शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

अवकाळी पावसाचा ५१ हजार शेतकऱ्यांना २१ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 01:37 IST

३१,५७७ हेक्टर पीक नष्ट : नुकसानभरपाई हेक्टरी अवघी ६८०० रु.

सुरेश लोखंडे 

ठाणे : अवकाळी पावसाने ठाणे जिल्ह्यातील ५१ हजार ५१ शेतकऱ्यांच्या ३१ हजार ५७७ हेक्टरवरील खरीप हंगामाचे पीक नष्ट झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकºयांना हेक्टरी सुमारे सहा हजार ८०० रुपये नुकसानभरपाई देण्याच्या हालचाली सुरू आहे. यानुसार जिल्ह्यातील शेतकºयांना अंदाजे २१ कोटी ४१ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याच्या दृष्टीने नियोजन केले जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. यासाठी आतापर्यंत १६ हजार ७२८ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

अवकाळी पावसाने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हजारो शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत शासनाकडून देण्यात येणारी नुकसानभरपाई अत्यल्प असल्याने शेतकºयांत युती सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आहे. मात्र, ही नुकसानभरपाई दुप्पट देण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.लोकमतने अवकाळी पावसाने शेतकºयांच्या झालेल्या नुकसानीवर प्रकाशझोत टाकल्यानंतर रविवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत तर मंगळवारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शहापूर-मुरबाड तालुक्यात शेतांत जाऊन शेतकºयांना दिलासा देऊन तत्कान पंचनामे करण्याचे आदेश संबधित अधिकाºयांना दिले आहेत.५२२.४५ हेक्टरवरील पिकांना विमासंरक्षणजिल्ह्यातील ठाणे, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, भिवंडी आदी सहा तालुक्यांमध्ये यंदा ६१ हजार ९२ हेक्टरवर खरीप हंगाम घेण्यात आला. यापैकी अवकाळी पावसामुळे तब्बल ३१ हजार ५७७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.या ५१ हजार शेतकºयांच्या शेतांमधील पिकांचे नुकसान झाल्यामुळे ते सध्या हवालदिल झाले आहेत. यात नऊ हजार ५६९.२२ हेक्टरवरील काढणी झालेल्या १६ हजार ८७७ शेतकºयांच्या पिकांचा समावेश आहे. या शेतकºयांनी काढणी केल्यानंतर अवकाळी पावसात पीक भिजल्यामुळे नुकसान झाले आहे.शेतात उभे असलेल्या सात हजार १५९.३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून त्याचा ११ हजार ३६४ शेतकºयांना फटका बसला आहे. यापैकी सोमवारपर्यंत २८ हजार २३६ शेतकºयांच्या १६ हजार ७२८.५४ हेक्टर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यापैकी ५२२.४५ हेक्टरवरील नुकसानग्रस्त पिकांना विम्याचे संरक्षण असल्याचे उघडकीस आले आहे.१४ हजार ८४९ हेक्टरक्षेत्राचे पंचनामे शिल्लकपीकविम्याचे संरक्षण असलेल्यांमध्ये दोन हजार ८६० शेतकºयांचा समावेश आतापर्यंतच्या पंचनाम्यांवरून निदर्शनात आले आहेत. पंचनामे झाल्यानंतर पीकविम्याचे संरक्षण असलेल्या शेतकºयांच्या संख्येत वाढ होण्याची अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. अजूनपर्यंत शिल्लक राहिलेल्या १४ हजार ८४९ हेक्टरवरील पीकनुकसानीचे पंचनामे करण्याचे काम जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू आहे. पंचनाम्यानंतर विमासंरक्षण असल्याचे उघड झालेल्यांमध्ये सर्वाधिक मुरबाड तालुक्यातील दोन हजार ४५० शेतकºयांचा समावेश आहे. त्यांच्या ४३१ हेक्टरवरील पिकाला विम्याचेदेखील संरक्षण आहे. या मुरबाड तालुक्यात नऊ हजार १४९ शेतकºयांच्या सहा हजार ७०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज निश्चित केला आहे. यापैकी आतापर्यंत सहा हजार ३८४ शेतकºयांच्या चार हजार ३८७ हेक्टरवरील पीकनुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यामध्ये एक हजार ९७४ हेक्टरवरील कापणी झालेल्या दोन हजार ८७३ शेतकºयांचा तर दोन हजार ४१३ हेक्टरवरील उभे पिक असलेल्या तीन हजार ५११ शेतकºयांचा समावेश आहे. 

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस