शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

'मच्छर भगाओ'वाली अगरबत्ती वापरत असाल, तर ही आहे धोक्याची घंटा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 16:18 IST

अगरबत्तीसाठी लागणारा कच्चा माल आणून भिवंडी-काल्हेर येथे सुप्रसिद्ध ब्रॅंडने त्याची विक्री सुगंधित अगरबत्ती म्हणून होत असल्याची घटना समोर आली आहे. 

ठळक मुद्देअगरबत्तीसाठी लागणारा कच्चा माल आणून भिवंडी-काल्हेर येथे सुप्रसिद्ध ब्रॅंडने त्याची विक्री सुगंधित अगरबत्ती म्हणून होत असल्याची घटना समोर आली आहे. ठाणे कृषी अधिकारी व घरगुती कीटकनाशक नियंत्रण संघाच्या समन्वयाने कारखान्यावर छापा टाकण्यात आला. छापेमारी स्लिपवेल, बालाजी रिलॅक्स, किलर आणि रिलीफ यांसारख्या या ब्रॅण्डनावांसह काही असुरक्षित धूप कांड्या सापडल्या आहेत.

भिवंडी - अगरबत्तीसाठी लागणारा कच्चा माल आणून भिवंडी-काल्हेर येथे सुप्रसिद्ध ब्रॅंडने त्याची विक्री सुगंधित अगरबत्ती म्हणून होत असल्याची घटना समोर आली आहे. या अगरबत्तीमधील केमिकल वापरण्यास बंदी आहे. तसेच कुठलाही शासन परवाना न घेता त्याचा अगरबत्तीमध्ये सर्रास वापर केला जात होता. ठाणे कृषी अधिकाऱ्यांना याबाबती माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे. ठाणे कृषी अधिकारी व घरगुती कीटकनाशक नियंत्रण संघाच्या समन्वयाने कारखान्यावर छापा टाकण्यात आला. या छापेमारी स्लिपवेल, बालाजी रिलॅक्स, किलर आणि रिलीफ यांसारख्या या ब्रॅण्डनावांसह काही असुरक्षित धूप कांड्या सापडल्या आहेत.

सध्या सुगंधी अगरबत्तीसह मच्छर अगरबत्ती मोठ्या प्रमाणावर विकल्या जातात. या अगरबत्तीसाठी लागणारा कच्चा माल चीनमधून आयात करून त्यांना भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील कारखान्यात विविध सुगंधी रासायनिक द्रव्यांत मिसळीत करून विकला जातो. अगरबत्त्या विविध नावाने पॅकिंग करून विक्री करण्याचा कारखाना 'डिवाईन फ्रॅग्नेंसीस' बी१/बीं२ राजलक्ष्मी कॉम्प्लेक्स, काल्हेर, भिवंडी येथे मोकाटपणे सुरु होता. चौकशीत आढळले डिवाईन फ्रॅग्नेंसीस कंपनीकडे रासायनिक द्रव्य वापरण्याचा कोणताही परवाना नाही. कारखान्यातील रासायनिक द्रव्य कृषी क्षेत्रात फवारणी म्हणून वापरले जाणारे व आरोग्यास घातक असून त्याचा अतिवापर मानवी आरोग्यास घातक आहे.

होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन (एचआयसीए) चे संचालक, जयंत देशपांडे यांनी याबाबत माहिती दिली. जयंत देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे रसायन मानवी आरोग्यास फार हानिकारक आहे व त्याचा शेतीमध्ये फवारणी साठी किती प्रमाणात उपयोग केला जावा याची एक गाईडलाईन निश्चित केली आहे. रसायन अति प्रमाणात वापरल्यास विविध आजार होण्याची शक्यता आहे. उदा. त्वचा विकार, डोळ्यांचे विकार, फुफुसाला संसर्ग किंवा मनुष्याच्या जीवितास सुद्धा धोका होऊ शकतो.

विदर्भात औषध फवारणीमुळे कित्येक कुटुंबाचे जीव गेल्याची घटना ताजी असतानाच कृषी विभाग, ठाणे व होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन (एचआयसीए) यांच्या मदतीने भिवंडीतील कारखान्यावर छापेमारी करण्यात आली. यावेळी कारखान्यात मानवी आरोग्यास घातक असा रासायनिक साठा विनापरवाना आढळून आला. येथील रसायनांचे सर्व नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविल्यानंतर सदर कारखान्यावर कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडी