शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

महापालिकेला मिळालेले १५ हजार कोटी गेले कुठे : राज ठाकरेंचा सेना-भाजपाला सवाल

By admin | Updated: October 28, 2015 23:17 IST

केंद्रासह राज्य सरकार आणि करातून गेल्या १५ वर्षांत महापालिकेला मिळालेले १५ हजार कोटी गेले कुठे, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी शिवसेना-भाजपाला केला.

कल्याण : केंद्रासह राज्य सरकार आणि करातून गेल्या १५ वर्षांत महापालिकेला मिळालेले १५ हजार कोटी गेले कुठे, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी शिवसेना-भाजपाला केला.येथील पश्चिमेतील खडकपाडा, साई चौकात बुधवारी त्यांची महापालिका निवडणुकीची प्रचार सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते.कल्याण-डोंबिवली शहरांचा शिवसेना-भाजपाने योग्य प्रकारे विकास केला असता तर या निवडणुकीत बाळासाहेबांच्या नावावर मते मागण्याची वेळ आली नसती, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. या वेळी त्यांनी नाशिकमध्ये केलेल्या आणि सुरू असलेल्या विकासकामांचे प्रेझेंटेशन चित्रफितीच्या माध्यमातून सादर केले. एकहाती सत्ता द्या. नाशिकसारखा विकास कल्याण-डोंबिवलीचादेखील करून दाखवितो, अशी ग्वाही दिली.नाशिकमधल्या कामांबाबत मला विचारणा केली जात होती. परंतु, ही कामे दिसायला लागल्यावर कोणाची आता हिम्मत होत नाही. आज काही जण गेल्या जाहीरनाम्यातील गोष्टी वाचून दाखवित आहेत. गेली २० वर्षे त्यांच्या हातात सत्ता होती. परंतु, प्रगती करण्याऐवजी त्यांनी शहरांची वाटच लावली. विकासकामांमधून फक्त पैसे खाल्ले. सेना-भाजप महापालिकेच्या सत्तेत एकत्र होते. आता त्यांच्यात नळावरची भांडणे सुरू आहेत. लोकांना मूर्ख समजू नका. हा खेळ फार दिवस चालणार नाही. कल्याण-डोंबिवलीचे होत्याचे नव्हते करून ठेवले असून आता त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. सत्तेशिवाय विकास साधता येत नाही. माझ्याकडे इच्छाशक्ती असून त्यातून या शहरांचा मी चांगला विकास करू शकतो, असे ते म्हणाले. १९२५ ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. मात्र, भाजपाला सत्तेवर यायला २०१४ पर्यंत वाट पाहावी लागली. त्यामुळे निराश होऊ नका. जोमाने कामाला लागा. लोकांशी प्रतारणा करू नका, असा सल्लाही त्यांनी या वेळी कार्यकर्त्यांना दिला. (प्रतिनिधी)