शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रोखण्यासाठी परप्रांतीय प्रवाशांवर केडीएसमसीसह रेल्वे पोलिसांचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:42 IST

कल्याण : परप्रांतातून येणाऱ्या रेल्वे गाड्यांमधून कल्याणला येणारे प्रवासी आरटी - पीसीआर टेस्ट न करताच येत आहेत. त्यामुळे कल्याणमध्ये ...

कल्याण : परप्रांतातून येणाऱ्या रेल्वे गाड्यांमधून कल्याणला येणारे प्रवासी आरटी - पीसीआर टेस्ट न करताच येत आहेत. त्यामुळे कल्याणमध्ये पुन्हा कोरोना पसरू शकतो. अशा परप्रांतीय प्रवाशांवर कल्याण- डोंबिवली महापलिका आणि रेल्वे पोलीस करडी नजर ठेवणार आहेत. त्यासाठी बुधवारी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रेल्वेस्थानकास भेट देऊन पाहणी केली.

या पाहणी दौऱ्याच्या वेळी रेल्वेचे एरिया मॅनेजर प्रमोद जाधव यांच्यासह महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, रेल्वे पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने इत्यादी उपस्थित होते. सध्या कल्याण रेल्वेस्थानकात अँटिजन टेस्टिंगचे एकच सेंटर सुरू आहे. त्यामुळे आणखी दोन सेंटर सुरू केली जातील. त्यानंतर एकूण तीन टेस्टिंग सेंटर होतील. या तिन्ही सेंटरवर सकाळी ७ ते ११ आणि ४ ते ५ वाजेपर्यंत टेस्टिंग काऊंटर टेबल लावून प्रवाशांची अँटिजन टेस्ट केली जाणार आहे. सकाळच्या वेळेत उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमधून लांब पल्ल्याच्या गाड्या कल्याण रेल्वेस्थानकात दाखल होतात. या परप्रांतीय रेल्वे प्रवाशांची रेल्वेस्थानकात टेस्ट केल्याशिवाय त्यांना शहरात प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिली.

सध्या महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. रुग्णसंख्या कमी करण्यासाठी कडक निर्बंध लादले आहेत. त्याचबरोबर लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जात आहे, अशा परिस्थितीत रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांतून कल्याणमध्ये दाखल होणाऱ्या परप्रांतीय प्रवाशांची टेस्ट काळजीपूर्वक केली गेली नाही तर शहरात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. ही गंभीर बाब लक्षात घेऊन आयुक्तांनी ही पाहणी केली आहे. एकही प्रवासी अँटिजन टेस्टशिवाय शहरात प्रवेश करणार नाही, याची खबरदारी रेल्वे, महापालिका आणि रेल्वे पोलीस घेणार आहेत, असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले. टेस्ट न करताच शहरात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करता येते का, याचाही प्रशासनाकडून विचार केला जाणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.

शहरात विनाकारण मोकाट फिरणाऱ्यांवर ज्या प्रकारे महापालिका आणि पोलिसांची कारवाई सुरू आहे. त्याच धर्तीवर रेल्वेस्थानकातील परप्रांतीय प्रवाशांवर नजर ठेवली जाणार आहे.

ज्या रेल्वे स्थानकातून प्रवास सुरू होतो. त्याच राज्यातील प्रवाशाने प्रवास सुरू करण्यापूर्वी ४८ तास आधीचा आरटी-पीसीआर निगेटिव्हचा रिपोर्ट जवळ ठेवून प्रवास सुरु करायचा आहे. कल्याणमध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यातून येणारे परप्रांतीय ९० टक्के प्रवासी आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह असलेला अहवाल न घेताच प्रवास करीत असल्याची बाब उघड झाली होती.

--------------------------