शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ, नद्या ओव्हर फ्लो, सतर्कतेच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 04:39 IST

जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे धरणांमध्ये सुमारे ६ ते १२ टक्के पाणीसाठा वाढला.

ठाणे : जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे धरणांमध्ये सुमारे ६ ते १२ टक्के पाणीसाठा वाढला. मोडकसागर १०० टक्के भरल्यामुळे त्याचे दोन दरवाजे उघडले असून, तानसाही भरण्याच्या स्थितीत आहे. ९१.५५ टक्के पाणीसाठा तयार झाला. रात्रभरात ते भरण्याची शक्यता आहे. जिल्हाभरात सरासरीच्या ७३.१३ टक्के पाऊस पडला असून, नद्या ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर असल्याने सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.भातसामध्ये रविवारी केवळ ५८ टक्के पाणीसाठाहोता. तो सोमवारी ६४ टक्के झाला. बारवी धरण भरण्यासाठी केवळ दीड मीटर पातळी बाकी आहे. रात्रभर पाऊस सुरू राहिल्यास ते भरण्याची शक्यता आहे. उल्हास नदीला पाणीपुरवठा करणाऱ्या आंध्रा धरणात रात्रभरात चार टक्के साठा वाढला आहे. बदलापूर बंधारा धोक्याची पातळी ओलांडण्याच्या स्थितीत आहे. तर मोहने बंधाºयाने धोक्याची पातळी ओलांडली आहे.>विहार तलाव भरलामुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाºया तलाव क्षेत्रावर पावसाची कृपादृष्टी कायम आहे़ यामुळे गेल्या दोन दिवसांत तब्बल सव्वादोन लाख दशलक्ष लीटरने जलसाठा वाढला आहे़ तुळशी, मोडकसागर पाठोपाठ सोमवारी सकाळी विहार तलावही भरून वाहू लागला़ तर तानसा तलावही लवकरच भरण्याच्या मार्गावर आहे़विहार तलावातून रोज मुंबईला ११० दशलक्ष लीटर जलसाठा होतो़ शनिवारी तलावांमध्ये सात लाख दशलक्ष लीटर साठा होता़ यात वाढ होऊन नऊ लाख ३४ हजार दशलक्ष लीटर साठा झाला़ वर्षभर आवश्यक साठ्यापैकी ६४ टक्के साठा तलावांत आहे.>कल्याण-नगर मार्ग बंदउल्हास नदीला पूर आलेला आहे. यामुळे कल्याण-अहमदनगर रस्त्यावरील रायता पुलावरून पाणी वाहत आहे. कल्याणच्या बाजूकडे पाण्याची पातळी वाढल्यामुळे या पुलावरून पाणी वाहू लागले. कल्याण-शीळ महामार्गावरील टाटा पॉवर येथील रस्ता पाण्याखाली गेल्याने, कल्याण-मुरबाड-नगर या मार्गावरील वाहतूक खोळंबली. या महामार्गावरील वाहतूक गोवेली, टिटवाळा, आंबिवली आणि शहाड मार्गाने वळविली आहे. आणे व भिसोळ पुलावरून पाणी वाहत असल्याने, तेथील वाहतूकदेखील बंद केली आहे.ठाणे जिल्ह्यात मागील २४ तासांत एक हजार ९६.२० मिमी पाऊस पडला. जिल्हा प्रशासनाने या पावसाची सरासरी १५६.६० मिमी नोंद घेतली असून, आतापर्यंत ५११.८२ मिमी पाऊस झाला आहे. यात ठाण्यात सरासरीच्या ८३.५५ टक्के, कल्याणमध्ये ७७.१६ टक्के, मुरबाडमध्ये ५९.१८ टक्के, उल्हासनगरमध्ये ७८.१२ टक्के, अंबरनाथमध्ये ७२ टक्के, भिवंडीमध्ये ८५.८४ टक्के आणि शहापूरमध्ये ५६.०२ टक्के पाऊस झाला आहे.

टॅग्स :Damधरण