरावे लागतील, असा गैरसमज निर्माण झाला होता. हा गैरसमज यावेळी अधिकाºयांच्या समक्ष दूर करण्यात आला. नायब तहसीलदार संभाजी शेलार यांनी सदनिकांना कसा व किती दंड आकारला जाईल, हे आकडेवारीसह समजावून सांगितले.त्यानुसार रहिवाशांना किमान पाच हजार तर कमाल ५0 हजार रुपये दंड आकारला जाणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितल्यानंतर सोसायटीतील रहिवाशांचे समाधान झाले.शेवटच्या सदनिकाधारकाला न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचे प्रतिपादन स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी केल्याने सूर्योदय सोसायटीच्या रहिवाशांना दिलासा मिळाला आहे

टॅग्स :thaneठाणे