शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

दहावीतील गुणच महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 02:04 IST

पालक आणि पाल्य यांच्या आयुष्यात जे काही महत्त्वाचे टप्पे येतात, त्यात दहावी आणि बारावीची परीक्षा हा एक मुख्य टप्पा असतो. त्यानंतर मात्र...

पालक आणि पाल्य यांच्या आयुष्यात जे काही महत्त्वाचे टप्पे येतात, त्यात दहावी आणि बारावीची परीक्षा हा एक मुख्य टप्पा असतो. त्यानंतर मात्र, चिंता सतावते ती ‘दहावी-बारावीनंतर काय?’. पाल्याच्या भवितव्याबद्दल ठाम निर्णय घेण्याचा हा क्षण असतो. वस्तुत: पाल्याला दहावीत किती टक्के गुण मिळाले आहेत, यावर पुढचा मार्ग ठरतो. पूर्वी ७० टक्क्याहून अधिक गुण मिळाले की विज्ञान शाखेत किंवा तांत्रिक शाखेत प्रवेश घ्यायचा हे ठरवले जायचे. ५० ते ७० टक्के गुण मिळाले तर वाणिज्य शाखेत, आणि त्यापेक्षा कमी गुण मिळाले तर कला शाखेत जायचे; आणि तेही नाही जमले तर अ‍ॅप्रेंटिसशिप वा आय.टी.आय.ला प्रवेश मिळतो काय ते पाहायचे, असा सरळधोपट मार्ग होता. पालक जास्त शिकलेले नसल्यामुळे मुलांनाच सर्व निर्णय घ्यावे लागत. ते कधी योग्य ठरत तर कधी अयोग्य.हाच तेव्हाचा पाल्य आज पालक झाला आहे. त्याच्या विद्यार्थीदशेतील परिस्थिती आता राहिली नाही. काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले, ज्ञानशाखा विस्तारित झाल्या, ‘करिअर’ या शब्दाला वजन प्राप्त झाले, थोडीफार आर्थिक सुबत्ताही आली. या साऱ्यांचा एकत्रित परिणाम पाल्याच्या पुढच्या करिअरच्या दिशेने कोणता योग्य निर्णय घ्यावा, इथपर्यंत येऊन थांबतो. एकाहून अधिक पर्याय समोर असल्यावर निर्णय घेताना तारांबळ उडते. पूर्वी पालकांच्या इशाºयावर चालणारा मुलगा अथवा मुलगी आज स्वत:चे निर्णय घेण्याइतपत सक्षम झाली आहे, पण योग्य करिअरची निवड करताना एकदा नाही, दोनदा नाही अनेकदा विचार करावा लागतो.केवळ परीक्षेत अभ्यास करून किती गुण मिळाले, एवढे आता पुरेसे नाही. पाल्याची एकंदर कुवत, त्याची आवडनिवड, आपण त्याला कोणत्या शिक्षणासाठी अधिकाधिक मदत करू शकतो, त्याला देशांतर्गत शिक्षण देणार की, उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवणार, पुढच्या शिक्षणानंतर त्याला कोणत्या प्रकारची नोकरी मिळणार, तो आपल्याच देशात राहणार की परदेशात जाऊन नोकरी करणार, असे कितीतरी प्रश्न सुजाण पालकांसमोर ठाण मांडून बसलेले असतात. त्यामुळे पाल्याच्या करिअरच्या दृष्टीने काय निर्णय घ्यावा, ही त्यांच्यासाठी कसोटी ठरते.एकदा करिअरची योग्य दिशा सापडली की पुढचा मार्ग सोपा होतो. म्हणून या टप्प्यावर थोडावेळ थांबून विचार करावा लागतो. दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला की विचार करायला पालकांना सवडही मिळत नाही. कारण लागलीच पुढच्या प्रवेशासाठीचे सोपस्कार करायचे असतात. अलीकडे दहावी-बारावीची टक्के वारीने शंभरी गाठली आहे. नापास होणाºयांची संख्या नगण्य होत आहे. त्यामुळेही पालकांसमोर एक मोठी स्पर्धा उभी ठाकलेली असते. अशा वेळी योग्य मार्गदर्शन व दिशादर्शन महत्त्वाचे ठरते.‘करिअर’ या शब्दाची व्याख्याही व्यापक आहे. त्याचा थेट संबंध नोकरी-व्यवसायाशी येतो. आपण जे क्षेत्र निवडणार आहोत, त्यात आपल्याला आवड किती आहे आणि सवड किती आहे, हेदेखील पाहावे लागते. करिअरच्या बाबतीत स्त्री आणि पुरुष, मुलगा आणि मुलगी असा भेद राहिलेला नाही. मुलींनाही सर्व क्षेत्रे खुली आहेत. आता सैन्यदलात लढावू शाखेत आणि वैमानिकापर्यंत सर्वच स्तरावर मुलींनी आपले स्थान भक्कम केले आहे. त्याचाही करिअर निवडताना पालकांना विचार करावा लागतो.