शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बाळा’चे बदललेले रक्त बाईचे की आईचे? चाैकशी समितीने सादर केलेल्या अहवालाने खळबळ
2
पाकच्या मदतीसाठी चीनने उभारले बंकर; नियंत्रण रेषेलगत कम्युनिकेशन टॉवरही बांधले!
3
सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच
4
१८ वर्षांनी राहु शनी नक्षत्रात गोचर: ७ राशींना लॉटरी, शेअर बाजारात फायदा; प्रमोशन, धनलाभ योग!
5
तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? जून महिन्यात ठरतील लकी, लाभेल सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!
6
वीकएण्डचा वाजणार बोऱ्या! मध्य रेल्वेवर उद्यापासून तीन दिवस जम्बो ब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द
7
मनुस्मृती दहन करताना आमदार आव्हाड यांनी फाडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो
8
कीर्ती व्यास हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप; अत्यंत थंड डोक्याने कृत्य केल्याचा वकिलांचा युक्तिवाद
9
Porsche Car Accident: 'बाळा'च्या ब्लड सँपलची ससून रुग्णालयात अदलाबदल; ते खासगी इसम कोण?
10
सचिन वाझेच्या तुरुंगाबाहेर पडण्याबाबतच्या अर्जावर उत्तर द्या; उच्च न्यायालयाचे सीबीआयला निर्देश
11
सरकारी कर्मचारी भ्रष्ट म्हणणे तक्रारदाराला भाेवले; कारवाई रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
12
राधानगरीतील ८४ गावांत वाढणार इको टुरिझम; MSRDCकडून विकास आराखड्याचे काम सुरू
13
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
14
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
15
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
16
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
17
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
18
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
19
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
20
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर

मनसेच्या आंदोलनावर रेल्वे प्रवासी संघटनांची सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2018 7:38 PM

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास जीवघेणा झाला असून कोणालाही उलट्या दिशेने प्रवास करण्याची इच्छा नाही.

डोंबिवली: मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास जीवघेणा झाला असून कोणालाही उलट्या दिशेने प्रवास करण्याची इच्छा नाही. त्यात वेळ जातो, पाससाठी पैसे जातात पण पर्यायाअभावी तसे करावे लागते, असे सांगत तेजस्वीनी महिला प्रवासी संघटनेने मनसेच्या आंदोलनाला विरोध केला. प्रवाशांना वेठीस धरून केल्या जाणा-या आंदोलनाला महिला प्रवासी संघटना कधीही समर्थन करणार नसून सामंजस्याने, चर्चेने समस्या सोडवण्यावर भर देणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.उलट दिशेने प्रवास करणा-या प्रवाशांचे समर्थन नाही, पण त्यांना असलेल्या अडचणी जाणून घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे ज्यांनी आंदोलन केले त्यांनी आधी प्रवाशांशी चर्चा करावी, त्यांच्या व्यथा समजून घ्याव्यात. त्या सोडवण्यासाठी प्रवाशांना वेठीस धरणे, रेल्वे प्रशासनासह पोलीस यंत्रणेला कार्यवाहीसाठी भाग पाडणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया अध्यक्षा लता अरगडे यांनी व्यक्त केली. ज्यांच्या वयाची ३५/४० वर्षे झाली आहेत, अशा महिलांसह पुरुषांना गर्दीच्या स्थानकांमधून प्रवास करताना अनंत अडचणी आहेत. त्यामुळे त्यातील काही प्रमाणात प्रवासी डाऊन अप अशा उलट्या प्रवासाचा तोडगा स्वीकारतात. त्यामुळे आंदोलन करणे हा उपाय नाही, तर सामंजस्याने समस्या सोडवण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.केवळ अंबरनाथ स्थानकातील ही समस्या नसून ठाणे, कळवा, दिवा, कोपर, डोंबिवली, ठाकुर्ली, कल्याणसह बदलापूर, टिटवाळा आदी स्थानकांमध्ये तसेच पश्चिम रेल्वेच्या लांबच्या गाड्यांमध्ये असा प्रवास केला जातो. डोंबिवली स्थानकातून सकाळच्या वेळेत प्रवास करताना प्रचंड हाल होतात. पण तरीही येथील प्रवासी कोपर, दिव्यापासून आलेल्या प्रवाशांसोबत बंधूभावानेच वागतात. त्यामुळे तो पर्याय नसून गाड्या वाढवणे, तसेच डब्यांमध्ये काही जागा या संबंधित स्थानकांमधील प्रवाशांना देणे असे विविध पर्याय असू शकतात. कल्याणच्या प्रवाशांनी असा तोडगा काढला असल्याचे त्यांनी सांगितले.

  •  यासंदर्भात प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, मनसेचे रेल्वे विषय प्रमुख जितू पाटील यांना संपर्क साधून पक्षाध्यक्ष राज ठाकरेंनाही हे आंदोलन होणे अपेक्षित नसेलच, त्यामुळे संघटनांच्या भावना पोहोचवा असेही आवाहन केले.
  • प्रवाशांना वेठीस धरणे उचित नाहीच, सहप्रवासी म्हणुन सगळयांना सांभाळून घेणे आवश्यक आहे. सामंजस्याची भूमिका महत्वाची आहे. प्रवाशांनी ठिकठिकाणच्या संघटनांकडे यावे सगळे मिळून सुवर्णमध्य काढू - राजेश घनघाव, अध्यक्ष के३ संघटना
  • बदलापूरच्या प्रवाशांनाही अनेक समस्या आहेत, त्या स्थानकातून सुटणा-या लोकलमध्येही ठिकठिकाणाहून प्रवासी येतात, पण म्हणुन काही त्यांच्यावर कारवाई करावी असा पवित्रा योग्य नाहीच. त्यामुळे आंदोलनाचे समर्थन नाहीच - संजय मेस्त्री, बदलापूर
  • आंदोलनाचा विषय नसून प्रबोधनाचा विषय आहे, प्रवाशांच्या भावना समजून घेणे आहे. पास काढणा-यांना आपण रोखू शकत नाही. तिकिट नसणा-यांना रोखणे योग्य पण नाहक प्रवाशांना वेठीस धरणे योग्य नाही - अ‍ॅड.आदेश भगत, सदस्य, डिआरयुसीसी, मध्य रेल्वे