शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
2
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
3
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
4
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
7
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
8
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
9
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
10
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
11
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
12
Operation Sindoor Live Updates: हरियाणात मुसळधार पाऊस, पाहा व्हिडीओ
13
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
14
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
15
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
16
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
17
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
18
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
19
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
20
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video

विविध देवीदेवतांची पूजा एकाच व्यासपीठावर

By admin | Updated: December 28, 2015 02:26 IST

चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या ‘एकल जनसेवकां’चा सत्कार केला. त्यामुळे विविध देवीदेवतांची पूजा एकाच व्यासपीठावर करण्याचा योग आल्याने आजचा दिवस खऱ्या

अनिकेत घमंडी, डोंबिवलीचतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या ‘एकल जनसेवकां’चा सत्कार केला. त्यामुळे विविध देवीदेवतांची पूजा एकाच व्यासपीठावर करण्याचा योग आल्याने आजचा दिवस खऱ्या अर्थाने भाग्याचा आहे, अशी कृतज्ञता भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संस्थापक संचालक डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केली.‘चतुरंग’च्या वतीने डोंबिवलीतील स.वा. जोशी महाविद्यालयाच्या प्रांगणात शनिवारी १० एकल जनसेवकांचा सन्मान सोहळा झाला. त्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून डॉ. सहस्रबुद्धे बोलत होते. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव जसा धार्मिक-कौटुंबिक वातावरणातून सार्वजनिक-समाजाभिमुख केला, महात्मा गांधीजींनी स्वच्छतेची महती विशद करत समाजाला त्याचे महत्त्व पटवून दिले, लालबहादूर शास्त्री यांनी सोमवारचा उपवास धरावा (आठवड्यातून एकदा) हा विचार समाजात आणला, जेणेकरून देशाच्या कानाकोपऱ्यांतील एका भुकेलेल्याला अन्न मिळेल, असे सामाजिक बांधीलकीचे उदात्तीकरण त्यातून प्रकट झाले. त्यांना मानाचा मुजरा तर आहेच, त्यांच्यासारखेच पण वेगळ्या धाटणीने काम करणाऱ्यांचा सन्मान करण्याचे काम ‘चतुरंग’ करत आहे. रेल्वे फलाटांमध्ये पळून आलेल्या मुलांना पुन्हा त्यांच्या घरच्यांच्या स्वाधीन करणाऱ्या समतोल फाउंडेशनचे विजय जाधव, जास्तीतजास्त युवकांनी सैन्यात जावे, यासाठी अविरत कार्यरत असलेले मेजर गावंड, अनाथांना-बेवारसांना अंत्यसंस्कारापासून वंचित राहायला लागू नये, यासाठी झटणाऱ्या सुनीता पाटील, आध्यात्मिक प्रगतीसह धार्मिक, सांस्कृतिक रुढी-परंपरा टिकवण्यासाठी नर्मदा प्रदक्षिणा करणाऱ्या भक्तांची तेथे गैरसोय होऊ नये, यासाठी झिजणाऱ्या प्रतिभा चितळे, कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शाळा चालवणारे नंदकुमार काटदरे, वेश्यांच्या मुलांचे पुनर्वसन करणाऱ्या मुस्काना मुजाबादी, कलाकारांना त्यांच्या अडीअडचणींत साथ देणाऱ्या पूनावाला, गेस्ट हाऊसचे चारूकाका सरपोतदार, अंधांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य करणारे राहुल देशमुख, बालकांमध्ये नाट्यासह अभिनयाची अभिरुची वाढीस लागावी यासाठी झटणाऱ्या कांचन सोनटक्के, समर्पण भावनेने कार्य करणाऱ्या डॉ. ममता लाला अशा एक से एक सामाजिक कार्य करणाऱ्यांना एकत्रित ज्यांनी केले, त्या ‘चतुरंग’च्या टीमचे खऱ्या अर्थाने कौतुक आहे, असे गौरवोद्गार डॉ. सहस्रबुद्धे यांनी काढले. समाजाचे एक प्रकारे स्वामित्व घेतलेल्या या मान्यवरांनी किंबहुना एकांड्या शिलेदारांनी कोणत्याही अपेक्षेने हे काम केलेले नाही. नि:स्वार्थ हेतूने काम करत राहणे, समाजासाठी झटत राहणे, हा एकच वसा-ध्यास या सर्वांनी घेतला आहे. त्यांना साथ हवी आहे, ती सतर्क आणि नोंद घेणाऱ्या नागरिकांची. डोंबिवलीकर अशा कामात कधीही मागे नाहीत, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे या सर्वांना साथ द्या, जेणेकरून अशा पद्धतीचे सामाजिक काम वाढीस लागेल आणि खऱ्या अर्थाने सामाजिक बांधीलकी जपली जाईल. अनेकांना आदर्श ठरावे, असे या सर्वांचे कार्य आहे. प्रत्येक नागरिकाने आपापल्या परीने असे काम केल्यास खऱ्या अर्थाने या सन्मानाला न्याय मिळेल. याच निमित्ताने चतुरंगच्या २५ वर्षांच्या वाटचालीचे साक्षीदार ज्येष्ठ पंचागकर्ते- खगोलशास्त्र अभ्यासक दा.कृ. सोमण यांनीही त्यांच्या मनोगतात ज्यांचा सन्मान झाला, ते खऱ्या अर्थाने ‘व्रतस्थ’ होत, ते खरे मार्गस्थ होत, दिशादर्शक आहेत. जीवन कसे जगावे, हे त्यांना कळले हो, अशा शब्दांत सर्वांचा सन्मान केला. याच निमित्ताने ज्यांचा सन्मान झाला, त्यांच्या कार्याची ओळख सर्वांना व्हावी, यासाठी ‘व्रतस्थ’ या पुस्तकाचे आणि चतुरंगच्या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले. (प्रतिनिधी)