शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

रोहिदासवाड्यात तीव्र पाणीटंचाई; कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याने नागरिक झाले त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:23 IST

पश्चिमेतील रोहिदास वाडा परिसरातील नागरिकांना काही महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील जवळपास साडेतीनशे कुटुंबे या समस्येने ग्रासली आहेत.

कल्याण : पश्चिमेतील रोहिदास वाडा परिसरातील नागरिकांना काही महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील जवळपास साडेतीनशे कुटुंबे या समस्येने ग्रासली आहेत.मागील काही महिन्यांपासून रोहिदासवाड्यातील नागरिकांना पाणी मिळत नसल्याने त्रस्त नागरिकांनी महापालिका मुख्यालयात अनेकवेळा धाव घेतली. रोहिदासवाड्यात सुमारे साडेतीनशे कुटुंबे कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झाली आहेत. आधीच कमी पाणी पुरवठा होत असून, त्यातच अनेकदा दूषित पाणी पुरवठा होत असल्याने भरलेले पाणी टाकून देण्याची वेळही नागरिकांवर येते. पालिका प्रशासनाकडून नियमितपणे पाणी बिल पाठवले जाते. पण पाणीटंचाईची समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष केले जाते. पालिका प्रशासनाकडून या भागात टँकर पाठवला जातो. पाण्याचा टँकर वस्तीत येताच नागरिकांची झुंबड उडते. अनेकांच्या वाटयाला टँकरचे पाणीच येत नाही. टँकरच्या पाण्यासाठी नागरिक सकाळपासूनच रांगा लावून टँकरच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात. सकाळी ९ च्या सुमारास परिसरात येणारे पाणी घराघरात पोहोचेपर्यंत दोन तास निघून जातात. त्यानंतर पाणी भरायला घेतले, तर अर्ध्या तासात पाणी गेलेले असते. कपातीसाठी मंगळवार आणि महिन्यातील चौथ्या शनिवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आल्यानंतर दुसºया दिवशी पुरेशा दाबाने पाणी येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत.मारुती मंदिर परिसरात पाणी येत नसल्याने त्याठिकाणी टँकर मागवला जातो. आंबेडकर रोड परिसरात पाणी येत नसल्याने काही महिन्यांपूर्वी केडीएमसीवर मोर्चादेखील काढण्यात आला होता. त्यानंतर थोड्याफार प्रमाणात पाणी यायला सुरुवात झाली. मात्र, आता परिस्थिती ‘जैसे थे’च झाली आहे.- योगेश रोकडे, स्थानिक रहिवासीप्रभागातील पाणीसमस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. या परिसरात नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली असून लवकरच नागरिकांना भेडसावणारी पाणी समस्या दूर होईल.- शकिला खान,स्थानिक नगरसेविका

टॅग्स :Waterपाणी