शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे मंत्री गुगली टाकण्यात मास्टर..."; शिंदेसेनेच्या आमदाराचा घरचा आहेर, विधानसभेत काय घडलं?
2
पुतीन येऊन जाताच अमेरिकेने भारतावर राग काढला; H-1B व्हिसाच्या मुलाखती थांबविल्या, ८५,००० हून अधिक व्हिसा रद्द
3
थायलंड-कंबोडिया संघर्षात डोनाल्ड ट्रम्प यांची उडी, भारत-पाकिस्तानचा उल्लेख; म्हणाले, "आम्ही ताकदीबरोबर..."
4
डिजिटल गोल्डची मागणी ४७% ने कोसळली! सेबीच्या 'या' इशाऱ्याने गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली
5
गुगलचा 'हा' मेसेज दिसताच समजून जा तुमचं 'Gmail' आलंय धोक्यात! वेळ न घालवता करा 'हे' उपाय
6
२०२५ मध्ये अभिषेक शर्माला सर्वाधिक गुगल सर्च करत राहिले पाकिस्तानी...; आशिया कपमध्ये धुळधाण उडविलेली...
7
"साहेब, मी कचोरी विकून कुटुंबाचं पोट...", १५०० कोटींची फसवणूक करणाऱ्या सोनीची नवी 'चाल'
8
'किंग'मध्ये लेक सुहानाला ॲक्शनचे धडे देतोय शाहरुख खान, फराह खान म्हणाली...
9
Microsoft भारतात १७.५ बिलियन डॉलर्सची विक्रमी गुंतवणूक करणार, ठरणार आशियातील आतापर्यंतची सर्वात मोठी इनव्हेस्टमेंट
10
डेटिंग साईटवर परदेशी तरुणीच्या प्रेमात पडला, भरपूर पैसा खर्च केला अन् अचानक 'ती' दिसली समोर! नंतर जे झालं..
11
वार्षिक राशीभविष्य २०२६: संपत्ती, करिअर आणि कौटुंबिक जीवनात कोणत्या राशींना मिळणार मोठे यश?
12
Accident: वैष्णोदेवीचं दर्शन घेऊन पुढं निघाले, पण वाटेतच...; भीषण अपघातात ३ ठार, २८ जखमी
13
भीषण अपघात! कंटेनरच्या धडकेत बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडचे चार जवान शहीद; श्वान सुखरूप...
14
१ महिन्यापूर्वी बनला वडील, पैसे कमवायला गोव्यात आला; नाइट ड्युटीच्या पहिल्याच दिवशी जीव गमावला
15
भारतात का वाढतेय इन्फ्लुएंसर बनण्याची क्रेझ? यातील पैसा आणि आकडेवारी पाहून विश्वास नाही बसणार!
16
Meesho IPO Listing : स्वस्त सामान विकणाऱ्या 'मीशो'ची शेअर बाजारात तुफान एन्ट्री; ४५% प्रीमिअमवर लिस्टिंग, गुंतवणूकदार मालामाल
17
ताडोबातील दुसरी वाघीणही सह्याद्रीच्या कुशीत! 'टी ७- एस २' मादीचे चांदोली राष्ट्रीय उद्यानातील सोनारलीमध्ये 'सॉफ्ट रिलीज'
18
Shocking: लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधूनं मागितला घटस्फोट; कारण ऐकून दोन्ही कुटुंब हादरले!
19
CDF बनताच असीम मुनीर यांनी भारताविरोधात गरळ ओकली; तालिबानलाही धमकी, "तुमच्याकडे २ पर्याय..."
20
Leopard Attack: नागपुरात बिबट्याची दहशत! पारडी भागात पहाटे चौघांवर हल्ला; रेस्क्यू ऑपरेशन सुरू
Daily Top 2Weekly Top 5

लोकमान्य टिळक आठवणी आणि आख्यायिका या तीन खंडांचे प्रकाशन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 16:23 IST

लोकमान्यांचे पणतू शैलेश टिळक यांची विशेष उपस्थिती 

ठाणे : लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दी वर्षाचे औचित्य साधून लोकमान्य टिळक आठवणी आणि आख्यायिका या तीन खंडांचे प्रकाशन लोकमान्य टिळक यांचे पणतू शैलेश टिळक यांच्या हस्ते  वागळे इस्टेट येथील वास्तू रविराजच्या कार्यालयात झाले. ठाण्यातील परम मित्र प्रकाशनाने लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त या प्रकल्पाचे आयोजन केले आहे. 

लोकमान्य टिळक आठवणी आणि आख्यायिका हे तीन खंड वर्ष १९२३, १९२५ आणि १९२७ साली  प्रकाशित झाले होते. दैनिक केसरीत काम करणारे, लोकमान्य टिळक यांचे अनुयायी असलेल्या सदाशिव बापट यांनी त्यावेळी स्व-खर्चाने आणि विशेष परिश्रम आणि योजनेतून या तीन ग्रंथांची निर्मिती केली होती. या तीन खंडांना लोकमान्य टिळक यांचे सहकारी, ज्येष्ठ लेखक तात्यासाहेब केळकर यांची प्रस्तावना होती. तब्बल त्र्यांणव वर्षांनी या ग्रंथांची पुनर्निर्मिती परम मित्रने केली आहे. सुनिल कर्णिक यांनी या ग्रंथांचे संपादन केले आहे. ज्येष्ठ अभ्यासक, लेखक प्रा. सदानंद मोरे यांनी या तीन खंडांची प्रस्तावना लिहिली आहे. प्रत्येक खंड साधारण सहाशे पानांचा असून एकूण एकत्रित एक हजार आठशे पानांचा संदर्भपूर्ण दस्तावेज आहे. या तीन खंडाची मुखपृष्ठ ज्येष्ठ चित्रकार कै. गोपाळराव देऊस्कर तसेच, ख्यातनाम चित्रकार सुहास बहुलकर आणि युवा चित्रकार उदय पळसुलेदेसाई यांच्या चित्रातून साकारली आहेत. 

प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वास्तू रविराजचे संस्थापक डॉ. रविराज अहिरराव होते. ज्येष्ठ पत्रकार, लेखक, सामाजिक कार्यकर्ते अरुण करमरकर आणि सुप्रसिद्ध सनदी लेखापाल, संस्कृतचे अभ्यासक, रामायणाचे व्याख्याते चन्द्रशेखर वझे हे प्रमुख वक्ते होते. यावेळी व्यासपीठावर परम मित्र प्रकाशनाचे माधव जोशी उपस्थित होते. 

प्रकाशनानिमित्त बोलताना शैलेश टिळक म्हणाले, आजच्या पिढीला लोकमान्य समजून घेण्यासाठी हे खंड उपयोगी ठरतील. या खंडाच्या निमित्त लोकमान्य टिळक यांचे अष्टावधानी व्यक्तिमत्व समजून घेणे अधिक सोपे जाईल. तत्कालीन राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ आणि त्याचे महत्व लक्षात येईल. लोकमान्यांच्या स्मृतीशताब्दी निमित्त होणारा पहिला जाहीर कार्यक्रम आहे असे शैलेश टिळक यांनी सांगितले. प्रमुख वक्ते अरुण करमरकर यांनी त्यावेळी तात्यासाहेब केळकर यांची त्यावेळी लिहिलेली प्रस्तावना, तीन खंडांचे निर्माते सदाशिव बापट यांची भूमिका आणि लोकमान्य स्मृती शताब्दी वर्षाचे औचित्य साधून प्रकाशित झालेल्या तीन खंडांना प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी लिहिलेली प्रस्तावना यावर भाष्य केले. चंद्रशेखर वझे यांनी समयोचित भाषण केले. प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रविराज अहिरराव यांनी हे खंड लोकमान्य यांच्या कार्य-कर्तृत्वाचा जागर करणारे आहेत असे नमूद केले. खंड संपादक सुनील कर्णिक, मुद्रक आनंद लिमये यांच्यासह तीन खंडांचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा शैलेश टिळक यांच्या हसे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि प्रास्ताविक परम मित्रचे  माधव जोशी यांनी केले. आभार प्रदर्शन महेश वैद्य यांनी केले.

टॅग्स :Lokmanya Tilakलोकमान्य टिळक