शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचा सेनेला धक्का, राष्ट्रवादीच्या खांद्यावर ठेवली बंदूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:49 IST

नागरिकांचा विरोध असतानाही पारसिकनगरला सत्ताधारी शिवसेनेसह प्रशासनाने पार्किंगच्या आरक्षणात मलनि:सारण प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली होती.

अजित मांडकेठाणे : नागरिकांचा विरोध असतानाही पारसिकनगरला सत्ताधारी शिवसेनेसह प्रशासनाने पार्किंगच्या आरक्षणात मलनि:सारण प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली होती. राष्टÑवादीने यासंदर्भात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून याला स्थगितीदेखील मिळवली होती. त्यानंतरही पालिकेने हे काम सुरूच ठेवले होते. परंतु, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नगरविकास खात्याने या प्रकल्पाच्या फेरबदलाचा प्रस्तावच नामंजूर करून सत्ताधारी शिवसेनेसह प्रशासनाच्या अभद्र युतीला धक्का दिला आहे. आरक्षणाचे फेरबदल नामंजूर केल्यामुळे अर्ध्याहून अधिक झालेले या प्रकल्पाचे काम थांबण्याची चिन्हे आहेत.कळव्यातील पारसिकनगर येथे ठाणे महापालिका मलनि:सारण प्रकल्प उभारत असून त्याचे कामही सुमारे वर्षभरापूर्वी सुरू झाले आहे. मात्र, हा प्रकल्प भर वस्तीमध्ये होत असल्याने आरोग्याचा मुद्दा उपस्थित करून त्याला सुरु वातीपासून स्थानिक रहिवाशांचा विरोध होता. यासाठी अनेक वेळा आंदोलनेदेखील केली.पार्किंगचे आरक्षण असताना त्या ठिकाणी मलनि:सारणाचा प्रकल्प कसा उभा राहू शकतो, असा आक्षेप घेऊन राष्टÑवादीने याविरोधात आवाज उठवला. आरक्षण फेरबदल न करताच या कामाच्या निविदा काढल्याचा मुद्दाही लावून धरला. या कामाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशीची मागणीही केली होती. तसेच मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून हे काम थांबवण्याची मागणी केली होती.या कामावर २६ कोटींचा खर्च होणार होता हा प्रकल्प रहिवासी भागातून स्थलांतरित करण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी त्याची चौकशी लावली होती. तरीही प्रकल्पाचे काम सुरूच होते. आता शासनानेच हा प्रकल्प जवळजवळ रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.पारसिकनगर येथील ९४०० चौरस मीटर जागेवरील पार्किंगच्या जागेवरील आरक्षणात फेरबदल करून त्या जागी अर्धे पार्किंग आणि मलनि:सारणाचे आरक्षण, असा फेरबदलाचा प्रस्ताव पालिकेने तयार केला होता. शासनाकडे नियमानुसार तो एक वर्षाच्या आत पाठवणे अभिप्रेत होते. परंतु, पालिकेने वर्षभरात तो तसा अहवाल शासनाकडे पाठवलाच नसल्याचा ठपका नगर विकास विभागाने ठेवला आहे. त्यानुसार, फेरबदलाचा प्रस्ताव वेळेत सादर न केल्यानेच हा फेरबदल प्रस्ताव नामंजूर करण्यात येत असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. एकूणच नागरिकांचा विरोध असताना आणि मुख्यमंत्र्यांनीदेखील या प्रकल्पाला स्थगिती दिली असताना केवळ सत्ताधाºयांनी आणि पालिकेच्या अभद्र युतीच्या जोरावर या प्रकल्पाचे काम सुरूच ठेवले होते. अखेर, पालिकेच्या चुकीमुळे आता या प्रकल्पाचे काम थांबवावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपानेच आता या अभद्र युतीला धक्का देऊन पालिकेचा फेरबदलाचा प्रस्ताव नामंजूर केला आहे. त्यामुळे आता प्रशासन या प्रकल्पाचे काम सुरू ठेवते की बंद करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :thaneठाणेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस