शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
2
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
3
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
4
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
5
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
6
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
7
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
8
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
9
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
10
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
11
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
12
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
13
धंगेकरांनी पक्षांतर केले याचे त्यांना भान नाही, ते विसरले आहेत; अजितदादांनी घेतला धंगेकरांचा समाचार
14
पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...
15
'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा
16
IND vs WI 2nd Test Day 2 Stumps: टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहुण्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार?
17
Diwali Astro 2025: दिवाळीच्या प्रकाशपर्वात भाग्य उजळणार! राशीनुसार पहा आनंद आणि ऐश्वर्य योग!
18
वीरेंद्र सेहवागची पत्नी करतेय बीसीसीआय अध्यक्षांना डेट? सोशल मीडियावर अफवांचं वादळ, तो फोटो ठरतोय कारण
19
भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही
20
'डेंजर झोन'मध्ये साई सुदर्शननं घेतला जबरदस्त No Look Catch! कॅरेबियन बॅटरसह सगळेच शॉक (VIDEO)

हलके झाले दप्तरांचे ओझे!

By admin | Updated: December 21, 2015 01:20 IST

राज्य सरकारच्या शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी उच्च न्यायालयाने ‘डेडलाईन’ दिली होती.

राज्य सरकारच्या शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी उच्च न्यायालयाने ‘डेडलाईन’ दिली होती. ती संपली तरी त्यावर ठोस कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. मात्र काही शाळांनी हा ‘दप्तरभार’ कमी करण्यासाठी खास पुढाकार घेतला. विविध उपाय शोधून काढले आणि दप्तरांचे ओझे हलके करण्यासाठीची गुरूकिल्ली दिली. त्या गुरूकिल्लीचा वापर करून इतर शाळांनीही मुलांच्या पुस्तकांसाठी कपाटे ठेवण्याची गरज आहे. केवळ सरकारवर अवलंबून न राहता स्वयंप्रेरणेतून योजलेल्या उपायांची दखल इतर शैक्षणिक संस्थांनी घेतली तरी विद्यार्थ्यांवरचा दप्तरांच्या ओझ्याचा ताण जरासा कमी होणार आहे.डोंबिवलीतील टिळकनगर शाळेने मुलांनी रोज दप्तर गच्च भरून आणू नये, यासाठीची उपाययोजना केली आहे. या शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विजया निरभवणे यांनी सांगितले की, आमच्या शाळेत आम्ही जोड तासिका केल्या आहेत. त्यामुळे दप्तराचे ओझे कमी झाले आहे. दिवसाला दोन ते तीन विषय ठेवले आहे. शिवाय मोठी दप्तरे आणायची नाहीत. शाळेत ई लर्निंगची सुविधा आहे. विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तके आणायला सांगतो. शंभर पानी वह्या आणयला सांगतो. या प्रयत्नांतून आम्ही दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत.कल्याणमधील सम्राट विद्यालयाचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, भाषा विषयाला शंभरपानी वह्या केल्या आहेत. त्याच वहीत दोन भाग करून एक भाग मराठीसाठी तर दुसरा इंग्रजीसाठी ठेवला आहे. इतिहास, भूगोल या विषयासाठी एकच वही ठेवली आहे. पीटीच्या विषयाला साहित्य आणावे लागत नाही. चित्रकलेसाठी आठवड्यातून चार तासिका असतात. त्या दोन दिवसांमध्ये विभागून ठेवल्या आहेत. त्यामुळे दप्तराचे ओझे कमी झाले आहे. कल्याण येथील सुभेदारवाडा शाळेच्या प्रज्ञा मोने यांच्या मते, कार्यानुभव, हस्तकला, चित्रकला यासारख्या विषयांची पुस्तके आम्ही शाळेच्या कपाटात ठेवतो. मुलांना सर्व विषयांसाठी दोन वह्या करायला सांगितल्या आहेत. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पालकसभा घेऊन पालकांनाही सूचना दिल्या आहेत. काही पालक विद्यार्थ्यांच्या वेळापत्रकाकडे लक्ष देत नाही. त्यामुळे त्यांच्या पाठीवरील दप्तरात सगळ््याच पुस्तकांसह वह्याचा भरणा असतो. पहिली व दुसरीसाठी केवळ तीनच विषय आहेत. शासनाच्या जीआरनुसार तीन पुस्तके आणण्यास परवानगी आहे. त्यामुळे पहिली व दुसरीचे विद्यार्थी तीन पुस्तके आणि दोन वह्या आणतात. तर तिसरी आणि चौथीतील विद्यार्थ्यांना विषय जास्त असल्यामुळे एका बेंचवरील विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार एकाला एका विषयाचे व दुसऱ्याला दुसऱ्या विषयांची पुस्तके आणयला सांगतो.