शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

अभियंत्यांच्या रिक्त जागांकडे कानाडोळा, अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचा दर्जा घसरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 01:15 IST

TMC News : ठाणे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा, बांधकाम आदी विभागांत सध्या १२ अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. अपुऱ्या संख्याबळामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याच्या योजनांच्या बांधकामांवर विपरीत परिणाम झाला आहे.

ठाणे - ठाणे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा, बांधकाम आदी विभागांत सध्या १२ अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. अपुऱ्या संख्याबळामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याच्या योजनांच्या बांधकामांवर विपरीत परिणाम झाला आहे. ही बाब वारंवार लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून देऊनही ते मूग गिळून गप्प बसले आहेत.जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते, गटारे, शाळा, समाजमंदिरे, रस्ते, पाणीपुरवठ्यांची कामे आदी बांधकामांवर ठाणे जिल्हा परिषद वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. लोकहिताच्या या सार्वजनिक बांधकामांचा दर्जा सध्या ठेकेदारांच्या भरवशावर आहे. कारण या कामाचा दर्जा तपासण्यासाठी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये शाखा अभियंतेच नाहीत. जिल्हा परिषद मुख्यालयातील बांधकाम विभागाच्या उप अभियंत्यांची जागा तब्बल दोन वर्षांपासून रिक्त आहे. चारपेक्षा अधिक कनिष्ठ अभियंत्यांची गरज बांधकाम विभागाला असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. जिल्ह्यातील बांधकाम विभागाचा गाडा सध्या मोजकेच अभियंते ओढत आहेत.पाणीपुरवठा व लघुपाटबंधारे विभागालाही अभियंत्यांची गरज आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला सहापेक्षा अधिक अभियंत्यांची गरज आहे. या पाणीपुरवठा विभागाचे भिवंडी, शहापूर आणि अंबरनाथ तीन उपविभाग आहेत. उपविभागाच्या कामाची जबाबदारी वर्दीच्या स्वरूपात पार पाडली  जात आहे. अंबरनाथ उपविभागावर दरवर्षी पाणीटंचाईला तोंड देणाऱ्या मुरबाड तालुक्याची जबाबदारी आहे. मुरबाड तालुक्याचा एक स्वतंत्र उपविभाग तयार करण्याची गरज आहे. त्यासाठी काही वर्षांपूर्वी शासनाकडे पाठपुरावाही करण्यात आला होता. या नव्या उपविभागालाही सहा अभियंत्यांची आवश्यकता भासणार आहे. सध्या उपलब्ध अभियंत्यांना जादा कामाची जबाबदारी देऊन ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र त्यामुळे कामाचा दर्जा खालावण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने निदर्शनास आणले.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिका