शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

मनसेचे शाखाध्यक्ष खून प्रकरणी नातेवाईकांनी केले स्थानिक नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यावर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 23:31 IST

मनसेचे राबोडीतील शाखाध्यक्ष जमील अहमद शेख (४९) यांच्या खून प्रकरणी त्यांचे पुतणे फैसल शेख यांच्यासह नातेवाईकांनी स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यावर खूनाचा संशय व्यक्त केला आहे. यातील आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत जमील यांचा दफनविधीही केला जाणार नसल्याची भूमीका त्यांच्या नातेवाईक आणि मनसेने घेतली आहे. दरम्यान, जमील हत्येशी आपला कोणताही संबंध नसून हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप नजीब मुल्ला यांनी केला आहे.

ठळक मुद्दे अटकेचीही केली मागणीआरोपींच्या अटकेपर्यंत दफनविधी न करण्याचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राबोडीतील शाखाध्यक्ष जमील अहमद शेख (४९) यांच्या खून प्रकरणी त्यांचे पुतणे फैसल शेख (२९) यांच्यासह नातेवाईकांनी स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यावरच खूनाचा संशय व्यक्त केला आहे. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत जमील यांचा दफनविधीही केला जाणार नसल्याची भूमीका त्यांच्या नातेवाईक आणि मनसेने घेतली आहे. मुल्ला यांच्याही अटकेची मागणी करण्यात आल्यामुळे राबोडीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.एकेकाळी राष्ट्रवादीतूनच बाहेर पडलेले जमील आणि नजीब मुल्ला यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरु होते. त्यातच राबोडीतील क्लस्टर योजनेला स्थानिक रहिवाशांसह जमील यांनीही विरोध केला होता. जादा घरे मिळण्याचे अमिष दाखविले जात असून अधिकृत कर भरणा करणाऱ्यांनाच क्लस्टरची घरे मिळावीत, असा आग्रह जमील यांनी धरला होता. तर याऊलट, ज्यांची कागदपत्रे अधिकृत नाहीत, त्यांनाही घरे देण्याचे प्रयत्न मुल्ला यांच्याकडून करण्यात येत होते, असाही आरोप महंमद आलम इब्राहिम शेख तसेच स्थानिक रहिवशांनी केला आहे. ज्यांची घरे नाहीत त्यांचीही बायोमेट्रीक सर्व्हेक्षणात नावे आल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. यातूनच हा वाद गेल्या काही दिवसांपासून चिघळत गेला. त्यामुळेच जमील यांची हत्या घडवून आणली, असाही आरोप जमील यांचे भाच्चे सोएब अक्तर, त्यांचे मित्र साजीद शेख यांच्यासह नातेवाईकांनी केली. या संपूर्ण प्रकरणाची नि:पक्षपणे केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) मार्फतीने चौकशी व्हावी, आरोपींना तातडीने अटक व्हावी, त्यानंतरच जमील यांचा दफनविधी केला जाईल, असा पवित्रा स्थानिक रहिवाशांनी घेतला आहे.* कोण होते जमील शेखआधी राष्ट्रवादीमध्ये नजीब मुल्ला यांच्यासमवेत असलेले जमील हे गेल्या २० वर्षांपासून राजकारणात होते. गेल्या सात ते आठ वर्षांपासून ते मनसेमध्ये कार्यरत होते. २०१४ मध्येही शेख यांच्यावर चाकूचे वार करुन जीवघेणा हल्ला झाला होता. त्यावेळीही शेख यांनी नजीब यांच्यावरच आरोप केले होते. मात्र, याप्रकरणी दोन अन्य आरोपी अटक केले होते, अशी माहिती राबोडी पोलिसांनी दिली. जमील यांच्या मागे पत्नी खुशनूमा (३५), पाच वर्षीय जोबिया आणि चार वर्षीय जायरा या दोन मुली तसेच तोफीक आणि कुरेश हे दोन भाऊ असा परिवार आहे. समाजकार्याबरोबरच मालमत्तेचाही जमील यांचा व्यवसाय होता.................................

‘‘हे माझ्याविरुद्ध राजकीय षडयंत्र- नजीब मुल्लाजमील यांच्या हत्येशी आपला कोणताही संबंध नसून हे राजकीय षडयंत्र असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तथा ठामपाचे माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांनी केला आहे. आपला पोलीस यंत्रणेवर विश्वास असून पोलीस यातील मारेकरी नक्कीच शोधतील. २०१४ मध्येही आपल्यावर असेच आरोप केले होते. त्यातही दोन आरोपींना राबोडी पोलिसांनी अटक केली होती. त्याचे आरोपपत्रही न्यायालयात दाखल झाले आहे. यातही नाहक आपले नाव गोवले होते. तत्कालीन सह पोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण यांनीही तो तपास केला होता. जमील यांच्या खूनातील खरे आरोपी पोलिसांनी शोधणे आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे जमीलच्या घराखाली तळमजल्यावर माझे कार्यालय आहे. मग गेल्या २० वर्षांत जमीलने तिथे होणाºया गर्दीची तक्रार केलेली नाही. मग आताच असे आरोप का व्हावेत, असेही नजीब यांनी म्हटले आहे. ’’

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMurderखून