शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मोडकसागर, तानसा धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 04:44 IST

मुंबईची पाणीचिंता मिटणार; धरणकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

ठाणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. शुक्रवारीही जोर कायम राहिला. यामुळे जिल्ह्यातील बारवी धरणासह मोडकसागर, तानसा धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे या धरणांखालील गावांना ती भरण्याआधीच सावधानतेचा इशारा दिला आहे. यात मोडकसागरच्या काठावरील ४२ गावांचा समावेश आहे. पाणीसाठा वाढल्याने मुंबईची चिंता मिटण्याच्या मार्गावर आहे.जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, एमआयडीसी, गावपाड्यांना या बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणाच्या पाण्याची पातळी शुक्रवारी ६८ मीटर असून यंदा स्वयंचलित गेट बंद करून ७२.६० मीटर म्हणजे ३४०.४८ दशलक्ष घनमीटर पाणी धरणात साठवण्यात येणार आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरच त्यातील पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. यामुळे पिंपळोली, चांदप, दहागाव, चोन, कोऱ्याचापाडा, तारण, अस्नोली या बारवी नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.या धरणात २४ तासांत २१४ मिमी पाऊस पडला आहे. या धरणातील खानिवरे, कान्होळ, पाटणपाड हे पाणलोट क्षेत्र मिळून पडलेल्या या पावसाची सरासरी ४८ मिमी नोंद झाली आहे. सध्या त्याची पाणीपातळी ६८ मीटर असून ६३.२८ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी तो ९९.१८ टक्के होता. आंध्रात काही दिवसांच्या तुलनेत बºययापैकी ७४ मिमी, भातसा ७६ मिमी, तर मोडकसागरमध्ये ८९, तानसात ५० मिमी, मध्य वैतरणात ९० मिमी पाऊस पडला आहे.जिल्ह्यातील पाऊसजिल्ह्यात शुक्रवारी सरासरी अवघा ३१ मिमी पाऊस गेल्या २४ तासांत पडल्याची नोंद झाली आहे. यापैकी ठाणे परिसरात ३८ मिमी, कल्याणला १५, मुरबाड २५, भिवंडीला ३१, शहापूरला ४६, उल्हासनगर २८ आणि अंबरनाथला २७ मिमी पाऊस पडला आहे.मोडकसागर-तानसाची आजची स्थितीमोडकसागर धरणाची पाणीपातळी शुक्रवारी १२ वाजता १५९.६७ मीटर असून ते भरून वाहण्याची पातळी १६३.१५ मीटर आहे. पाऊस पाहता ते कधीही ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. यामुळे वैतरणा नदीकाठावरील ४२ गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. यामध्ये दाधारे, जोशीपाडा, कळंबे, शेले, तिळसे, पोपरोली, धिंडेपाडा, अनशेत, गाले, तुसे, सारशी, गंधारे, कोयना वसाहत, गेट्स, शीळ,अब्जे अलमन, कुतल, बोरंदे, आवंदेध, नाने, गलतरे, हमरापूर ही सर्व २४ गावपाडे वाडा तालुक्यातील आहेत. तर, पालघर तालुक्यातील १८ गावे या वैतरणा नदीकाठावर आहेत. तर, तानसा धरण १२५.९६ मीटर भरले असून ते ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मीटर आहे. यामुळे शहापूर तालुक्यातील गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.