शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रोहिदासवाड्यात तीव्र पाणीटंचाई; कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याने नागरिक झाले त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:23 IST

पश्चिमेतील रोहिदास वाडा परिसरातील नागरिकांना काही महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील जवळपास साडेतीनशे कुटुंबे या समस्येने ग्रासली आहेत.

कल्याण : पश्चिमेतील रोहिदास वाडा परिसरातील नागरिकांना काही महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील जवळपास साडेतीनशे कुटुंबे या समस्येने ग्रासली आहेत.मागील काही महिन्यांपासून रोहिदासवाड्यातील नागरिकांना पाणी मिळत नसल्याने त्रस्त नागरिकांनी महापालिका मुख्यालयात अनेकवेळा धाव घेतली. रोहिदासवाड्यात सुमारे साडेतीनशे कुटुंबे कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झाली आहेत. आधीच कमी पाणी पुरवठा होत असून, त्यातच अनेकदा दूषित पाणी पुरवठा होत असल्याने भरलेले पाणी टाकून देण्याची वेळही नागरिकांवर येते. पालिका प्रशासनाकडून नियमितपणे पाणी बिल पाठवले जाते. पण पाणीटंचाईची समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष केले जाते. पालिका प्रशासनाकडून या भागात टँकर पाठवला जातो. पाण्याचा टँकर वस्तीत येताच नागरिकांची झुंबड उडते. अनेकांच्या वाटयाला टँकरचे पाणीच येत नाही. टँकरच्या पाण्यासाठी नागरिक सकाळपासूनच रांगा लावून टँकरच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात. सकाळी ९ च्या सुमारास परिसरात येणारे पाणी घराघरात पोहोचेपर्यंत दोन तास निघून जातात. त्यानंतर पाणी भरायला घेतले, तर अर्ध्या तासात पाणी गेलेले असते. कपातीसाठी मंगळवार आणि महिन्यातील चौथ्या शनिवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आल्यानंतर दुसºया दिवशी पुरेशा दाबाने पाणी येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत.मारुती मंदिर परिसरात पाणी येत नसल्याने त्याठिकाणी टँकर मागवला जातो. आंबेडकर रोड परिसरात पाणी येत नसल्याने काही महिन्यांपूर्वी केडीएमसीवर मोर्चादेखील काढण्यात आला होता. त्यानंतर थोड्याफार प्रमाणात पाणी यायला सुरुवात झाली. मात्र, आता परिस्थिती ‘जैसे थे’च झाली आहे.- योगेश रोकडे, स्थानिक रहिवासीप्रभागातील पाणीसमस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. या परिसरात नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली असून लवकरच नागरिकांना भेडसावणारी पाणी समस्या दूर होईल.- शकिला खान,स्थानिक नगरसेविका

टॅग्स :Waterपाणी