शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पावसामुळे पोलीस भरतीला फटका; बुधवारची मैदानी चाचणी पुढे ढकलली

By धीरज परब | Updated: June 19, 2024 18:46 IST

सदर पोलीस शिपाई भरतीसाठीची मैदानी चाचणी दिनांक १९ व २५ जून या दरम्यान भाईंदर पश्चिमेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान या ठिकाणी घेण्यात येणार होती . 

मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात पोलीस शिपाई पदांच्या भरतीच्या अनुषंगाने बुधवारी १९ जून रोजीची मैदानी चाचणी पावसा मुळे पुढे ढकलावी लागली . आता ही चाचणी २६ जून रोजी होणार आहे . तर गुरुवार पासून २५ जून पर्यंतच्या तारखा दिलेल्या विद्यार्थ्यांची मैदानी चाचणी देखील पावसावर अवलंबून राहणार आहे . 

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर सन २०२२-२३ मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी २३१ पदे भरण्याकरीता पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात आली आहे. ह्या रिक्त २३१ पदाकरीता १५२३ महिला तसेच ६९०० पुरुष असे एकुण ८४२३ अर्ज आले आहेत . 

सदर पोलीस शिपाई भरतीसाठीची मैदानी चाचणी दिनांक १९ व २५ जून या दरम्यान भाईंदर पश्चिमेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान या ठिकाणी घेण्यात येणार होती .  त्यानुसार प्रति दिवस साधारण ५५० उमेदवारांची चाचणी घेण्याचे वेळापत्रक आखण्यात आले आहे. मैदानी चाचणीमध्ये पुरुषांकरीता १६०० मी. धावणे, १०० मी. धावणे व गोळाफेक तसेच महिलांकरीता ८०० मी. धावणे, १०० मी. धावणे व गोळाफेक चाचण्या घेतल्या जाणार आहेत . 

मात्र आज बुधवारी मैदानी चाचणीच्या पहिल्याच दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने चाचणीसाठी उमेदवार काहीसे कमी आले . शिवाय पावसा मुळे केवळ छाती आणि उंची चे मोजमाप घेण्यात आले . आज मैदानी चाचणी न झालेल्या उमेदवारांना आता २६ जून रोजी बोलावण्यात आले आहे . मैदानावर चिखल झालेल्या ठिकाणी वाळू व लाकडी भुसा टाकण्यात आला आहे . पावसामुळे मैदानात चिखल होऊ नये यासाठी मैदान ताडपत्रीने झाकून ठेवले गेले आहे . शिवाय मंडप उभारण्यात आला आहे . जेणे करून उमेदवारांची बायोमेट्रिक तपासणी व नोंद तसेच मंडपातील चाचण्या घेता येणे शक्य होईल . तसेच मंडपामुळे भरतीसाठी येणारे उमेदवार पावसात भिजणार नाहीत . १०० मिटर रनिंग व गोळा फेक होणार आहे तर  १६०० मिटर धावणे हि चाचणी बाजूला बनलेल्या नवीन सिमेंट रस्त्यावर घेतली जाणार आहे . पावसामुळे आज अनेक उमेदवार भिजले होते .  

दरम्यान पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी व पैशांचा गैरवापर होऊ नये ह्यावर विशेष लक्ष दिले जात आहे . त्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या गेल्या आहेत .  रेडीओ फ्रीक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्र चा वापर करण्याचे शासन आदेश असून त्याची अमलबजावणी केली जात आहे . पावसाच्या अनुषंगाने तयारी करण्यात आली असून उद्यापासून किंवा परवा पासून मैदानी चाचणी पुन्हा सुरू केली जाईल असे अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी म्हटले आहे  . 

टॅग्स :Policeपोलिस