शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

पक्षासाठी कायपण; राज ठाकरेंनी स्वतः मोबाईल हातात घेतला, पदाधिकाऱ्यांचा फोटो काढला!

By पंकज पाटील | Updated: May 15, 2023 14:01 IST

राज ठाकरे अंबरनाथ आणि बदलापूरच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी बदलापूरची कार्यकारणी थेट बरखास्त करण्याचे आदेश दिले होते.

अंबरनाथ: अंबरनाथमधील मनसेमध्ये जे दोन गट तयार झाले होते ते दोन्ही गट एकमेकांकडे पाठ करूनच संघटनात्मक काम करीत होते. याबाबतची तक्रार राज ठाकरे यांच्या कानावर येतच त्यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांना डोंबिवलीमध्ये बोलवित त्यांची चांगलीच खराटपट्टी काढली. एवढेच नव्हे तर महिन्याभरात रिझल्ट न दिल्यास आणि गटबाजी न संपवल्यास या सर्व पदाधिकाऱ्यांना घरी बसवण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले. राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी गटबाजी बाजूला ठेवत एकत्रित काम करण्याचे आश्वासन राज ठाकरेंना दिले. त्यानंतर राज ठाकरे यांनी स्वतः मोबाईल हातात घेत गटबाजीत सामील असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून एकत्रित उभे केले आणि स्वतः फोटो काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला.

राज ठाकरे अंबरनाथ आणि बदलापूरच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी बदलापूरची कार्यकारणी थेट बरखास्त करण्याचे आदेश दिले होते. तत्पूर्वी अंबरनाथची कार्यकारणी देखील गटबाजीमुळे बरखास्त होईल अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र आमदार राजू पाटील यांच्या मध्यस्थीमुळे गटबाजी असताना देखील कार्यकारणी बरखास्त झाली नाही. मात्र गटबाजी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना थेट राज ठाकरे यांनी बैठकीसाठी डोंबिवलीत बोलावले होते. यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के, स्वप्नील बागुल आणि त्यांचे पदाधिकारी एका बाजूला तर दुसरीकडे अंबरनाथ शहराध्यक्ष कुणाल भोईर आणि जिल्हा संघटक संदीप लकडे असे दोन प्रभावी गट अंबरनाथमध्ये तयार झाले होते. राज ठाकरे यांच्या दौऱ्या दरम्यान देखील बॅनरबाजी करताना या दोन्ही गटाचे बॅनर्स स्वतंत्र लावण्यात आले होते. या प्रकरणी राज ठाकरे यांनी देखील गंभीर दखल घेत या दोन्ही गटांना बैठकीसाठी डोंबिवलीत बोलवले होते.

गटबाजी असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी खडेबोल सुनावत गटबाजीत करणारा असाल तर महिन्याभरात कार्यकारिणी बरखास्त करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मात्र यावेळी पदाधिकाऱ्यांनी आम्ही गटबाजी करणार नाही याची शाश्वती दिल्यानंतर राज ठाकरे यांनी सबुरीने घेत या सर्व गटबाजी करणाऱ्यांना एकत्रित आणले. एवढेच नव्हे तर कट्टर विरोधक असलेल्यांना एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवण्यास सांगत स्वतः राज ठाकरे यांनी त्यांचा फोटो काढला. अंबरनाथची गटबाजी संपवण्यासाठी राज ठाकरे यांनी फोटो काढण्याचा घेतलेला हा अनोखा मार्ग गटबाजी करणाऱ्यांना किती दिवस एकत्रित ठेवते हे येणारा कळच ठरवेल.

 

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे