शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

पर्यावरण रक्षणाकरिता रायगड ते एव्हरेस्ट पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:39 IST

नितीन पंडित भिवंडी : ‘एक झाड माणुसकीचं, एक पाऊल परिवर्तनाचं’ ही पर्यावरण रक्षणाची मोहीम हाती घेऊन रायगड ते सर्वोच्च ...

नितीन पंडित

भिवंडी : ‘एक झाड माणुसकीचं, एक पाऊल परिवर्तनाचं’ ही पर्यावरण रक्षणाची मोहीम हाती घेऊन रायगड ते सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट असे सुमारे दोन हजार किलोमीटरचे अंतर पायी चालत जाण्याचा उपक्रम भिवंडीतील २४ वर्षांच्या सिद्धार्थ गणाई याने हाती घेतला आहे. या प्रवासात गणाई वेगवेगळ्या गावात, शहरात तेथील नागरिकांना झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश देणार आहे. सिद्धार्थच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

गणाई या ध्येयवेड्या पर्यावरणवादी तरुणाने २० जुलै रोजी किल्ले रायगड येथील छ. शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन रायगड ते माउंट एव्हरेस्ट या मोहिमेला सुरुवात केली. सिद्धार्थ अंधेरी येथील भवन्स महाविद्यालयात बी.एस्सी.च्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत असून भिवंडीतील बापगाव येथील मैत्रिकुल येथे तो आपल्या मित्रांसोबत राहतो. पाच वर्षांपासून त्याने माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. मात्र त्यासाठी येणारा खर्च मोठा असल्याने सिद्धार्थने मोटारसायकल, सायकल, स्केटिंग अशा सर्व पर्यायांचा विचार व अभ्यास केला. मात्र त्यात खर्च व अडचणी जास्त असल्याने सिद्धार्थने पायी प्रवास करून माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा निर्धार केला. या मोहिमेत चालत जातांना प्रकृती बिघडू नये म्हणून फक्त घरचे जेवण व पाणी मिळावे, असे आवाहन तो पायी जाताना करत आहे. शिवाय ‘एक झाड माणुसकीचं, एक पाऊल परिवर्तनाचं’ हा सामाजिक संदेश देत आहे.

सिद्धार्थचे बालपण अत्यंत हलाखीत गेले. तो लहान असतानाच आईवडिलांचा घटस्फोट झाला. त्यावेळी पालन-पोषणाची जबाबदारी वडिलांनी स्वीकारली; मात्र वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने लहानपणी एक ते दोन वर्षे सिद्धार्थने मुंबईतील अंधेरी येथील एका पुलाखाली बालपण काढले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने सिद्धार्थच्या आईचा शोध घेण्यात आला. त्याची आई केरळ येथे असल्याने सिद्धार्थचे प्राथमिक शिक्षण केरळ येथे झाले. २०११ पासून तो मुंबईत परतला. त्यानंतर मावशी व इतर नातेवाइकांनी त्याचा सांभाळ केला. सध्या तो भिवंडीतील बापगाव येथील मैत्रीकुल येथे राहत असून विद्यार्थी भारती संघटनेचा सदस्य आहे. त्याच्या या मोहिमेला कोणतीही शासकीय मदत मिळालेली नसून त्याने स्वतःच पायपीट करून आपले स्वप्न साकार करण्याचे ठरवले आहे. सिद्धार्थ याचा नवव्या दिवसाचा प्रवास भिवंडीतून सुरू झाला. यावेळी पडघा परिसरातील युवा कवी मिलिंद जाधव यांनी त्याचे स्वागत केले. एक झाड लावून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

..............

झाडांची होत असलेली कत्तल आणि निसर्गाचा कोप ही परिस्थिती मानवावर ओढवण्याचे मूळ कारण आपणच आहोत, ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करणारे देखील आपणच असणार आहोत. यासाठी हा एक छोटा प्रयत्न करत आहे.

-सिद्धार्थ गणाई, पर्यावरणवादी कार्यकर्ता, भिवंडी

............

वाचली