शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

धोकादायक इमारतींवर पावसाळी वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 04:32 IST

आपत्ती काळात अंधेरीहून येणार एनडीआरएफ : बचाव पथक तैनातीचे आदेश

ठाणे : पावसाळ्यातील आपत्तीला मुंबईकरांसह ठाणेकर तोंड देण्यास समर्थ असले, तरी त्यास राष्टÑीय आपत्ती बचाव व शोध पथकाचे (एनडीआरएफ) पाठबळ आहे. यासाठी केंद्र शासनाने मुंबई व ठाणे परिसरांसाठी एनडीआरएफची तीन पथके तैनात केली आहेत. मात्र, त्यांचे वास्तव्य मुंबईच्या अंधेरी परिसरात आहे. आपत्ती काळात आवश्यकता भासल्यास ते ठाणे जिल्ह्यातील घटनास्थळी हजर होणार आहेत.तत्पूर्वी वीजअटकाव यंत्रणेच्या दुरुस्तीसह महापालिका, नगरपालिकांना बचाव पथक तैनातीचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षाने दिले आहेत. यावेळी जिल्ह्यातील अतिधोकादायक इमारतींच्या सर्वेक्षणासह धोकादायक कारखान्यांच्या सुरक्षेची आराखड्यावर चर्चा करून वॉच ठेवण्यावर नुकत्याच झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत लक्ष केंद्रित करण्यात आले.एनडीआरएफच्या बचाव व शोधकार्याची ठाणेकरांना उत्तम जाणीव आहे. त्यांना ठाण्यात वास्तव्य करणे शक्य व्हावे, यासाठी घोडबंदर परिसरात त्यांची निवासव्यवस्था केलेली आहे. मात्र, घोडबंदरला न राहता अंधेरी येथे पथक वास्तव्य करणार असले, तरी संकटकाळी ठाणे जिल्ह्यातील आपत्तीस्थळी ते तत्काळ हजर होणार असल्याचे सूतोवाच एनडीआरएफच्या दिल्ली येथील कार्यालयाने केले आहे. याचा ऊहापोह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षाच्या या पावसाळी सुरक्षा आढावा बैठकीत झाला.जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, बांधकाम विभाग, पाटबंधारे, कृषी, तहसीलदार आदी कार्यालये आदी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये १ जूनपासून २४ तास आपत्ती निवारण कक्ष सुरू करण्याचे आदेश या आढावा बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी देऊन सर्व यंत्रणांचा आढावा घेतला.यावेळी उपस्थित असलेले एनडीआरएफचे कमांडर विजेंद्र दाहिवा यांनी संकटकाळी घटनास्थळी उपस्थित राहण्याच्या दृष्टीने आराखडा सादर केला. तर, मीरा-भार्इंदर महापालिकेच्या बचाव व शोध पथकास प्रशिक्षण देण्याचे दाहिवा यांनी मान्य केले. जिल्ह्यात ठिकठिकाणी असलेल्या वीजअटकाव यंत्रणेच्या दुरुस्तीसह पर्जन्यमापक यंत्रणेतील सुधारणा करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत संबंधित अधिकाºयांना दिल्या.मिळणार पर्जन्यमानाचा अंदाज : संभाव्य पर्जन्यमानाची माहिती हवामान खात्याचे उपमहानिर्देशक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. याशिवाय, पावसाच्या कालावधीत सतर्क राहण्याच्या दृष्टीने सर्व अधिकाºयांना तत्काळ एसएमएस व ई-मेल पाठवण्यात येणार असून त्यासाठी अधिकाºयांनी तत्काळ मोबाइल क्रमांकासह ई-मेलनोंदणीची सक्ती केली आहे. आरोग्यासाठी औषधांचा साठा, नाल्यांची साफसफाई, औद्योगिक सुरक्षा, सोशल मीडियावर अपप्रचारावरील नियंत्रणावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षाने लक्ष केंद्रित केले आहे.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाmonsoon 2018मान्सून 2018