शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

उल्हासनगरात २ ते १२ जुलै दरम्यान जनता कर्फ्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 21:31 IST

उल्हासनगरात कोरोना रुग्णाची संख्या २ हजारावर गेली असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिका आयुक्तांनी २ ते १२ जुलै दरम्यान जनता कर्फु जाहीर केले.

उल्हासनगर : शहरातील वाढती कोरोना च्या संख्येवर अंकुश ठेवण्यासाठी महापालिका आयुक्तांनी २ ते १२ जुलै दरम्यान जनता कर्फ्यु जाहीर केला. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहन त्यांनी करून मास्क विना बाहेर फिरणाऱ्या एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. 

उल्हासनगरात कोरोना रुग्णाची संख्या २ हजारावर गेली असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिका आयुक्तांनी २ ते १२ जुलै दरम्यान जनता कर्फु जाहीर केले. भाजीपाला, मटण, चिकन, फळे, दूध, बेकरी व जीवनावश्यक अन्नधान्याची दुकानें सकाळी ९ ते रात्री ९ वाजे पर्यंत सुरु राहतील. अन्नधान्य दुकानातून फक्त घरपोच धान्य वितरण करण्यात येणार आहे.

मेडिकल सकाळी ९ ते रात्री ९ वाजे पर्यंत, पीठ गिरणी, दारूचे दुकान सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत सुरु राहणार आहे. रेस्टॉरंट व होम किचन मधुन सकाळी १० ते रात्री १० वाजे पर्यंत होम डिलीव्हरी जेवण पुरविण्यात येणार आहे. रिक्षा, दुचाकी व चारचाकी गड्यासाठी नेहमीचे नियम राहणार असून नागरिकांना अत्यावश्यक कामा शिवाय बाहेर पडता येणार नाही. मास्क विना बाहेर फिरणाऱ्या एक हजार दंड आकारण्यात येणार आहे.

शहरातील कोरोनाची संख्या वाढत असल्याने विविध पक्षाच्या नेत्यासह व्यापारी संघटना, सामाजिक संस्था आदींनी महापालिका आयुक्तांकडे लॉक डाऊन ची मागणी केली होती.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे