शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
3
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
4
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
7
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
8
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
9
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
10
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
11
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
12
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
13
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
14
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
15
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
16
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
17
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
18
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
19
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
20
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय

पत्रीपुलाच्या कामात रेल्वेचे असहकार्य? नरेंद्र पवार यांनी ‘एमएसआरडीसी’कडून घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 03:13 IST

कल्याणमधील पत्रीपूल धोकादायक झाल्यामुळे पाडण्यात आला. महिना उलटला तरी या पुलाचे काम बंद आहे.

डोंबिवली : कल्याणमधील पत्रीपूल धोकादायक झाल्यामुळे पाडण्यात आला. महिना उलटला तरी या पुलाचे काम बंद आहे. आमदार नरेंद्र पवार यांनी महाराष्टÑ राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अधिकाऱ्यांसोबत शनिवारी पुलाची पाहणी केली. तेव्हा या अधिका-यांकडे पवार यांनी बांधकामाबाबत विचारणा केली असता रेल्वे प्रशासनाकडून काही तांत्रिक परवानग्यांना विलंब लागत असल्याने काम रखडल्याचे सांगितले.पत्रीपुलाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पवार यांच्यासोबत एमएसआरडीसीचे उपअभियंता अनिरुद्ध बोरडे, कंत्राटदार दीपक मंगल, सल्लागार एल.एन. मालवीय उपस्थित होते. १८ नोव्हेंबरला मध्य रेल्वेने सहा तासांचा पॉवरब्लॉक घेऊ न १०४ वर्षांचा जुना पत्रीपूल पाडण्यात आला. तेव्हा याठिकाणी लवकरात लवकर नवा पूल उभारण्याचे आश्वासन एमएसआरडीसीने दिले होते. मात्र, महिना उलटूनही पुलाचे काम कूर्मगतीने सुरू असल्याने पवार यांनी संताप व्यक्त केला. सध्या वाहतुकीचा संपूर्ण भार हा बाजूलाच असलेल्या नव्या पुलावर येत असून वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. वारंवार विचारणा करूनही अधिकारी माहिती देत नसल्याने पवार यांनी या पुलाच्या कामाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संबंधित अधिकाºयांची धावाधाव झाली. अधिकाºयांना काम रखडण्यामागचे कारण विचारताच रेल्वेकडून तांत्रिक परवानग्या मिळण्यात विलंब लागत असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर, पवार यांनी खासदार कपिल पाटील यांना संपर्क साधला असता त्यांनी यावर तत्काळ तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.रेल्वेने सहकार्य केल्यासवर्षभरात पूल बांधणाररेल्वेने सहकार्य केल्यास वर्षभरात पूल उभा राहण्याचे आश्वासन अधिकाºयांनी पवार यांना दिले. त्यावर यापुढे रेल्वेकडून कसलाही विलंब होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार असल्याचे सांगितले. नागरिकांना होणारा त्रास आणि शहरातील वाहतुकीवरील ताण लक्षात घेता संबंधित सर्व यंत्रणांनी नव्या पत्रीपुलाच्या बांधकामाला गती देण्याची आवश्यकता असल्याचे पवार म्हणाले.

टॅग्स :thaneठाणे