शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
7
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
8
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
11
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
12
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
13
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
14
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
15
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
16
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
17
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
18
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
19
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
20
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
Daily Top 2Weekly Top 5

भरती प्रक्रियेलाही आचारसंहितेचा खो

By admin | Updated: May 10, 2016 01:54 IST

परिवहन उपक्रमात दाखल झालेल्या ६० बस चालकांविना धूळखात पडल्याने केडीएमटी प्रशासनाकडून भरती प्रक्रिया सुरू केली जाणार होती.

कल्याण : परिवहन उपक्रमात दाखल झालेल्या ६० बस चालकांविना धूळखात पडल्याने केडीएमटी प्रशासनाकडून भरती प्रक्रिया सुरू केली जाणार होती. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना तिला विधानपरिषदेच्या निवडणूक आचारसंहितेचा फटका बसला आहे. परिणामी, भरती प्रक्रिया पूर्ण होऊन बस मार्गावर धावण्यास आणखी विलंब होणार आहे. दरम्यान, यासंदर्भात परिवहन सभापती भाऊसाहेब चौधरी लवकरच महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांची भेट घेणार आहेत.जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत केडीएमटी उपक्रमाला १८५ बस मिळणार आहेत. यातील १० व्होल्वो आणि उर्वरित ६० बस आॅगस्ट २०१५ मध्ये दाखल झाल्या आहेत. व्होल्वो बस रस्त्यावर धावत आहेत, परंतु चालक आणि वाहकांच्या कमतरतेमुळे ६० बस वापराविना धूळखात पडल्या आहेत. त्यातील काहींचा आलटूनपालटून वापर केला जात आहे. पुरेशा बस असूनहीचालकाविना नागरिकांना सेवेचा लाभ मिळत नसल्याचे वास्तव आहे. उर्वरित ११५ बसनाही मंजुरी मिळाली आहे, परंतु निधीअभावी त्या अजूनही दाखल झालेल्या नाहीत, असे सूत्रांनी सांगितले. याकडे लक्ष वेधताना मध्यंतरी मनसेचे माजी सभापती राजेश कदम यांनी ठोस कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्याचा पवित्रा घेतला होता. एकीकडे स्मार्ट सिटीचे दिवास्वप्न दाखवले जात असताना दुसरीकडे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचे परिवहन उपक्रमाकडे पुरते दुर्लक्ष झाल्याचा आरोपही त्यांनी केला होता. परिवहन सदस्यांनीही कर्मचारीभरतीचा विषय सातत्याने लावून धरला होता. या पार्श्वभूमीवर महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन सभापती, सदस्य आणिअधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत तातडीने ठोक पगारीतत्त्वावर वाहक आणि चालक भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावर प्रशासनाकडून आॅनलाइन भरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार होती. यासंदर्भात एजन्सी नेमली जाणार होती. परंतु,निवडणूक आचारसंहितेचा फटका याला बसल्याने तूर्तास या प्रक्रियेला ‘खो’ बसला आहे. एकीकडे आचारसंहितेमुळे महापालिकेच्या महासभा आणि स्थायी समिती, परिवहन समिती व इतर समित्यांच्या बैठकाही रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी, पावसाळा तोंडावर आल्याने कचरा सफाई, नालेसफाई तसेच अर्धवट राहिलेली रस्त्याची कामे कधी पूर्ण करायची, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. (प्रतिनिधी)