शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ, नद्या ओव्हर फ्लो, सतर्कतेच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 04:39 IST

जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे धरणांमध्ये सुमारे ६ ते १२ टक्के पाणीसाठा वाढला.

ठाणे : जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे धरणांमध्ये सुमारे ६ ते १२ टक्के पाणीसाठा वाढला. मोडकसागर १०० टक्के भरल्यामुळे त्याचे दोन दरवाजे उघडले असून, तानसाही भरण्याच्या स्थितीत आहे. ९१.५५ टक्के पाणीसाठा तयार झाला. रात्रभरात ते भरण्याची शक्यता आहे. जिल्हाभरात सरासरीच्या ७३.१३ टक्के पाऊस पडला असून, नद्या ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर असल्याने सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.भातसामध्ये रविवारी केवळ ५८ टक्के पाणीसाठाहोता. तो सोमवारी ६४ टक्के झाला. बारवी धरण भरण्यासाठी केवळ दीड मीटर पातळी बाकी आहे. रात्रभर पाऊस सुरू राहिल्यास ते भरण्याची शक्यता आहे. उल्हास नदीला पाणीपुरवठा करणाऱ्या आंध्रा धरणात रात्रभरात चार टक्के साठा वाढला आहे. बदलापूर बंधारा धोक्याची पातळी ओलांडण्याच्या स्थितीत आहे. तर मोहने बंधाºयाने धोक्याची पातळी ओलांडली आहे.>विहार तलाव भरलामुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाºया तलाव क्षेत्रावर पावसाची कृपादृष्टी कायम आहे़ यामुळे गेल्या दोन दिवसांत तब्बल सव्वादोन लाख दशलक्ष लीटरने जलसाठा वाढला आहे़ तुळशी, मोडकसागर पाठोपाठ सोमवारी सकाळी विहार तलावही भरून वाहू लागला़ तर तानसा तलावही लवकरच भरण्याच्या मार्गावर आहे़विहार तलावातून रोज मुंबईला ११० दशलक्ष लीटर जलसाठा होतो़ शनिवारी तलावांमध्ये सात लाख दशलक्ष लीटर साठा होता़ यात वाढ होऊन नऊ लाख ३४ हजार दशलक्ष लीटर साठा झाला़ वर्षभर आवश्यक साठ्यापैकी ६४ टक्के साठा तलावांत आहे.>कल्याण-नगर मार्ग बंदउल्हास नदीला पूर आलेला आहे. यामुळे कल्याण-अहमदनगर रस्त्यावरील रायता पुलावरून पाणी वाहत आहे. कल्याणच्या बाजूकडे पाण्याची पातळी वाढल्यामुळे या पुलावरून पाणी वाहू लागले. कल्याण-शीळ महामार्गावरील टाटा पॉवर येथील रस्ता पाण्याखाली गेल्याने, कल्याण-मुरबाड-नगर या मार्गावरील वाहतूक खोळंबली. या महामार्गावरील वाहतूक गोवेली, टिटवाळा, आंबिवली आणि शहाड मार्गाने वळविली आहे. आणे व भिसोळ पुलावरून पाणी वाहत असल्याने, तेथील वाहतूकदेखील बंद केली आहे.ठाणे जिल्ह्यात मागील २४ तासांत एक हजार ९६.२० मिमी पाऊस पडला. जिल्हा प्रशासनाने या पावसाची सरासरी १५६.६० मिमी नोंद घेतली असून, आतापर्यंत ५११.८२ मिमी पाऊस झाला आहे. यात ठाण्यात सरासरीच्या ८३.५५ टक्के, कल्याणमध्ये ७७.१६ टक्के, मुरबाडमध्ये ५९.१८ टक्के, उल्हासनगरमध्ये ७८.१२ टक्के, अंबरनाथमध्ये ७२ टक्के, भिवंडीमध्ये ८५.८४ टक्के आणि शहापूरमध्ये ५६.०२ टक्के पाऊस झाला आहे.

टॅग्स :Damधरण