शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

धोकादायक इमारतींवर पावसाळी वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 04:32 IST

आपत्ती काळात अंधेरीहून येणार एनडीआरएफ : बचाव पथक तैनातीचे आदेश

ठाणे : पावसाळ्यातील आपत्तीला मुंबईकरांसह ठाणेकर तोंड देण्यास समर्थ असले, तरी त्यास राष्टÑीय आपत्ती बचाव व शोध पथकाचे (एनडीआरएफ) पाठबळ आहे. यासाठी केंद्र शासनाने मुंबई व ठाणे परिसरांसाठी एनडीआरएफची तीन पथके तैनात केली आहेत. मात्र, त्यांचे वास्तव्य मुंबईच्या अंधेरी परिसरात आहे. आपत्ती काळात आवश्यकता भासल्यास ते ठाणे जिल्ह्यातील घटनास्थळी हजर होणार आहेत.तत्पूर्वी वीजअटकाव यंत्रणेच्या दुरुस्तीसह महापालिका, नगरपालिकांना बचाव पथक तैनातीचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षाने दिले आहेत. यावेळी जिल्ह्यातील अतिधोकादायक इमारतींच्या सर्वेक्षणासह धोकादायक कारखान्यांच्या सुरक्षेची आराखड्यावर चर्चा करून वॉच ठेवण्यावर नुकत्याच झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत लक्ष केंद्रित करण्यात आले.एनडीआरएफच्या बचाव व शोधकार्याची ठाणेकरांना उत्तम जाणीव आहे. त्यांना ठाण्यात वास्तव्य करणे शक्य व्हावे, यासाठी घोडबंदर परिसरात त्यांची निवासव्यवस्था केलेली आहे. मात्र, घोडबंदरला न राहता अंधेरी येथे पथक वास्तव्य करणार असले, तरी संकटकाळी ठाणे जिल्ह्यातील आपत्तीस्थळी ते तत्काळ हजर होणार असल्याचे सूतोवाच एनडीआरएफच्या दिल्ली येथील कार्यालयाने केले आहे. याचा ऊहापोह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षाच्या या पावसाळी सुरक्षा आढावा बैठकीत झाला.जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, बांधकाम विभाग, पाटबंधारे, कृषी, तहसीलदार आदी कार्यालये आदी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये १ जूनपासून २४ तास आपत्ती निवारण कक्ष सुरू करण्याचे आदेश या आढावा बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी देऊन सर्व यंत्रणांचा आढावा घेतला.यावेळी उपस्थित असलेले एनडीआरएफचे कमांडर विजेंद्र दाहिवा यांनी संकटकाळी घटनास्थळी उपस्थित राहण्याच्या दृष्टीने आराखडा सादर केला. तर, मीरा-भार्इंदर महापालिकेच्या बचाव व शोध पथकास प्रशिक्षण देण्याचे दाहिवा यांनी मान्य केले. जिल्ह्यात ठिकठिकाणी असलेल्या वीजअटकाव यंत्रणेच्या दुरुस्तीसह पर्जन्यमापक यंत्रणेतील सुधारणा करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत संबंधित अधिकाºयांना दिल्या.मिळणार पर्जन्यमानाचा अंदाज : संभाव्य पर्जन्यमानाची माहिती हवामान खात्याचे उपमहानिर्देशक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. याशिवाय, पावसाच्या कालावधीत सतर्क राहण्याच्या दृष्टीने सर्व अधिकाºयांना तत्काळ एसएमएस व ई-मेल पाठवण्यात येणार असून त्यासाठी अधिकाºयांनी तत्काळ मोबाइल क्रमांकासह ई-मेलनोंदणीची सक्ती केली आहे. आरोग्यासाठी औषधांचा साठा, नाल्यांची साफसफाई, औद्योगिक सुरक्षा, सोशल मीडियावर अपप्रचारावरील नियंत्रणावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षाने लक्ष केंद्रित केले आहे.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाmonsoon 2018मान्सून 2018