शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
4
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
5
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
6
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
7
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
8
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
9
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
10
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
11
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
12
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
13
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
14
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
15
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
16
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
17
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
18
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
19
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
20
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील राजीवगांधी उड्डाणपुल वहातूकीसाठी होणार खुला, जड वहानांना बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 22:22 IST

भिवंडी : शहरातील वाडारोड,कल्याणरोड आणि ठाणारोडला जोडणाऱ्या स्व.राजीवगांधी उड्डाणपुलाला पडलेले भगदाड दुरूस्त करण्याचे काम नुकतेच पुर्ण झाले असुन तब्बल पंधरा दिवसांनंतर उद्या शुक्रवारी या पुलावरून नियमीतपणे वहातूक सुरू होणार आहे. या उड्डाणपुलाचे आयुष्य वाढावे यासाठी पुलावरून जड व अवजड वहानांना कायमची बंदी करण्यात यावी,अशी मागणी शहरवासीयांकडून होऊ लागली आहे.शहरात बारा ...

ठळक मुद्देउड्डाणपुलाच्या स्लॅब उखडून पडले होते भगदाडदुरूस्तीसाठी पंधरा दिवस उड्डाणपुल होता बंददुरूस्तीनंतर पुलाच्या दोन्ही बाजूला गडर

भिवंडी: शहरातील वाडारोड,कल्याणरोड आणि ठाणारोडला जोडणाऱ्या स्व.राजीवगांधी उड्डाणपुलाला पडलेले भगदाड दुरूस्त करण्याचे काम नुकतेच पुर्ण झाले असुन तब्बल पंधरा दिवसांनंतर उद्या शुक्रवारी या पुलावरून नियमीतपणे वहातूक सुरू होणार आहे. या उड्डाणपुलाचे आयुष्य वाढावे यासाठी पुलावरून जड व अवजड वहानांना कायमची बंदी करण्यात यावी,अशी मागणी शहरवासीयांकडून होऊ लागली आहे.शहरात बारा वर्षापुर्वी बांधलेल्या राजीवगांधी उड्डाणपुलाच्या स्लॅबचा काही भाग उखडून, या पुलास पंधरादिवसांपुर्वी (५ सप्टेंबर)भगदाड पडले होते. एस.टी.स्थानकासमोरील या उड्डाणपुलाखाली असलेल्या शौचालयाजवळ सकाळच्या सुमारास पुलाच्या स्लॅबचा काही भाग कोसळल्याने शहरात हाहाकार माजला होता. याच दरम्यान नागरिकांनी उड्डाणपुलावरील वहातूक ताबडतोब बंद केली. महानगपालिकेचे आयुक्त मनोहर हिरे यांनी या घटनेची दखल घेत व्हिजेआयटी या संस्थेस लेखी पत्र देऊन उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल आॅडीट रिपोर्ट देण्यास सांगीतले आहे. हा स्ट्रक्चरल आॅडीटचा रिपोर्ट पालिकेकडे पुढील आठवड्यात येणार असल्याची माहिती आयुक्त हिरे यांनी दिली.तसेच एमएमआरडीएच्या अभियंत्यांनी देखील उड्डाणपुलाची माहिती घेऊन पुलाच्या दुरूस्ताबाबत सुचना केल्या. दरम्यान मनपा आयुक्तांनी उड्डाणपुलाचे ठेकेदार जे.कुमार अ‍ॅण्ड कंपनी यांना पाचारण करून त्यांच्याकडून पुलाची तपासणी करून त्यांच्याकडून पुलाच्या दुरूस्तीचे काम सुरू केले. हा विषय तांत्रीक असल्याने पुलाचे बांधकाम करणाºया जे अ‍ॅण्ड कंपनीने ही दुरूस्ती पंधरा दिवसांत केली. तर पालिकेने उड्डाणपुलावर असलेले खड्डे बुजविण्याकरीता चार लाखाचे डांबरीकरण केले आहे. पावसाचे पाणी जाण्यासाठी पाण्याचे पाईप साफ केले. महापालिकेने केलेली दुरूस्ती टिकावी आणि पुलाचे अधीक नुकसान होऊ नये म्हणून काही महिन्यांसाठी पुलाच्या दोन्ही टोकावर उंचीची मर्यादा असलेले गर्डर लावण्याचे काम सुरू केले असुन हे काम आज गुरूवार रोजी पुर्ण होणार आहे. उद्या शुक्रवार पासून या राजीवगांधी स्मृती उड्डाणपुलावरून नियमीत वहातूक सुरू होणार आहे.असे मनपा आयुक्त मनोहर हिरे यांनी सांगीतले. पुलाच्या दोन्ही टोकावर उंचीची मर्यादा असलेले गर्डर आहे तो पर्यंत या पुलावरून जाणाºया जडवहानांना आपोआपच मर्यादा येणार आहे. परंतू या उड्डाणपुलाचे आयुष्य वाढवायचे असल्यास या पुलावर जड व अवजड वहानांना कायमची बंदी घालावी,अशी मागणी शहरातील विविध स्तरांतून होऊ लागली आहे.राजीवगांधी उड्डाणपुलाला भगदाड पडलेल्या घटनेस पंधरा दिवस झाले. उड्डाणपुलावर साचणा-या पाण्याचा निचरा करणे तसेच योग्य दुरूस्ती करणे या बाबत पालिकेच्या अभियंत्यांना हलगर्जीपणा केल्याने ही घटना घडल्याचा आरोप जनमानसांतून होत आहे. या घटनेनंतर पालिकेत स्थायी समितीची सभा आणि महासभा देखील झाली. परंतू उड्डाणपुलाची निगा व दुरूस्ती करण्यात हलगर्जीपणा करणा-या अधिका-यांना व अभियंत्यांना कोणी नगरसेवकांनी जाब विचारला नाही. उड्डाणपुलाची ही घटना एकाच दिवसांत घडणारी नसुन अनेक महिने केलेल्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली आहे. त्याचा त्रास शहरातील नागरिकांना भोगावा लागला आहे. त्यामुळे हलगर्जीपणा करणा-या अभियंत्यांवर व अधिका-यांवर आयुक्तांनी कारवाई करावी,अशी मागणी नागरिक विकास प्रतिष्ठानचे रामदास दानवले यांनी केली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीRajiv Gandhiराजीव गांधी