शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
4
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
5
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
6
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
7
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
8
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
9
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
10
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
12
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
13
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
14
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
15
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
16
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
17
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
18
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
19
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
20
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?

हलके झाले दप्तरांचे ओझे!

By admin | Updated: December 21, 2015 01:20 IST

राज्य सरकारच्या शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी उच्च न्यायालयाने ‘डेडलाईन’ दिली होती.

राज्य सरकारच्या शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी उच्च न्यायालयाने ‘डेडलाईन’ दिली होती. ती संपली तरी त्यावर ठोस कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. मात्र काही शाळांनी हा ‘दप्तरभार’ कमी करण्यासाठी खास पुढाकार घेतला. विविध उपाय शोधून काढले आणि दप्तरांचे ओझे हलके करण्यासाठीची गुरूकिल्ली दिली. त्या गुरूकिल्लीचा वापर करून इतर शाळांनीही मुलांच्या पुस्तकांसाठी कपाटे ठेवण्याची गरज आहे. केवळ सरकारवर अवलंबून न राहता स्वयंप्रेरणेतून योजलेल्या उपायांची दखल इतर शैक्षणिक संस्थांनी घेतली तरी विद्यार्थ्यांवरचा दप्तरांच्या ओझ्याचा ताण जरासा कमी होणार आहे.डोंबिवलीतील टिळकनगर शाळेने मुलांनी रोज दप्तर गच्च भरून आणू नये, यासाठीची उपाययोजना केली आहे. या शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विजया निरभवणे यांनी सांगितले की, आमच्या शाळेत आम्ही जोड तासिका केल्या आहेत. त्यामुळे दप्तराचे ओझे कमी झाले आहे. दिवसाला दोन ते तीन विषय ठेवले आहे. शिवाय मोठी दप्तरे आणायची नाहीत. शाळेत ई लर्निंगची सुविधा आहे. विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तके आणायला सांगतो. शंभर पानी वह्या आणयला सांगतो. या प्रयत्नांतून आम्ही दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत.कल्याणमधील सम्राट विद्यालयाचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, भाषा विषयाला शंभरपानी वह्या केल्या आहेत. त्याच वहीत दोन भाग करून एक भाग मराठीसाठी तर दुसरा इंग्रजीसाठी ठेवला आहे. इतिहास, भूगोल या विषयासाठी एकच वही ठेवली आहे. पीटीच्या विषयाला साहित्य आणावे लागत नाही. चित्रकलेसाठी आठवड्यातून चार तासिका असतात. त्या दोन दिवसांमध्ये विभागून ठेवल्या आहेत. त्यामुळे दप्तराचे ओझे कमी झाले आहे. कल्याण येथील सुभेदारवाडा शाळेच्या प्रज्ञा मोने यांच्या मते, कार्यानुभव, हस्तकला, चित्रकला यासारख्या विषयांची पुस्तके आम्ही शाळेच्या कपाटात ठेवतो. मुलांना सर्व विषयांसाठी दोन वह्या करायला सांगितल्या आहेत. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पालकसभा घेऊन पालकांनाही सूचना दिल्या आहेत. काही पालक विद्यार्थ्यांच्या वेळापत्रकाकडे लक्ष देत नाही. त्यामुळे त्यांच्या पाठीवरील दप्तरात सगळ््याच पुस्तकांसह वह्याचा भरणा असतो. पहिली व दुसरीसाठी केवळ तीनच विषय आहेत. शासनाच्या जीआरनुसार तीन पुस्तके आणण्यास परवानगी आहे. त्यामुळे पहिली व दुसरीचे विद्यार्थी तीन पुस्तके आणि दोन वह्या आणतात. तर तिसरी आणि चौथीतील विद्यार्थ्यांना विषय जास्त असल्यामुळे एका बेंचवरील विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार एकाला एका विषयाचे व दुसऱ्याला दुसऱ्या विषयांची पुस्तके आणयला सांगतो.