शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

हलके झाले दप्तरांचे ओझे!

By admin | Updated: December 21, 2015 01:20 IST

राज्य सरकारच्या शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी उच्च न्यायालयाने ‘डेडलाईन’ दिली होती.

राज्य सरकारच्या शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी उच्च न्यायालयाने ‘डेडलाईन’ दिली होती. ती संपली तरी त्यावर ठोस कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. मात्र काही शाळांनी हा ‘दप्तरभार’ कमी करण्यासाठी खास पुढाकार घेतला. विविध उपाय शोधून काढले आणि दप्तरांचे ओझे हलके करण्यासाठीची गुरूकिल्ली दिली. त्या गुरूकिल्लीचा वापर करून इतर शाळांनीही मुलांच्या पुस्तकांसाठी कपाटे ठेवण्याची गरज आहे. केवळ सरकारवर अवलंबून न राहता स्वयंप्रेरणेतून योजलेल्या उपायांची दखल इतर शैक्षणिक संस्थांनी घेतली तरी विद्यार्थ्यांवरचा दप्तरांच्या ओझ्याचा ताण जरासा कमी होणार आहे.डोंबिवलीतील टिळकनगर शाळेने मुलांनी रोज दप्तर गच्च भरून आणू नये, यासाठीची उपाययोजना केली आहे. या शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विजया निरभवणे यांनी सांगितले की, आमच्या शाळेत आम्ही जोड तासिका केल्या आहेत. त्यामुळे दप्तराचे ओझे कमी झाले आहे. दिवसाला दोन ते तीन विषय ठेवले आहे. शिवाय मोठी दप्तरे आणायची नाहीत. शाळेत ई लर्निंगची सुविधा आहे. विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तके आणायला सांगतो. शंभर पानी वह्या आणयला सांगतो. या प्रयत्नांतून आम्ही दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत.कल्याणमधील सम्राट विद्यालयाचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, भाषा विषयाला शंभरपानी वह्या केल्या आहेत. त्याच वहीत दोन भाग करून एक भाग मराठीसाठी तर दुसरा इंग्रजीसाठी ठेवला आहे. इतिहास, भूगोल या विषयासाठी एकच वही ठेवली आहे. पीटीच्या विषयाला साहित्य आणावे लागत नाही. चित्रकलेसाठी आठवड्यातून चार तासिका असतात. त्या दोन दिवसांमध्ये विभागून ठेवल्या आहेत. त्यामुळे दप्तराचे ओझे कमी झाले आहे. कल्याण येथील सुभेदारवाडा शाळेच्या प्रज्ञा मोने यांच्या मते, कार्यानुभव, हस्तकला, चित्रकला यासारख्या विषयांची पुस्तके आम्ही शाळेच्या कपाटात ठेवतो. मुलांना सर्व विषयांसाठी दोन वह्या करायला सांगितल्या आहेत. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पालकसभा घेऊन पालकांनाही सूचना दिल्या आहेत. काही पालक विद्यार्थ्यांच्या वेळापत्रकाकडे लक्ष देत नाही. त्यामुळे त्यांच्या पाठीवरील दप्तरात सगळ््याच पुस्तकांसह वह्याचा भरणा असतो. पहिली व दुसरीसाठी केवळ तीनच विषय आहेत. शासनाच्या जीआरनुसार तीन पुस्तके आणण्यास परवानगी आहे. त्यामुळे पहिली व दुसरीचे विद्यार्थी तीन पुस्तके आणि दोन वह्या आणतात. तर तिसरी आणि चौथीतील विद्यार्थ्यांना विषय जास्त असल्यामुळे एका बेंचवरील विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार एकाला एका विषयाचे व दुसऱ्याला दुसऱ्या विषयांची पुस्तके आणयला सांगतो.