शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रायगडच अव्वल

By admin | Updated: June 18, 2014 03:20 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने गेल्या ३ ते २७ मार्च दरम्यान घेतलेल्या दहावी शालान्त (एसएससी) परीक्षेचा निकाल आज आॅनलाइन जाहीर करण्यात आला.

अलिबाग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने गेल्या ३ ते २७ मार्च दरम्यान घेतलेल्या दहावी शालान्त (एसएससी) परीक्षेचा निकाल आज आॅनलाइन जाहीर करण्यात आला. यात मुंबई विभागातील ठाणे, रायगड, बृहन्मुंबई, मुंबई उपनगर-०१ आणि मुंबई उपनगर-२ अशा पाच जिल्ह्यात रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी अव्वल स्थान प्राप्त केले आहे. जिल्ह्याचा निकाल तब्बल ८९.७९ टक्के लागला आहे. ठाणे-८९.७५, बृहन्मुंबई-८८.२७, मुंबई उपनगर(१)-८८.७४ आणि मुंबई उपनगर(२)-८६ टक्के निकाल लागला आहे.जिल्ह्यातील ५०७ शाळांमधील २० हजार ३९२ मुले तर १८ हजार ४५ मुली अशा ३८ हजार ३६० विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते. तर २० हजार ३४८ मुले तर १८ हजार ०१२ मुली असे एकूण ३८ हजार ३६० विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस बसले होते. त्यापैकी ९१.८९ टक्के म्हणजे १६ हजार ५५२ मुली तर ८७.९२ टक्के म्हणजे १७ हजार ८९० मुले उत्तीर्ण झाली आहेत. उत्तीर्ण होण्यात जिल्ह्यात मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक आहे. प्रत्यक्ष परीक्षेस बसलेल्या ३८ हजार ३६० विद्यार्थ्यांपैकी ६ हजार १९८ विद्यार्थी विशेष उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीत ११ हजार ८२१, द्वितीय श्रेणीत १२ हजार ९८८ तर उत्तीर्ण श्रेणीत ३ हजार ४३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. (विशेष प्रतिनिधी)