शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

बंड उफाळले, इच्छुक धास्तावले

By admin | Updated: May 6, 2017 05:59 IST

नेत्यांनी आपापल्या मर्जीतील, कुटुंबातील-घरातील उमेदवारांचाच विचार केल्याने भिवंडीत सर्व पक्षांतील बंडखोरी उफाळून

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : नेत्यांनी आपापल्या मर्जीतील, कुटुंबातील-घरातील उमेदवारांचाच विचार केल्याने भिवंडीत सर्व पक्षांतील बंडखोरी उफाळून आल्याने इच्छुक धास्तावले आहेत. बंड शमवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी शब्द टाकण्यास; प्रसंगी साम, दाम, दंडाचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. इच्छुकांची नावे जाहीर केली, तर गोंधळ उडेल या भीतीने कोणत्याही पक्षाने शुक्रवारी यादी जाहीर केली नाही आणि रात्री उशिरा उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरू करण्यात आले. उमेदवारी अर्ज भरण्याचा शनिवारी, ६ मे रोजी शेवटचा दिवस आहे. एकाही पक्षाने यादी जाहीर न केल्याने उद्या दिवसभर अर्जांसाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने ९० पैकी ७० जागांवर आघाडीची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात त्यांची उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतरच त्या आघाडीच्या जागावाटपाचे चित्र स्पष्ट होईल. त्या दोन पक्षांचा आणि भाजपा-कोणार्क आघाडीचा काही जागांवर झालेला समझोता वगळता सर्व पक्ष स्वबळावर लढणार आहेत. पण यातील एकही पक्ष सर्व जागा लढवणार नाही. शुक्रवारी दिवसभरात वेगवेगळ््या पक्षाच्या ५० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले. ७० जागांवर आघाडी : भिवंडीच्या ९० जागांपैकी ४४ जागांवर समाजवादी पक्ष आणि २६ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडी करून लढणार असल्याचे शुक्रवारी रात्री स्थानिक नेत्यांनी जाहीर केले. इतर छोटे पक्षही आघाडीत सहभागी होणार असल्याने त्यांच्यासाठी २० जागा ठेवल्याचा दावा त्यांनी केला. मात्र काँग्रेसमुळे धमर्निरपेक्ष आघाडी होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. काही प्रभाग पूर्णत: तर काही प्रभागात जागा वाटल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपातही संघर्षभाजपातील निष्ठावंत, संघाचे कार्यकर्ते आणि नवभाजपावाद्यांतील संघर्ष अजूनही पुरता शमला नसल्याचे दिसून आले. शनिवारी उमेदवारी जाहीर होताच त्या संघर्षाला पुन्हा तोंड फुटेल, अशी शक्यता आहे. पण याबाबत कोणतेही नेते बोलण्यास तयार नाहीत. काँग्रेसमध्येही फाटाफूट राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाचे आघाडीची घोषणा केल्यानंतर उमेदवारी नाकारलेल्या काँग्रेसच्या इच्छुकांनी त्यांच्या गटाकडे धाव घेतली आहे. काहींनी समाजवादीच्या तिकीटावर निवडणूक लढण्याची तयारी केली आहे.काँग्रेसची सेना, भाजपाला रसद?मागील सत्ताकाळात काँग्रेसच्या २७ नगरसेवकांनी शिवसेनेला महापौरपदासाठी मदत केली. काँग्रेसचे काही नगरसेवक भाजपा खासदारांच्या बंगल्यावर, तर काही भादवडमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांकडे जाऊन वाटाघाटी करतात,असा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष खालीद गुड्डू यांनी केला. काँग्रेस नगरसेवक जावेद दळवी यांनी भाजपा खासदारांकडे बसून शिवसेना-भाजपाला अपेक्षित पद्धतीने उमेदवार दिल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला. भाजपाचा सेनेवर डल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी भाजापात प्रवेश केल्यानंतर अजूनही सेनेला धक्का देण्याचे भाजापाचे प्रयत्न सुरू आहेत. दोन-तीन वेळा संधी मिळूनही शिवसेनेतील ज्या नेत्यांनी आता प्रभागातील चारपैकी तीन जागांवर दावा केला, त्यांना भाजापाने गळाला लावले आहे. ंसेनेने उमेदवारी न दिल्यास त्यांना शेवटच्या क्षणी एबी फॉर्म दिले जाणार असल्याने शिवसैनिक संतापले आहेत. हा विषय स्थानिक नेत्यांनी ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्याकडे नेला. मात्र तेथेही तो न सुटल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी रात्रभर आपल्या पद्धतीने हा विषय हाती घेतला. काँग्रेसच्या भ्रमावर टीका काँग्रेस हा भिवंडीतील मोठा पक्ष असला, तरी त्या पक्षाचे स्थानिक नेते अजूनही जुन्या भ्रमातून बाहेर येण्यास तयार नाही, असी टीका समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केली. जागांबाबत त्यांच्या अवास्तव मागण्यामुळेच भिवंडीत त्यांच्याशी आघाडी होऊ शकली नाही. त्यामुळे अकारण मतांची फाटाफूट होईल, असेही ते म्हणाले. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांतही जागावाटपावरून मतभेद होते. पण मी स्वत: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री गणेश नाईक यांच्याशी बोलून आघाडीवर शिक्कामोर्तब केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.