शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

मैदाने विकासकांना आंदण देण्यास मान्यता

By admin | Updated: May 21, 2017 03:20 IST

भाईंदरपाडा येथील मैदान विकासकाच्या घशात घालण्याचा, खाडीचे पाणी शुध्द करुन त्या महागड्या पाण्याची विक्री करण्याचा, गडकरी रंगायतनवर छत टाकण्याचा

- लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : भाईंदरपाडा येथील मैदान विकासकाच्या घशात घालण्याचा, खाडीचे पाणी शुध्द करुन त्या महागड्या पाण्याची विक्री करण्याचा, गडकरी रंगायतनवर छत टाकण्याचा हे व असे तब्बल ३९२ प्रस्ताव कोणत्याही चर्चेविना अवघ्या अर्धा तासात बहुमताच्या जोरावर सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासन यांनी शनिवारी मंजूर करवून घेतले. सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनाही काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करायची होती. परंतु त्यांनाही चर्चेची संधी नाकारण्यात आली. सत्ताधाऱ्यांच्या हडेलप्पी कारभाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी आणि भाजपाने सभात्याग केला.भाईंदर पाडा येथील खेळाचे मैदान खाजगी विकासकाला देखभालीच्या नावाखाली देण्याच्या प्रस्तावावरुन मागील काही दिवस चांगलेच रान पेटले होते. ठाण्यातील नगररचना व पर्यावरण तज्ज्ञांनी या प्रस्तावाला विरोध केला होता. तसेच खाडीतील प्रदूषित पाणी शुध्द करुन महागड्या दरात विकण्याच्या मुद्द्यावरही उलटसुलट चर्चा सुरु झाली होती. असे काही वादग्रस्त व कोट्यवधी रुपयांचा बोजा टाकणारे प्रस्ताव शनिवारी महासभेत चर्चेविना मंजूर करुन सत्ताधारी शिवसेनेने आपल्या ‘हम करसो कायदा’ या प्रवृत्तीचे दर्शन घडवले. आयुक्तांवर तोंडदेखली टीका करणारी शिवसेनेची मंडळी प्रत्यक्षात त्यांच्या कशी इशाऱ्यावर नाचतात हेच आयुक्तांचे प्रस्ताव चर्चेविना मंजूर करण्यावरुन स्पष्ट दिसत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. अनेक वादग्रस्त आणि महत्वपूर्ण प्रस्तावांवर चर्चा व्हावी, अशी मागणी महासभेत सुरुवातीलाच सत्ताधारी पक्षाचे सदस्य अशोक वैती यांनी केली होती. त्याला अनेकांनी पाठिंबा दिला होता. फेरीवाला आणि रिक्षावाल्यांवरील कारवाईचा मुद्दा गाजल्यानंतर या विषयांवर देखील गांभीर्याने चर्चा होईल अशी आशा सर्वांना वाटत होती. परंतु यापूर्वीची सत्ताधाऱ्यांची खेळी पुन्हा पाहण्यास मिळाली. विषयपत्रिकेला सुरुवात होताच, एका मागून एक विषय मंजूर करवून घेण्याची घाई सत्ताधाऱ्यांनी सुरु केली. त्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी आणि भाजपाच्या नगरसेवकांनी आम्हाला या विषयांवर चर्चा करायची आहे, अशी मागणी केली. परंतु त्यांची मागणी विचारात न घेता, विषयपत्रिका मताला टाकून मंजूर केली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सदस्यांनी पीठासीन अधिकारी तथा प्रभारी महापौर रमाकांत मढवी यांच्याकडे धाव घेत चर्चेची मागणी केली. परंतु तुमच्या ज्या काही सूचना असतील त्या लेखी स्वरुपात द्या. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सदस्यांनी तसेच नाराज संजय भोईर यांनीही सभात्याग केला. - एकाच दिवशी अनेक वादग्रस्त प्रस्ताव पटलावर असतांना त्यावर चर्चा न करता ते मंजूर करुन ठाणेकरांच्या कररुपी पैशाची उधळपट्टी कशासाठी, असा सवाल मनसेचे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला. त्यांच्यासह शहर मनसेने पालिका मुख्यालयात आंदोलन करुन महासभेच्या पटलावरील कागदपत्रे फाडून निषेध व्यक्त केला.सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा लोकशाहीचा गळा घोटला असून आम्ही त्यांचा निषेध करीत आहोत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करुन पुढील दिशा ठरविली जाईल.- मिलिंद पाटील, विरोधी पक्षनेते, ठामपा