शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

अवकाळी पावसाचा ५१ हजार शेतकऱ्यांना २१ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 01:37 IST

३१,५७७ हेक्टर पीक नष्ट : नुकसानभरपाई हेक्टरी अवघी ६८०० रु.

सुरेश लोखंडे 

ठाणे : अवकाळी पावसाने ठाणे जिल्ह्यातील ५१ हजार ५१ शेतकऱ्यांच्या ३१ हजार ५७७ हेक्टरवरील खरीप हंगामाचे पीक नष्ट झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकºयांना हेक्टरी सुमारे सहा हजार ८०० रुपये नुकसानभरपाई देण्याच्या हालचाली सुरू आहे. यानुसार जिल्ह्यातील शेतकºयांना अंदाजे २१ कोटी ४१ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याच्या दृष्टीने नियोजन केले जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. यासाठी आतापर्यंत १६ हजार ७२८ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

अवकाळी पावसाने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हजारो शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत शासनाकडून देण्यात येणारी नुकसानभरपाई अत्यल्प असल्याने शेतकºयांत युती सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आहे. मात्र, ही नुकसानभरपाई दुप्पट देण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.लोकमतने अवकाळी पावसाने शेतकºयांच्या झालेल्या नुकसानीवर प्रकाशझोत टाकल्यानंतर रविवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत तर मंगळवारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शहापूर-मुरबाड तालुक्यात शेतांत जाऊन शेतकºयांना दिलासा देऊन तत्कान पंचनामे करण्याचे आदेश संबधित अधिकाºयांना दिले आहेत.५२२.४५ हेक्टरवरील पिकांना विमासंरक्षणजिल्ह्यातील ठाणे, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, भिवंडी आदी सहा तालुक्यांमध्ये यंदा ६१ हजार ९२ हेक्टरवर खरीप हंगाम घेण्यात आला. यापैकी अवकाळी पावसामुळे तब्बल ३१ हजार ५७७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.या ५१ हजार शेतकºयांच्या शेतांमधील पिकांचे नुकसान झाल्यामुळे ते सध्या हवालदिल झाले आहेत. यात नऊ हजार ५६९.२२ हेक्टरवरील काढणी झालेल्या १६ हजार ८७७ शेतकºयांच्या पिकांचा समावेश आहे. या शेतकºयांनी काढणी केल्यानंतर अवकाळी पावसात पीक भिजल्यामुळे नुकसान झाले आहे.शेतात उभे असलेल्या सात हजार १५९.३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून त्याचा ११ हजार ३६४ शेतकºयांना फटका बसला आहे. यापैकी सोमवारपर्यंत २८ हजार २३६ शेतकºयांच्या १६ हजार ७२८.५४ हेक्टर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यापैकी ५२२.४५ हेक्टरवरील नुकसानग्रस्त पिकांना विम्याचे संरक्षण असल्याचे उघडकीस आले आहे.१४ हजार ८४९ हेक्टरक्षेत्राचे पंचनामे शिल्लकपीकविम्याचे संरक्षण असलेल्यांमध्ये दोन हजार ८६० शेतकºयांचा समावेश आतापर्यंतच्या पंचनाम्यांवरून निदर्शनात आले आहेत. पंचनामे झाल्यानंतर पीकविम्याचे संरक्षण असलेल्या शेतकºयांच्या संख्येत वाढ होण्याची अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. अजूनपर्यंत शिल्लक राहिलेल्या १४ हजार ८४९ हेक्टरवरील पीकनुकसानीचे पंचनामे करण्याचे काम जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू आहे. पंचनाम्यानंतर विमासंरक्षण असल्याचे उघड झालेल्यांमध्ये सर्वाधिक मुरबाड तालुक्यातील दोन हजार ४५० शेतकºयांचा समावेश आहे. त्यांच्या ४३१ हेक्टरवरील पिकाला विम्याचेदेखील संरक्षण आहे. या मुरबाड तालुक्यात नऊ हजार १४९ शेतकºयांच्या सहा हजार ७०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज निश्चित केला आहे. यापैकी आतापर्यंत सहा हजार ३८४ शेतकºयांच्या चार हजार ३८७ हेक्टरवरील पीकनुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यामध्ये एक हजार ९७४ हेक्टरवरील कापणी झालेल्या दोन हजार ८७३ शेतकºयांचा तर दोन हजार ४१३ हेक्टरवरील उभे पिक असलेल्या तीन हजार ५११ शेतकºयांचा समावेश आहे. 

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस