शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाप्रवास दोन रूपये स्वस्त

By admin | Updated: October 7, 2016 05:14 IST

कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगर, बदलापूरमध्ये चार सीएनजी पंप सुरु झाले आहेत. आणखी काही पंप प्रस्तावित आहेत. त्याचा फायदा २० हजारांहून अधिक रिक्षांना झाला

अनिकेत घमंडी / डोंबिवलीकल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगर, बदलापूरमध्ये चार सीएनजी पंप सुरु झाले आहेत. आणखी काही पंप प्रस्तावित आहेत. त्याचा फायदा २० हजारांहून अधिक रिक्षांना झाला आहे. त्यामुळे या रिक्षांचे भाडे दोन रुपयांनी कमी करण्याचा निर्णय कल्याण आरटीओने घेतला आहे. तो मंजुरीसाठी सरकारकडे पाठवला आहे. त्याला मंजुरी मिळताच ३५ लाख प्रवाशांचा रोजचा प्रवास स्वस्त होईल.हकीम समितीच्या निकषांचा आधार घेत हा प्रस्ताव पाठवल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी ‘लोकमत’ला दिली. ठाणे शहरात ज्या प्रमाणे पहिल्या टप्प्यासाठी १८ रुपये भाडे आकारले जाते, त्याच पद्धतीने या शहरातही आकारले जाईल. सध्या या शहरांमध्ये पहिल्या टप्प्यासाठी २० रुपये भाडे आकारण्यात येते. भाड्याचे नवे सूत्रपेट्रोल-डिझेलच्या तुलनेत सीएनजी वर चालणाऱ्या रिक्षांना इंधन स्वस्त पडते. अनकेदा इंधनांच्या वाढीमुळे भाडे वाढवले जाते. आता सीएनजी सुविधेमुळे भाडेही कमी करावे आणि सीएनजीच्या खर्चानुसार भाड्याची नवी रचना ठरवावी, असे आरटीओचे म्हणणे आहे.एमएमआरटीए घेणार निर्णयच्कल्याण आरटीओअंतर्गत येणाऱ्या या सर्व शहरांत २० हजार रिक्षा आहेत. त्यातील सुमारे १८ हजार रिक्षा सीएनजीवर चालतात. तर ५०० रिक्षा एलपीजीवर चालतात. हकीम समितीच्या निकषांनुसार ६० टक्के अथवा त्यापेक्षा जास्त रिक्षा सीएनजीवर चालत असतील, तर सीएनजीच्या दराच्या सूत्रानुसार भाडे आकारावे लागते. त्याची अंमलबजावणी ठाण्यात होते. च्ती कल्याण आरटीओअंतर्गत येणाऱ्या डोंबिवली-कल्याण, टिटवाळा ते बदलापूरपर्यंतच्या सर्व शहरांमध्येही होण्याची गरज आहे. तशी ती व्हावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, असे आरटीओने सरकारकडे पाठवलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. च्याबाबत निर्णय घेण्यासाठी ५ आॅक्टोबरला एमएमआरटीएची बैठक होणार होती. तांत्रिक कारणांमुळे ती पुढे ढकलण्यात आली असून पुढील बैठकीत हा निर्णय होईल.शेअर भाड्यातही कपातच्शेअर पद्धतीने चालवण्यात येणाऱ्या रिक्षाचालकांनाही सध्याच्या भाड्यात कपात करावी लागेल. ते भाडेही साधारण दोन रूपयांनी कमी होईल. शेअर रिक्षांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा निश्चितच फायदा होईल. च्डोंबिवलीत बहुतांश ठिकाणी शेअर पद्धतीने जाण्यासाठी किमान १० रुपये, तर अन्य ठिकाणी १२ रूपयांपासून २० रूपये आकारले जातात. मात्र या शेअर भाड्यावर कुणाचाही अंकूश नाही. पुन्हा मीटरसक्ती 1या सर्व शहरांमध्ये सुमारे ७५ रिक्षा स्टँड असून डोंबिवलीत २८, तेवढेच कल्याणमध्ये, बदलापूर ६, अंबरनाथ ६ अशा प्रमाणात अधिकृत स्टँड आहेत.2ठाण्याप्रमाणेच रिक्षा चालकांना शिस्त लागावी, यासाठी या शहरांमध्येही मीटरची सक्ती करण्यात येणार असून त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठीही संबंधित यंत्रणांना सांगण्यात आले आहे. मीटरसक्ती झाल्यास त्याचा फायदा नागरिकांना हाईल. अव्वाच्या सव्वा भाडे आकारण्यावर मर्यादा येईल.