शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अभियंत्यांच्या रिक्त जागांकडे कानाडोळा, अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचा दर्जा घसरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 01:15 IST

TMC News : ठाणे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा, बांधकाम आदी विभागांत सध्या १२ अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. अपुऱ्या संख्याबळामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याच्या योजनांच्या बांधकामांवर विपरीत परिणाम झाला आहे.

ठाणे - ठाणे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा, बांधकाम आदी विभागांत सध्या १२ अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. अपुऱ्या संख्याबळामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याच्या योजनांच्या बांधकामांवर विपरीत परिणाम झाला आहे. ही बाब वारंवार लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून देऊनही ते मूग गिळून गप्प बसले आहेत.जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते, गटारे, शाळा, समाजमंदिरे, रस्ते, पाणीपुरवठ्यांची कामे आदी बांधकामांवर ठाणे जिल्हा परिषद वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. लोकहिताच्या या सार्वजनिक बांधकामांचा दर्जा सध्या ठेकेदारांच्या भरवशावर आहे. कारण या कामाचा दर्जा तपासण्यासाठी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये शाखा अभियंतेच नाहीत. जिल्हा परिषद मुख्यालयातील बांधकाम विभागाच्या उप अभियंत्यांची जागा तब्बल दोन वर्षांपासून रिक्त आहे. चारपेक्षा अधिक कनिष्ठ अभियंत्यांची गरज बांधकाम विभागाला असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. जिल्ह्यातील बांधकाम विभागाचा गाडा सध्या मोजकेच अभियंते ओढत आहेत.पाणीपुरवठा व लघुपाटबंधारे विभागालाही अभियंत्यांची गरज आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला सहापेक्षा अधिक अभियंत्यांची गरज आहे. या पाणीपुरवठा विभागाचे भिवंडी, शहापूर आणि अंबरनाथ तीन उपविभाग आहेत. उपविभागाच्या कामाची जबाबदारी वर्दीच्या स्वरूपात पार पाडली  जात आहे. अंबरनाथ उपविभागावर दरवर्षी पाणीटंचाईला तोंड देणाऱ्या मुरबाड तालुक्याची जबाबदारी आहे. मुरबाड तालुक्याचा एक स्वतंत्र उपविभाग तयार करण्याची गरज आहे. त्यासाठी काही वर्षांपूर्वी शासनाकडे पाठपुरावाही करण्यात आला होता. या नव्या उपविभागालाही सहा अभियंत्यांची आवश्यकता भासणार आहे. सध्या उपलब्ध अभियंत्यांना जादा कामाची जबाबदारी देऊन ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र त्यामुळे कामाचा दर्जा खालावण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने निदर्शनास आणले.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिका