शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पुनर्वसित चंद्रनगर विकासाच्या प्रतीक्षेत, ४२ वर्षांनंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 00:12 IST

या गावातील घरांच्या जमिनी, राखीव जमिनी, शेत जमिनी यांचे सीमांकन न झाल्याने नागरिकांच्या प्रत्यक्षात जमिनी कोणत्या हे अजूनही समजू शकलेले नाही.

बोर्डी : सूर्या प्रकल्पांतर्गत विस्थापित झालेले डहाणू तालुक्यातील चंद्रनगर हे गाव असून, भूमिअभिलेख विभागाकडून त्याचा नकाशा तयार झालेला नाही. त्यामुळे गाव विविध सुविधांपासून वंचित राहिल्याने विकास खुंटला आहे. शासन दरबारी पाठपुरावा करूनही पाणी, आरोग्य, वीज, दळणवळणाच्या समस्या इ. प्रश्न ४२ वर्षांनंतरही कायम राहिल्याची खंत आदिवासींनी व्यक्त केली आहे.या गावातील घरांच्या जमिनी, राखीव जमिनी, शेत जमिनी यांचे सीमांकन न झाल्याने नागरिकांच्या प्रत्यक्षात जमिनी कोणत्या हे अजूनही समजू शकलेले नाही. ज्यांच्या जमिनींना सातबारा आहे, त्या जमिनीचा ताबा आणि ताबा पावती खातेदाराला दिलेली नसल्याने जमिनींची ओळख होऊ शकत नसल्याचे खातेदारांचे म्हणणे आहे. महसूल आणि भूमिअभिलेख विभागामार्फत या गावातील काही नागरिकांना कागदोपत्री जमीन हस्तांतरित झालेल्या नाहीत. त्यामुळे मूलभूत समस्यांची वानवाच दिसून येते. हे गाव पुनर्वसन केल्यानंतर या गावालगत मोठे धरण असले, तरी पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. विंधन विहिरीवर पाण्याची भिस्त आहे. गावाच्या बाजूने धरणाचे कालवे वाहत असले तरी शेतीसाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे रोजगारासाठी आदिवासींना स्थलांतर करावे लागते. प्रशासनाने मंजूर केलेल्या रस्त्यांपैकी ३० टक्के रस्ते झालेले असून, ७० टक्के रस्ते अपूर्णच असल्याचे ग्रामस्थ सांगतात. आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास रुग्णांना सात किलोमीटर लांब अंतरावर वाणगाव येथे उपचारासाठी जावे लागते. पुनर्वसन झाल्यानंतर महावितरणने विजेच्या तारांचे जाळे उभे केले, परंतु त्याची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने खांब जीर्ण झाले आहेत, तर लोंबकळणाऱ्या तारांपासून अपघाताची भीती वाटते.

या पुनर्वसित गावात पाणी, वीज, रस्ते, आरोग्य या मूलभूत समस्यांपासून वंचित आहे. या समस्या ‘जैसे थे’ ठेवून प्रशासन गावावर दुजाभाव करीत आहे. विकास साधला जाणार कधी?- गीता जाधव, सदस्य, चंद्रनगर व हनुमाननगर गाव पुनर्वसन समिती

टॅग्स :palgharपालघर