शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

भिवंडीतील शेतात बहरली लालभडक स्ट्रॉबेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 00:00 IST

कुंदन पाटील यांच्या अभिनव प्रयत्नांना यश

नितीन पंडित लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : भिवंडी तालुक्यातील शेती म्हणजे फक्त पावसाळी भातशेतीचे पीक. त्यात ही सध्या तालुक्यात आलेले गोदाम व रिअल इस्टेटच्या व्यवसायामुळे भातशेती नष्ट होत असताना जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती कुंदन पाटील यांनी वालकस येथील  आपल्या शेतात चक्क महाबळेश्वर येथे पिकविल्या जाणाऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. विशेष म्हणजे तिला आता मधुर आणि लालभडक फळे आली असून, या मधुर फळांची गोडी सध्या पाटील चाखत आहेत.दापोडे येथील मूळचे शेतकरी असलेले कुंदन पाटील यांचे वडील कै. तुळशीराम पाटील यांनी परिसरात गोदामांचा व्यवसाय वाढला असल्याने पडघानजीकच्या वालकस या गावात सात एकर शेतजमीन खरेदी करून तेथे शेतीची आपली परंपरा सुरू ठेवली होती. या शेतजमिनीत त्यांनी ठिबक सिंचनच्या माध्यमातून पांढरा कांदा, कलिंगड, टरबूज, भेंडी, वांगी, फ्लॉवर, टोमॅटो, सिमला मिर्ची, बटाटा, झेंडू आदींची लागवड केली आहे. अशातच महाबळेश्वरच्या मित्राच्या सल्ल्याने त्यांनी एक हजार स्ट्रॉबेरीची रोपे मागवून त्यांची लागवड डिसेंबरच्या सुरुवातीला केली होती. मशागत करून योग्य ती काळजी घेतल्याने  रोपट्यांना आता फळे आली असून, आता ती चांगलीच बहरली आहेत. मी मूळचा शेतकरी कुटुंबातील असल्याने शेती स्वस्थ बसू देत नव्हती, त्यामुळे या शेतजमिनीत विविध प्रयोग करीत विविध भाजीपाल्याची लागवड केली. दररोज सकाळी सात ते नऊ वाजेदरम्यान मी स्वतः मशागत करीत असल्याने वेगळा आनंद मिळतो, अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली. त्यांच्या या प्रयत्नांची माहिती समजल्यावर त्यांच्या शेतास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह अनेकांनी भेटी दिल्या.