शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

ठाण्यातील विटावा सबवेच्या दुरुस्तीनंतर काही तासातच उखडले पेव्हर ब्लॉक, दुरुस्तीच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 15:51 IST

चार दिवसाच्या दुरुस्तीनंतर विटावा सबवे वाहतुकीसाठी सकाळी सहा वाजता खुला करण्यात आला. परंतु काही क्षणातच लावण्यात आलेले पेव्हर ब्लॉक उखडले आणि येथील वाहतुकही मंदावली. त्यानंतर दुपारी वाहतुक कमी झाल्यानंतर पुन्हा दिड तासाचा ब्लॉक घेऊन दुरुस्तीचे काम करण्यात आले.

ठळक मुद्देअवघ्या काही वेळेतच उखडले पेव्हर ब्लॉककामाच्या दर्जाबाबत नागरीकांनी उपस्थित केल्या शंका

ठाणे - दुरु स्तीसाठी मागील चार दिवसापासून बंद असलेला विटावा सब वे मंगळवारी सकाळी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र हा सबवे खुला होताच बसवण्यात आलेले पेव्हर ब्लॉक अक्षरश: उखडले गेल्याने आधीच चार दिवस वाहतूक कोंडीचा सामना करणाºया ठाणेकरांवर पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. पेव्हर ब्लॉक उखडले गेल्याने या मार्गावरील वाहतूकही मंदावली होती. चार दिवस दुरु स्तीसाठी घेऊन ठाणे महापालिकेच्या वतीने केवळ पेव्हर ब्लॉक बसवले असून दुरुस्ती केल्यानंतर पहिल्याच दिवशी रस्त्याची अशी अवस्था झाल्याने नागरिकांनी आता कामाच्या दर्जाविषयीच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.चार दिवसाचा ब्लॉक घेऊन विटावा सबवेची दुरु स्ती करण्यात आली. मात्र सिमेंट काँक्र ीटीकरण न करता या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले आहेत. ठाण्यातील विटावा सबवे ची वाहतूक कोंडी ही अनेक वर्षांपासून सुरूच आहे. असे असताना सबवे खाली पडलेले खड्डे बुजविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अधिसूचना काढत हा मार्ग चार दिवसांसाठी बंद करून दुरु स्तीचे काम सुरु केले होते. या ठिकाणी पाणी साचत असल्याने या सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे होतात. कायम अवजड आणि लहान मोठ्या वाहनांची वाहतूक या ठिकाणी सुरूच राहत असल्यामुळे या ठिकाणी दुरु स्ती साठी रस्ता बंद करण्याशिवाय पर्याय नव्हता. हे काम महानगर पालिकेने सुरु केले आणि मंगळवारी काम संपवून सबवे सकाळी सहा वाजता वाहतुकीसाठी सुरु केला. मात्र काहीच तासात सिमेंट कोन्क्र ीटीकरण न करता पेव्हर ब्लॉक बसवल्यामुळे ते वाहतूक सुरु झाल्यावर उखडले गेले आणि पुन्हा या भागात वाहतूक कोंडी सुरु झाली.विटावा सबवे चे हे काम सुरु असताना या ठिकाणी राहत असलेले मनसे पदाधिकारी यांनी ठाणे महानगर पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला एक पत्र २२ डिसेंबर ला देवून या ठिकाणी होणारे दुरु स्तीचे काम हे सिमेंट कॉंक्रीटीकरणाने करावे आणि न्यायालयाच्या बंदीचे आदेश असलेले पेव्हर ब्लॉक वापरू नये असे पत्र दिले होते. तरीही पालिका प्रशासनाने दुरु स्तीसाठी पेव्हर ब्लॉकचा वापर केला. यामुळे आता दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी मनसे पदाधिकारी सुशांत सूर्यराव आणि भाजप पधाधिकारी मनोहर सुखदरे यांनी केली आहे. यावेळी अधिकारी आणि सुखदरे यांच्यात वाद हि झाला आणि मग त्यांना कळवा पोलीस ठाण्यात घेवून जावून काही वेळाने सोडण्यात देखील आले. दरम्यान दुपारी येथील वाहतुक कमी झाल्यानंतर दिड तासाचा पुन्हा ब्लॉक घेण्यात येऊन दुरुस्तीचे काम करण्याचे काम सुरु होते. परंतु आता कामाबाबत मात्र पुन्हा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाTrafficवाहतूक कोंडी