शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय हस्तक्षेपामुळे वाहतुकीचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 02:30 IST

पोलीस नियम का पाळत नाहीत. कोपरीत बसविरोधी आंदोलन करूनही वाहतूककोंडी आजही जाणवते. कंपनीच्या नावाखाली अवैध वाहतूक करणाºया बसेसवर कारवाई

ठाणे : पोलीस नियम का पाळत नाहीत. कोपरीत बसविरोधी आंदोलन करूनही वाहतूककोंडी आजही जाणवते. कंपनीच्या नावाखाली अवैध वाहतूक करणाºया बसेसवर कारवाई का होत नाही. नो-पार्किंगचा बोर्ड नसूनही त्या ठिकाणी वाहन पार्क केल्यावर त्या वाहनांवर वाहतूक विभाग कारवाई कशी काय करू शकतो, अशा शेकडो प्रश्नांची सरबत्ती वाहतूक विभागाचे उपायुक्त अमित काळे यांच्यावर शनिवारी ठाणेकरांनी केली.मुंबईत पोलीस कारवाई करतात, तेव्हा त्यांच्या कारवाईत कोणाचाही हस्तक्षेप नसतो. माझ्या विभागातील अधिकारी-कर्मचाºयांना कारवाई करताना कोणाचाही फोन घेऊ नका, अगदी माझा असेल तरी घेऊ नका, अशा सूचना दिल्या आहेत, असे सांगत ठाण्यातील राजकीय हस्तक्षेपावर वाहतुकीच्या बेशिस्तीचे खापर फोडले.‘समन्वय प्रतिष्ठान’तर्फे शनिवारी मराठी ग्रंथसंग्रहालय येथे ‘ठाणे वाहतूककोंडी समस्या व उपाय...’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन केले होते. या वेळी ठाणेकरांनी प्रश्नांचा पाऊस पाडला. या पदाचा कार्यभार स्वीकारून आपल्याला जेमतेम चार दिवस झाले आहेत, असे सांगत काळे यांनी आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न करून पाहिला. मात्र, आपल्या कार्यकाळात ‘वाहतूककोंडीमुक्त ठाणे’ करण्याचे आश्वासन काळे यांनी दिले.कोपरी येथे ठाणेकरवाडीपर्यंत रस्त्यांवर, फुटपाथवर वाहने उभी राहतात, त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असे विलास निकम यांनी विचारले. नो-पार्किंगमध्ये सर्व वाहने उभी असतात, नो-एण्ट्रीमधून सर्रास गाड्या जातात, हा मुद्दा बाळकृष्ण पणीकर यांनी मांडला. कोपरीत येणाºया कंपनीच्या बसेसमधून अवैध वाहतूक चालते. त्यांची तपासणी करा, अशी मागणी राजेश गाडे यांनी केली. कोपरी ब्रिजवर सायंकाळी ६ ते ८ या वेळेत प्रचंड वाहतूक असते. याकडे हेमंत पाटील यांनी लक्ष वेधले. ज्ञानेश पाटील यांनी पार्किंगसाठी २७ भूखंड फक्त कागदावर आहेत असे ताशेरे ओढले.उपायुक्त काळे म्हणाले की, मुंबईत वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा जसा धाक आहे, तसा ठाण्यातील वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा नसल्याचे निदर्शनास आले आहे. ठाणेकर मुंबईत गेल्यावर नियम पाळतात, पण ठाण्यात पाळत नाही. मुंबईत पोलीस कारवाई करतात, तेव्हा त्यांच्या कारवाईत कोणाचाही हस्तक्षेप नसतो. जी भीती टोलनाक्यापलीकडे आहे, ती अलीकडे नाही, असे स्पष्टपणे सांगताना त्यांनी वाहतूक विभागाकडून ई-चॅनल सिस्टीम सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. तसेच, कारवाईमध्ये वाहनचालकाकडून परवाना जप्त केल्यास त्याची माहिती सर्व आरटीओ कार्यालयात दिली जाईल, जेणेकरून परवाना हरवल्याची खोटी माहिती देऊन दुसरा वाहन परवाना तो वाहनचालक घेऊ शकणार नाही. समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी प्रास्ताविक केले. (संबंधित वृत्त पान ३)नागरिकांच्या ज्वलंत विषयावरील समस्या ऐकण्यासाठी महापालिकेचे अधिकारी गैरहजर राहिल्याने नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. महापालिकेच्या वतीने किमान एक अधिकारी उपस्थित राहू शकत नाही का, असा सवाल उपस्थित केला.वाहतूक विभागाचे अधिकारी वेळेत न आल्याने नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. अधिकारी वाहतूककोंडीत अडकल्याने येण्यास थोडा उशीर होईल, असे व्यासपीठावरून सांगितल्यानंतर आम्ही पण वाहतूककोंडीतून आलो आहोत. त्यांना जास्त उशीर झाला, तर बाहेरच थांबवा, अशा शब्दांत कळवास्थित मधुकर झेमसे यांनी आपला रोष व्यक्त केला. काही ज्येष्ठ नागरिकांचा संताप इतका अनावर झाला होता की, ते सारखे तावातावाने बोलत व्यासपीठाकडे धाव घेत होते.