शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रघुवीरनगर झाले कचराकुंडी मुक्त

By admin | Updated: September 25, 2015 02:14 IST

केंद्रातील मोदी सरकारने स्वच्छतेचा नारा देताच डोंबिवलीतील रघुवीरनगरच्या काही महिलांनी एकत्र येत वॉर्डाच्या स्वच्छतेसाठी कंबर कसली.

अनिकेत घमंडी, डोंबिवलीकेंद्रातील मोदी सरकारने स्वच्छतेचा नारा देताच डोंबिवलीतील रघुवीरनगरच्या काही महिलांनी एकत्र येत वॉर्डाच्या स्वच्छतेसाठी कंबर कसली. त्यासाठी प्रगत परिसर व्यवस्थापनाच्या माध्यमातून त्यांनी तो उपक्रम सुरु ठेवला आहे. त्याची दखल घेऊन नगरसेवकाने महापालिकेच्या स्वच्छता अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावून सफाई करण्याचा कानमंत्र दिला. त्यासाठी प्रत्येक सोसायटीत मोठे डस्टबीन ठेवण्यात आले आहेत. आता कुठे हा वॉर्ड कचराकुंडी मुक्त होत आहे.याच ठिकाणी केडीएमसीतील एकमेव ट्रॅफिक गार्डन आहे. कै. सुरेंद्र वाजपेयी यांच्या संकल्पनेतून त्याची निर्मिती केली होती, आता त्याचा भार येथील राजेश मोरे वाहत आहेत. बुधवारी त्याचे नामकरण स्व. मीनाताई ठाकरे ट्रॅफिक गार्डन असे करण्यात आले. त्यासाठी मंगळवारचा दिवसरात्र एक करुन त्याची जमेल तशी डागडुजी करण्यात आली. त्यासाठी पालकमंत्री बुधवारी आले होते. परंतु, असे असतांनाही वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी आवश्यक असणारी ‘सिग्नल यंत्रणा’ कार्यान्वीत करतांना मात्र महापालिका, वाहतूक विभागाला अपयश आले आहे. त्यामुळेच केवळ या गार्डनमध्येच नव्हे तर चार रस्ता येथेही ती यंत्रणा नाही. परिणामी त्याचा त्रास सर्व डोंबिवलीकरांना होतो. पाच वर्षात चार रस्त्याची सिग्नल यंत्रणा केवळ अभावानेच सुरु होती. ती पूर्णपणे सुरु व्हावी, अ‍ॅक्टीव्ह रहावी यासाठी मात्र कोणतेही विशेष प्रयत्न केलेले नाहीत. विशेष म्हणजे या वॉर्डाच्या शुभारंभापासूनच शहरातील मानपाडा या रस्त्याचे आरसीसी रोड करण्यात आला. त्यातून वाहतूककोंडी सुधारेल, तसेच वाहने वेगाने धावतील असा विश्वास होता. परंतु, या दोन्ही बाबी जैसे थे असून अर्धवट आरसीसीमुळे कोणताही उद्देश सफल झालेला नाही. त्यामुळे शेकडो वाहनचालक त्रस्त आहेत. हीच समस्या शिवमंदिर चौकातही भेडसावते. तेथेही सकाळी व संध्याकाळच्या वेळेत प्रचंड ट्रॅफिक होते, त्यामुळेही नागरिक त्रस्त असतात. याच ठिकाणी महापालिकेच्या डोंबिवली शहरातील एकमेव वैकुंठ स्मशानभूमीचा भूखंड आहे. शहरातील बहुतांशी सर्वच अंत्यसंस्कार येथे होतात. या ठिकाणच्या समस्या अनेक वर्षात सुटलेल्या नाहीत. आता कुठे निवडणुकीच्या तोंडावर तेथील सुविधांसाठी सुमारे ५० लाखांच्या निधीची तरतूद केली. याच ठिकाणी सुमारे १०८ वर्षांचा इतिहास असलेले प्राचिन शिवमंदिर आहे. परंतु, सण उत्सवाच्या विशेषत: श्रावण, महाशिवरात्री आदींच्या सणांमध्ये भक्तांची महापालिकेकडून अथवा नगरसेवकाकडून कोणतीही विशेष काळजी घेतली जात नसल्याचे जनतेचे गाऱ्हाणे आहे. केवळ नाना - नानी पार्क हे ज्येष्ठांसाठी विरंगुळ््याचे साधन आहे. तेथेच आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आर्ट गॅलरीचा प्रस्ताव असून अद्याप तरी त्यास मूर्त रुप आलेले नाही. केवळ लेवा भवन परिसरात एलईडी पथदिवे लागले असून अन्यत्र कधी लागणार याच्या प्रतिक्षेत नागरिक आहेत. सर्वाधिक वर्दळीचा हा परिसर असल्याने येथे वाहतूककोंडीसह चेन स्रॅचिंगचे प्रमाण अधिक आहे. ते कमी व्हावे यासाठी नगरसेविकेने आता कुठे सीसी कॅमेरे लावण्याचे काम हाती घेतले आहे. पण हे सारे निवडणुकीच्या तोंडावरच का होते आहे ? असा सवाल जनतेचा आहे.