शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
4
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
5
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
6
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
7
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
8
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
9
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
10
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
11
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
12
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
13
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
16
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
17
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
18
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
19
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
20
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?

पक्षासाठी कायपण; राज ठाकरेंनी स्वतः मोबाईल हातात घेतला, पदाधिकाऱ्यांचा फोटो काढला!

By पंकज पाटील | Updated: May 15, 2023 14:01 IST

राज ठाकरे अंबरनाथ आणि बदलापूरच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी बदलापूरची कार्यकारणी थेट बरखास्त करण्याचे आदेश दिले होते.

अंबरनाथ: अंबरनाथमधील मनसेमध्ये जे दोन गट तयार झाले होते ते दोन्ही गट एकमेकांकडे पाठ करूनच संघटनात्मक काम करीत होते. याबाबतची तक्रार राज ठाकरे यांच्या कानावर येतच त्यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांना डोंबिवलीमध्ये बोलवित त्यांची चांगलीच खराटपट्टी काढली. एवढेच नव्हे तर महिन्याभरात रिझल्ट न दिल्यास आणि गटबाजी न संपवल्यास या सर्व पदाधिकाऱ्यांना घरी बसवण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले. राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी गटबाजी बाजूला ठेवत एकत्रित काम करण्याचे आश्वासन राज ठाकरेंना दिले. त्यानंतर राज ठाकरे यांनी स्वतः मोबाईल हातात घेत गटबाजीत सामील असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून एकत्रित उभे केले आणि स्वतः फोटो काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला.

राज ठाकरे अंबरनाथ आणि बदलापूरच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी बदलापूरची कार्यकारणी थेट बरखास्त करण्याचे आदेश दिले होते. तत्पूर्वी अंबरनाथची कार्यकारणी देखील गटबाजीमुळे बरखास्त होईल अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र आमदार राजू पाटील यांच्या मध्यस्थीमुळे गटबाजी असताना देखील कार्यकारणी बरखास्त झाली नाही. मात्र गटबाजी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना थेट राज ठाकरे यांनी बैठकीसाठी डोंबिवलीत बोलावले होते. यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के, स्वप्नील बागुल आणि त्यांचे पदाधिकारी एका बाजूला तर दुसरीकडे अंबरनाथ शहराध्यक्ष कुणाल भोईर आणि जिल्हा संघटक संदीप लकडे असे दोन प्रभावी गट अंबरनाथमध्ये तयार झाले होते. राज ठाकरे यांच्या दौऱ्या दरम्यान देखील बॅनरबाजी करताना या दोन्ही गटाचे बॅनर्स स्वतंत्र लावण्यात आले होते. या प्रकरणी राज ठाकरे यांनी देखील गंभीर दखल घेत या दोन्ही गटांना बैठकीसाठी डोंबिवलीत बोलवले होते.

गटबाजी असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी खडेबोल सुनावत गटबाजीत करणारा असाल तर महिन्याभरात कार्यकारिणी बरखास्त करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मात्र यावेळी पदाधिकाऱ्यांनी आम्ही गटबाजी करणार नाही याची शाश्वती दिल्यानंतर राज ठाकरे यांनी सबुरीने घेत या सर्व गटबाजी करणाऱ्यांना एकत्रित आणले. एवढेच नव्हे तर कट्टर विरोधक असलेल्यांना एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवण्यास सांगत स्वतः राज ठाकरे यांनी त्यांचा फोटो काढला. अंबरनाथची गटबाजी संपवण्यासाठी राज ठाकरे यांनी फोटो काढण्याचा घेतलेला हा अनोखा मार्ग गटबाजी करणाऱ्यांना किती दिवस एकत्रित ठेवते हे येणारा कळच ठरवेल.

 

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे