शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

प्लास्टिक बंदीबाबत पालिकेने जनजागृती करावी , व्यापाऱ्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 01:16 IST

प्लास्टिक बंदीबाबत शहरातील व्यापाºयांच्या शिष्टमंडळाने महापौर मीना आयलानी, आयुक्त गणेश पाटील यांची भेट घेऊन जगजागृती करण्याचे आवाहन केले.

उल्हासनगर : प्लास्टिक बंदीबाबत शहरातील व्यापाºयांच्या शिष्टमंडळाने महापौर मीना आयलानी, आयुक्त गणेश पाटील यांची भेट घेऊन जगजागृती करण्याचे आवाहन केले.पालिका पथकाने प्लास्टिक बंदीच्या दोन दिवसात ४०जणांवर कारवाई करत अडीच लाखापेक्षा अधिक दंड वसूल केला. मात्र कोणत्या प्लास्टिकवर बंदी आहे याबाबतची माहिती पालिका अधिकारी, कर्मचारी व्यापाºयांना देत नसल्याने त्यांच्यात नाराजी पसरली आहे. शहरात प्लास्टिक पिशव्या बनवण्याचे व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनविण्याचे असंख्य कारखाने असून कोटयवधी रूपयांची उलाढाल होते. सरकारच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाने शहरातील अनेक कारखाने बंद पडून कामगार बेरोजगार होणार आहे. जीन्स कारखान्यापाठोपाठ प्लास्टिक कारखान्यांवर गंडांतर आल्याने शहराचा आर्थिक कणा तुटल्याची प्रतिक्रीया व्यापाºयांनी व्यक्त केली.यावेळी उपमहापौर जीवन इदनानी, माजी आमदार कुमार आयलानी आदी उपस्थित होते. प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीचे व्यापाºयांनी स्वागत केले. मात्र दंडात्मक कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली. कोणकोणत्या पिशव्या व साहित्यावर बंदी आहे याबाबतची माहिती नागरिकांसह व्यापाºयांना देत जनजागृती करावी, अशी विनंती शिष्टमंडळाने केली. महापालिका अधिकारी थेट दुकानात शिरून दंड आकारात असल्याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. बैठकीला शहरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘प्लास्टिक बंदीबाबत सहकार्य करावे’भिवंडी : प्लास्टिक बंदीमुळे नागरिक व व्यापाºयांना त्रास होत आहे. परंतु भविष्याच्यादृष्टीने ही आवश्यक असल्याने नागरिक व व्यापाºयांनी पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महापौर जावेद दळवी यांनी केले. प्लास्टिक बंदीच्यानिमित्ताने व्यापाºयांसाठी कार्यशाळा झाली. आयुक्त मनोहर हिरे, अतिरीक्त आयुक्त अशोक रणखांब, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कल्याण विभागाचे प्रादेशिक विभागीय अधिकारी धनंजय पाटील व सभागृह नेते प्रशांत लाड उपस्थित होते. आरोग्य विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी प्लास्टिक बंदीची माहिती दिली. रणखांब यांनीही मागदर्शन केले. आयुक्त मनोहर हिरे यांनी उपस्थित व्यापारी वर्गाच्या प्रश्नांना उत्तरे दिली. राज्य सरकारच्या निर्णयात पालिका बदल करू शकत नाही, असे हिरे म्हणाले. धनंजय पाटील यांनी माहिती दिली.दंड वसुली थांबवण्याची मुख्याधिकाºयांकडे केली मागणीअंबरनाथ : अंबरनाथमधील व्यापारी संघटनेने मुख्याधिकाºयांची भेट घेत प्लास्टिक विरोधातील दंड वसुलीवर चर्चा केली. दंडात्मक कारवाई करत असताना व्यापाºयांच्या भूमिकेचा विचार केला जात नाही असे मत यावेळी व्यक्त केले. प्लास्टिकला पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने त्याचा फटका व्यापाºयांना सहन करावा लागत असल्याचे मत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खानजी धल यांनी व्यक्त केले. धल यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी देविदास पवार यांची भेट घेतली. जोवर पर्याय उपलब्ध होत नाही. तोपर्यंत दंडात्मक कारवाई थांबविण्याची मागणी संघटनेने केली. मात्र यास मुख्याधिकारी पवार यांनी प्रशासनाची भूमिका मांडताना कारवाई थांबविता येणार नाही अशी भूमिका घेतली. त्यावर काही व्यापारी संतप्त झाले. सरकारचा निर्णय असल्याने त्याचे पालन करणे बंधनकारक असल्याचे मत प्रशासनाने व्यक्त केले. तर दुकानदारांनी प्रशासनाला आपले निवेदन दिले आणि आपली भूमिका सरकारपर्यंत पोहचविण्याची मागणी केली.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी