शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

पुनर्वसित चंद्रनगर विकासाच्या प्रतीक्षेत, ४२ वर्षांनंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 00:12 IST

या गावातील घरांच्या जमिनी, राखीव जमिनी, शेत जमिनी यांचे सीमांकन न झाल्याने नागरिकांच्या प्रत्यक्षात जमिनी कोणत्या हे अजूनही समजू शकलेले नाही.

बोर्डी : सूर्या प्रकल्पांतर्गत विस्थापित झालेले डहाणू तालुक्यातील चंद्रनगर हे गाव असून, भूमिअभिलेख विभागाकडून त्याचा नकाशा तयार झालेला नाही. त्यामुळे गाव विविध सुविधांपासून वंचित राहिल्याने विकास खुंटला आहे. शासन दरबारी पाठपुरावा करूनही पाणी, आरोग्य, वीज, दळणवळणाच्या समस्या इ. प्रश्न ४२ वर्षांनंतरही कायम राहिल्याची खंत आदिवासींनी व्यक्त केली आहे.या गावातील घरांच्या जमिनी, राखीव जमिनी, शेत जमिनी यांचे सीमांकन न झाल्याने नागरिकांच्या प्रत्यक्षात जमिनी कोणत्या हे अजूनही समजू शकलेले नाही. ज्यांच्या जमिनींना सातबारा आहे, त्या जमिनीचा ताबा आणि ताबा पावती खातेदाराला दिलेली नसल्याने जमिनींची ओळख होऊ शकत नसल्याचे खातेदारांचे म्हणणे आहे. महसूल आणि भूमिअभिलेख विभागामार्फत या गावातील काही नागरिकांना कागदोपत्री जमीन हस्तांतरित झालेल्या नाहीत. त्यामुळे मूलभूत समस्यांची वानवाच दिसून येते. हे गाव पुनर्वसन केल्यानंतर या गावालगत मोठे धरण असले, तरी पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. विंधन विहिरीवर पाण्याची भिस्त आहे. गावाच्या बाजूने धरणाचे कालवे वाहत असले तरी शेतीसाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे रोजगारासाठी आदिवासींना स्थलांतर करावे लागते. प्रशासनाने मंजूर केलेल्या रस्त्यांपैकी ३० टक्के रस्ते झालेले असून, ७० टक्के रस्ते अपूर्णच असल्याचे ग्रामस्थ सांगतात. आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास रुग्णांना सात किलोमीटर लांब अंतरावर वाणगाव येथे उपचारासाठी जावे लागते. पुनर्वसन झाल्यानंतर महावितरणने विजेच्या तारांचे जाळे उभे केले, परंतु त्याची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने खांब जीर्ण झाले आहेत, तर लोंबकळणाऱ्या तारांपासून अपघाताची भीती वाटते.

या पुनर्वसित गावात पाणी, वीज, रस्ते, आरोग्य या मूलभूत समस्यांपासून वंचित आहे. या समस्या ‘जैसे थे’ ठेवून प्रशासन गावावर दुजाभाव करीत आहे. विकास साधला जाणार कधी?- गीता जाधव, सदस्य, चंद्रनगर व हनुमाननगर गाव पुनर्वसन समिती

टॅग्स :palgharपालघर