शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

'मच्छर भगाओ'वाली अगरबत्ती वापरत असाल, तर ही आहे धोक्याची घंटा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 16:18 IST

अगरबत्तीसाठी लागणारा कच्चा माल आणून भिवंडी-काल्हेर येथे सुप्रसिद्ध ब्रॅंडने त्याची विक्री सुगंधित अगरबत्ती म्हणून होत असल्याची घटना समोर आली आहे. 

ठळक मुद्देअगरबत्तीसाठी लागणारा कच्चा माल आणून भिवंडी-काल्हेर येथे सुप्रसिद्ध ब्रॅंडने त्याची विक्री सुगंधित अगरबत्ती म्हणून होत असल्याची घटना समोर आली आहे. ठाणे कृषी अधिकारी व घरगुती कीटकनाशक नियंत्रण संघाच्या समन्वयाने कारखान्यावर छापा टाकण्यात आला. छापेमारी स्लिपवेल, बालाजी रिलॅक्स, किलर आणि रिलीफ यांसारख्या या ब्रॅण्डनावांसह काही असुरक्षित धूप कांड्या सापडल्या आहेत.

भिवंडी - अगरबत्तीसाठी लागणारा कच्चा माल आणून भिवंडी-काल्हेर येथे सुप्रसिद्ध ब्रॅंडने त्याची विक्री सुगंधित अगरबत्ती म्हणून होत असल्याची घटना समोर आली आहे. या अगरबत्तीमधील केमिकल वापरण्यास बंदी आहे. तसेच कुठलाही शासन परवाना न घेता त्याचा अगरबत्तीमध्ये सर्रास वापर केला जात होता. ठाणे कृषी अधिकाऱ्यांना याबाबती माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे. ठाणे कृषी अधिकारी व घरगुती कीटकनाशक नियंत्रण संघाच्या समन्वयाने कारखान्यावर छापा टाकण्यात आला. या छापेमारी स्लिपवेल, बालाजी रिलॅक्स, किलर आणि रिलीफ यांसारख्या या ब्रॅण्डनावांसह काही असुरक्षित धूप कांड्या सापडल्या आहेत.

सध्या सुगंधी अगरबत्तीसह मच्छर अगरबत्ती मोठ्या प्रमाणावर विकल्या जातात. या अगरबत्तीसाठी लागणारा कच्चा माल चीनमधून आयात करून त्यांना भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील कारखान्यात विविध सुगंधी रासायनिक द्रव्यांत मिसळीत करून विकला जातो. अगरबत्त्या विविध नावाने पॅकिंग करून विक्री करण्याचा कारखाना 'डिवाईन फ्रॅग्नेंसीस' बी१/बीं२ राजलक्ष्मी कॉम्प्लेक्स, काल्हेर, भिवंडी येथे मोकाटपणे सुरु होता. चौकशीत आढळले डिवाईन फ्रॅग्नेंसीस कंपनीकडे रासायनिक द्रव्य वापरण्याचा कोणताही परवाना नाही. कारखान्यातील रासायनिक द्रव्य कृषी क्षेत्रात फवारणी म्हणून वापरले जाणारे व आरोग्यास घातक असून त्याचा अतिवापर मानवी आरोग्यास घातक आहे.

होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन (एचआयसीए) चे संचालक, जयंत देशपांडे यांनी याबाबत माहिती दिली. जयंत देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे रसायन मानवी आरोग्यास फार हानिकारक आहे व त्याचा शेतीमध्ये फवारणी साठी किती प्रमाणात उपयोग केला जावा याची एक गाईडलाईन निश्चित केली आहे. रसायन अति प्रमाणात वापरल्यास विविध आजार होण्याची शक्यता आहे. उदा. त्वचा विकार, डोळ्यांचे विकार, फुफुसाला संसर्ग किंवा मनुष्याच्या जीवितास सुद्धा धोका होऊ शकतो.

विदर्भात औषध फवारणीमुळे कित्येक कुटुंबाचे जीव गेल्याची घटना ताजी असतानाच कृषी विभाग, ठाणे व होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन (एचआयसीए) यांच्या मदतीने भिवंडीतील कारखान्यावर छापेमारी करण्यात आली. यावेळी कारखान्यात मानवी आरोग्यास घातक असा रासायनिक साठा विनापरवाना आढळून आला. येथील रसायनांचे सर्व नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविल्यानंतर सदर कारखान्यावर कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडी