शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

राहूल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा धडकणार ठाण्यात; जोरदार तयारी

By अजित मांडके | Updated: February 29, 2024 16:15 IST

ठाणे जिल्हा हा पूर्वी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. येथूनच खासदार, आमदार, महापौर कॉंग्रेसचे झाले आहेत.

ठाणे : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची दुसºया टप्यातील भारत जोडो न्याय यात्रा आता मार्च महिन्यात ठाण्यात धडकणार आहे. त्यासाठी कॉंग्रेसकडून जोरदार तयार सुरु झाली असून त्याचे नियोजन देखील आखले जात आहे. ठाण्यातील विविध भागांतून ही न्याय यात्रा जाणार असल्याची माहिती कॉंग्रेसच्या वरीष्ठ सुत्रांनी दिली. विशेष म्हणजे राहुल गांधी या यात्रेच्या निमित्ताने प्रथमच ठाण्यात येत आहेत.

ठाणे जिल्हा हा पूर्वी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. येथूनच खासदार, आमदार, महापौर कॉंग्रेसचे झाले आहेत. परंतु मागील काही वर्षात ठाण्यासह जिल्ह्यात कॉंग्रेस पिछाडीवर गेल्याचे दिसून आले आहे. ठाणे महापालिकेत देखील कॉंग्रेसचे इनमीन तीन नगरसेवक आहेत. तर जिल्ह्यातही कॉंग्रेसची स्थिती फारशी चांगली नसल्याचे चित्र आहे. परंतु आता राहुल गांधी यांच्या निमित्ताने ठाणे कॉंग्रेसला उभारी मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. भाजपला रोखण्यासाठी राहुल यांनी संपूर्ण भारतात भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. पहिल्या टप्यातील या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता दुसºया टप्यात ही यात्रा पुन्हा जोमाने सुरु झाली आहे. त्यानुसार आता ठाण्यात राहूल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा येत्या १२ मार्च रोजी ठाण्यात धडकणार असल्याची माहिती कॉंग्रेसच्या सुत्रांनी दिली. त्यानुसार या संदर्भात बुधवारी या यात्रेचे नियोजन करण्यासाठी बैठक देखील झाली आहे. ही यात्रा ठाण्यातील कोण कोणत्या भागातून नेणे अपेक्षित आहे, त्याचेही नियोजन आखण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यानुसार ठाण्यातील कळवा, खारेगाव, शहरी भाग, कॅडबरी, रेमंड आदी भागातून ही यात्रा घोडबंदर मार्गे पुढे जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.

यापूर्वी गांधी घराण्यातील इंदिरा गांधी यांनी साधारणपणे १९७६ - ७७ च्या आसपास ठाण्यात हजेरी लावली होती. त्यानंतर १९८० च्या सुमारास राजीव गांधी यांनी देखील आमदारकीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्ताने ठाण्यात हजेरी लावली होती. त्यानंतर गांधी घराण्यातील एकही व्यक्ती ठाण्यात आलेला नाही. राहुल गांधी हे कोर्ट केस निमित्ताने भिवंडीला येऊन गेले आहेत. परंतु ठाण्यात ते प्रथमच येत आहेत. त्यामुळे याची उत्सुकता देखील कॉंग्रेस पदाधिकाºयांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येत आहे.

टॅग्स :thaneठाणेcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी