शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील राजीवगांधी उड्डाणपुल वहातूकीसाठी होणार खुला, जड वहानांना बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 22:22 IST

भिवंडी : शहरातील वाडारोड,कल्याणरोड आणि ठाणारोडला जोडणाऱ्या स्व.राजीवगांधी उड्डाणपुलाला पडलेले भगदाड दुरूस्त करण्याचे काम नुकतेच पुर्ण झाले असुन तब्बल पंधरा दिवसांनंतर उद्या शुक्रवारी या पुलावरून नियमीतपणे वहातूक सुरू होणार आहे. या उड्डाणपुलाचे आयुष्य वाढावे यासाठी पुलावरून जड व अवजड वहानांना कायमची बंदी करण्यात यावी,अशी मागणी शहरवासीयांकडून होऊ लागली आहे.शहरात बारा ...

ठळक मुद्देउड्डाणपुलाच्या स्लॅब उखडून पडले होते भगदाडदुरूस्तीसाठी पंधरा दिवस उड्डाणपुल होता बंददुरूस्तीनंतर पुलाच्या दोन्ही बाजूला गडर

भिवंडी: शहरातील वाडारोड,कल्याणरोड आणि ठाणारोडला जोडणाऱ्या स्व.राजीवगांधी उड्डाणपुलाला पडलेले भगदाड दुरूस्त करण्याचे काम नुकतेच पुर्ण झाले असुन तब्बल पंधरा दिवसांनंतर उद्या शुक्रवारी या पुलावरून नियमीतपणे वहातूक सुरू होणार आहे. या उड्डाणपुलाचे आयुष्य वाढावे यासाठी पुलावरून जड व अवजड वहानांना कायमची बंदी करण्यात यावी,अशी मागणी शहरवासीयांकडून होऊ लागली आहे.शहरात बारा वर्षापुर्वी बांधलेल्या राजीवगांधी उड्डाणपुलाच्या स्लॅबचा काही भाग उखडून, या पुलास पंधरादिवसांपुर्वी (५ सप्टेंबर)भगदाड पडले होते. एस.टी.स्थानकासमोरील या उड्डाणपुलाखाली असलेल्या शौचालयाजवळ सकाळच्या सुमारास पुलाच्या स्लॅबचा काही भाग कोसळल्याने शहरात हाहाकार माजला होता. याच दरम्यान नागरिकांनी उड्डाणपुलावरील वहातूक ताबडतोब बंद केली. महानगपालिकेचे आयुक्त मनोहर हिरे यांनी या घटनेची दखल घेत व्हिजेआयटी या संस्थेस लेखी पत्र देऊन उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल आॅडीट रिपोर्ट देण्यास सांगीतले आहे. हा स्ट्रक्चरल आॅडीटचा रिपोर्ट पालिकेकडे पुढील आठवड्यात येणार असल्याची माहिती आयुक्त हिरे यांनी दिली.तसेच एमएमआरडीएच्या अभियंत्यांनी देखील उड्डाणपुलाची माहिती घेऊन पुलाच्या दुरूस्ताबाबत सुचना केल्या. दरम्यान मनपा आयुक्तांनी उड्डाणपुलाचे ठेकेदार जे.कुमार अ‍ॅण्ड कंपनी यांना पाचारण करून त्यांच्याकडून पुलाची तपासणी करून त्यांच्याकडून पुलाच्या दुरूस्तीचे काम सुरू केले. हा विषय तांत्रीक असल्याने पुलाचे बांधकाम करणाºया जे अ‍ॅण्ड कंपनीने ही दुरूस्ती पंधरा दिवसांत केली. तर पालिकेने उड्डाणपुलावर असलेले खड्डे बुजविण्याकरीता चार लाखाचे डांबरीकरण केले आहे. पावसाचे पाणी जाण्यासाठी पाण्याचे पाईप साफ केले. महापालिकेने केलेली दुरूस्ती टिकावी आणि पुलाचे अधीक नुकसान होऊ नये म्हणून काही महिन्यांसाठी पुलाच्या दोन्ही टोकावर उंचीची मर्यादा असलेले गर्डर लावण्याचे काम सुरू केले असुन हे काम आज गुरूवार रोजी पुर्ण होणार आहे. उद्या शुक्रवार पासून या राजीवगांधी स्मृती उड्डाणपुलावरून नियमीत वहातूक सुरू होणार आहे.असे मनपा आयुक्त मनोहर हिरे यांनी सांगीतले. पुलाच्या दोन्ही टोकावर उंचीची मर्यादा असलेले गर्डर आहे तो पर्यंत या पुलावरून जाणाºया जडवहानांना आपोआपच मर्यादा येणार आहे. परंतू या उड्डाणपुलाचे आयुष्य वाढवायचे असल्यास या पुलावर जड व अवजड वहानांना कायमची बंदी घालावी,अशी मागणी शहरातील विविध स्तरांतून होऊ लागली आहे.राजीवगांधी उड्डाणपुलाला भगदाड पडलेल्या घटनेस पंधरा दिवस झाले. उड्डाणपुलावर साचणा-या पाण्याचा निचरा करणे तसेच योग्य दुरूस्ती करणे या बाबत पालिकेच्या अभियंत्यांना हलगर्जीपणा केल्याने ही घटना घडल्याचा आरोप जनमानसांतून होत आहे. या घटनेनंतर पालिकेत स्थायी समितीची सभा आणि महासभा देखील झाली. परंतू उड्डाणपुलाची निगा व दुरूस्ती करण्यात हलगर्जीपणा करणा-या अधिका-यांना व अभियंत्यांना कोणी नगरसेवकांनी जाब विचारला नाही. उड्डाणपुलाची ही घटना एकाच दिवसांत घडणारी नसुन अनेक महिने केलेल्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली आहे. त्याचा त्रास शहरातील नागरिकांना भोगावा लागला आहे. त्यामुळे हलगर्जीपणा करणा-या अभियंत्यांवर व अधिका-यांवर आयुक्तांनी कारवाई करावी,अशी मागणी नागरिक विकास प्रतिष्ठानचे रामदास दानवले यांनी केली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीRajiv Gandhiराजीव गांधी