शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

धोकादायक इमारतींवर पावसाळी वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 04:32 IST

आपत्ती काळात अंधेरीहून येणार एनडीआरएफ : बचाव पथक तैनातीचे आदेश

ठाणे : पावसाळ्यातील आपत्तीला मुंबईकरांसह ठाणेकर तोंड देण्यास समर्थ असले, तरी त्यास राष्टÑीय आपत्ती बचाव व शोध पथकाचे (एनडीआरएफ) पाठबळ आहे. यासाठी केंद्र शासनाने मुंबई व ठाणे परिसरांसाठी एनडीआरएफची तीन पथके तैनात केली आहेत. मात्र, त्यांचे वास्तव्य मुंबईच्या अंधेरी परिसरात आहे. आपत्ती काळात आवश्यकता भासल्यास ते ठाणे जिल्ह्यातील घटनास्थळी हजर होणार आहेत.तत्पूर्वी वीजअटकाव यंत्रणेच्या दुरुस्तीसह महापालिका, नगरपालिकांना बचाव पथक तैनातीचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षाने दिले आहेत. यावेळी जिल्ह्यातील अतिधोकादायक इमारतींच्या सर्वेक्षणासह धोकादायक कारखान्यांच्या सुरक्षेची आराखड्यावर चर्चा करून वॉच ठेवण्यावर नुकत्याच झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत लक्ष केंद्रित करण्यात आले.एनडीआरएफच्या बचाव व शोधकार्याची ठाणेकरांना उत्तम जाणीव आहे. त्यांना ठाण्यात वास्तव्य करणे शक्य व्हावे, यासाठी घोडबंदर परिसरात त्यांची निवासव्यवस्था केलेली आहे. मात्र, घोडबंदरला न राहता अंधेरी येथे पथक वास्तव्य करणार असले, तरी संकटकाळी ठाणे जिल्ह्यातील आपत्तीस्थळी ते तत्काळ हजर होणार असल्याचे सूतोवाच एनडीआरएफच्या दिल्ली येथील कार्यालयाने केले आहे. याचा ऊहापोह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षाच्या या पावसाळी सुरक्षा आढावा बैठकीत झाला.जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, बांधकाम विभाग, पाटबंधारे, कृषी, तहसीलदार आदी कार्यालये आदी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये १ जूनपासून २४ तास आपत्ती निवारण कक्ष सुरू करण्याचे आदेश या आढावा बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी देऊन सर्व यंत्रणांचा आढावा घेतला.यावेळी उपस्थित असलेले एनडीआरएफचे कमांडर विजेंद्र दाहिवा यांनी संकटकाळी घटनास्थळी उपस्थित राहण्याच्या दृष्टीने आराखडा सादर केला. तर, मीरा-भार्इंदर महापालिकेच्या बचाव व शोध पथकास प्रशिक्षण देण्याचे दाहिवा यांनी मान्य केले. जिल्ह्यात ठिकठिकाणी असलेल्या वीजअटकाव यंत्रणेच्या दुरुस्तीसह पर्जन्यमापक यंत्रणेतील सुधारणा करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत संबंधित अधिकाºयांना दिल्या.मिळणार पर्जन्यमानाचा अंदाज : संभाव्य पर्जन्यमानाची माहिती हवामान खात्याचे उपमहानिर्देशक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. याशिवाय, पावसाच्या कालावधीत सतर्क राहण्याच्या दृष्टीने सर्व अधिकाºयांना तत्काळ एसएमएस व ई-मेल पाठवण्यात येणार असून त्यासाठी अधिकाºयांनी तत्काळ मोबाइल क्रमांकासह ई-मेलनोंदणीची सक्ती केली आहे. आरोग्यासाठी औषधांचा साठा, नाल्यांची साफसफाई, औद्योगिक सुरक्षा, सोशल मीडियावर अपप्रचारावरील नियंत्रणावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षाने लक्ष केंद्रित केले आहे.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाmonsoon 2018मान्सून 2018