शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

बनावट दाखल्यांद्वारे केली करोडोंच्या जमिनींची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 01:51 IST

आदिवासींसह जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक : जमिनी शासनजमा करा

ठाणे : आदिवासी शेतकऱ्यांच्या शेकडो कोटी रुपये किमतीच्या मौजे कांबा, ता. कल्याण येथील शेतजमिनी लाल नोतनदास तनवाणी, गुणवंत भंगाळे आणि नरेश भाटिया यांनी प्रशासनाच्या पाठबळावर खरेदी केल्याच्या दावा केला जात आहे. मात्र, ते मूळ शेतकरी नसून त्यांनी शेतकरी असल्याचे बनावट दाखले जोडून प्रशासनाची फसवणूक करून आदिवासींच्या जमिनी हडप केल्याचा आरोप ठाणे जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात विशाल मथुरा गुप्ता यांनी केला. यामुळे जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

शेकडो कोटी किमतीच्या कांबा येथील आदिवासी शेतकºयांची जमीन सर्व्हे क्र. १२१/१, १२१/१/अ या जमिनी फेरफार क्र. ३३१२ द्वारे खरेदी केल्याचा दावा केला जात आहे. पण, आदिवासी शेतकºयांच्या जमिनींचा खरेदीविक्री व्यवहार होत नसतानाही तो या प्रकरणात झालेला दिसून येत आहे. आदिवासींच्या निरक्षरतेचा गैरफायदा घेऊन हा व्यवहार झाल्याची चर्चा आहे. मात्र, या जमिनी खरेदी करणारेदेखील मूळ शेतकरी नसल्याची गंभीर बाब म्हारळपाडा, वरपगाव येथील गुप्ता यांनी जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनात आणून देत या जमिनी शासनजमा करण्याची मागणी केली आहे. यामुळेसंबंधितांसह अधिकाºयांचे धाबे दणाणले आहे. या व्यवहारासंबंधी मौजे कांबा येथील जमीन सर्व्हे क्र. १५/७ या शेतजमिनीचा सातबारा उतारा फेरफार क्र. १२०१ नुसार कोहिनूर असोसिएट्सच्या नावे नोंद झालेला असल्याचे गुप्ता यांनी निदर्शनात आणून दिले आहे. परंतु, हा फेरफार मंजूर करताना त्यात खरेदीदार लाल नोतनदास तनवाणी यांचा शेतकरी असल्याचा दाखला राजस्थानमधील शिवगंज येथील आहे. पण, तो दाखला नसून केवळ जमिनीचे प्रमाणपत्र असल्याची बाब जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनात आणून दिली आहे.राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाने दिले कारवाईचे आदेशया आदिवासींच्या शेतजमिनी बळकावल्याप्रकरणी आधीच गुन्हे दाखल झालेले आहेत. अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल होऊनही अद्याप कारवाई झाली नसल्याची गंभीर दखल केंद्राच्या राष्टÑीय अनुसूचित जाती जमाती आयोगाने घेऊन ३० दिवसांत कारवाई करण्याचे ५ डिसेंबर रोजी आदेशही पोलीस अधीक्षकांना जारी केले आहेत.तर, सर्व्हे क्र. ४७, १२१/१, १२०/१ आदी शेतजमिनीवर सुरू असलेले अनधिकृत बांधकाम थांबवण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकाºयांनी दिले. तरीदेखील, त्यास न जुमानता बांधकाम सुरू असल्यामुळे आदिवासींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात यासंदर्भात राज्यातील २८८ आमदारांना या अन्यायाविरोधात पत्रव्यवहार झाल्याचे गुप्ता यांनी निदर्शनात आणून दिले आहे.सोलापूर येथील बनावट दाखला जोडलाया ३३१२ क्रमांकाच्या फेरफारमधील नरेश भाटिया यांच्या नावे मौजे दापिवली, ता. अंबरनाथ येथील जमीन सर्व्हे क्र. २६/४, २६/५ या जमिनी सोलापूर येथील फेरफार क्र.४६९ नुसार नरेश भाटिया यांच्या नावे केल्या आहेत. परंतु, या ४६९ च्या फेरफारची जमीन मौजे गावटेवाडी ता. सोलापूर येथील सर्व्हे क्र. ४१/९ ची बाब निदर्शनात आणून दिली आहे.यानुसार, परहित चॅरिटेबल सोसायटीने रीतसर चौकशी केली असता गावटेवाडी येथील तलाठी यांच्या दप्तरी सर्व्हे क्र. ४१/९ चा सातबारा उतारा दिसून येत नसल्याने भाटिया याने खोटी कागदपत्रे जोडल्याची गंभीर बाब गुप्ता यांनी पुराव्यासह जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनात आणून दिली आहे.यावर जिल्हाधिकारी आता काय निर्णय घेतात आणि आदिवासी शेतकºयांना काय न्याय देतात, याकडे या शेतकºयांसह आदिवासींच्या सामाजिक संघटना आशाळभूत नजरेने लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :thaneठाणे