शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक बंदीबाबत पालिकेने जनजागृती करावी , व्यापाऱ्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 01:16 IST

प्लास्टिक बंदीबाबत शहरातील व्यापाºयांच्या शिष्टमंडळाने महापौर मीना आयलानी, आयुक्त गणेश पाटील यांची भेट घेऊन जगजागृती करण्याचे आवाहन केले.

उल्हासनगर : प्लास्टिक बंदीबाबत शहरातील व्यापाºयांच्या शिष्टमंडळाने महापौर मीना आयलानी, आयुक्त गणेश पाटील यांची भेट घेऊन जगजागृती करण्याचे आवाहन केले.पालिका पथकाने प्लास्टिक बंदीच्या दोन दिवसात ४०जणांवर कारवाई करत अडीच लाखापेक्षा अधिक दंड वसूल केला. मात्र कोणत्या प्लास्टिकवर बंदी आहे याबाबतची माहिती पालिका अधिकारी, कर्मचारी व्यापाºयांना देत नसल्याने त्यांच्यात नाराजी पसरली आहे. शहरात प्लास्टिक पिशव्या बनवण्याचे व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनविण्याचे असंख्य कारखाने असून कोटयवधी रूपयांची उलाढाल होते. सरकारच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाने शहरातील अनेक कारखाने बंद पडून कामगार बेरोजगार होणार आहे. जीन्स कारखान्यापाठोपाठ प्लास्टिक कारखान्यांवर गंडांतर आल्याने शहराचा आर्थिक कणा तुटल्याची प्रतिक्रीया व्यापाºयांनी व्यक्त केली.यावेळी उपमहापौर जीवन इदनानी, माजी आमदार कुमार आयलानी आदी उपस्थित होते. प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीचे व्यापाºयांनी स्वागत केले. मात्र दंडात्मक कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली. कोणकोणत्या पिशव्या व साहित्यावर बंदी आहे याबाबतची माहिती नागरिकांसह व्यापाºयांना देत जनजागृती करावी, अशी विनंती शिष्टमंडळाने केली. महापालिका अधिकारी थेट दुकानात शिरून दंड आकारात असल्याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. बैठकीला शहरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘प्लास्टिक बंदीबाबत सहकार्य करावे’भिवंडी : प्लास्टिक बंदीमुळे नागरिक व व्यापाºयांना त्रास होत आहे. परंतु भविष्याच्यादृष्टीने ही आवश्यक असल्याने नागरिक व व्यापाºयांनी पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महापौर जावेद दळवी यांनी केले. प्लास्टिक बंदीच्यानिमित्ताने व्यापाºयांसाठी कार्यशाळा झाली. आयुक्त मनोहर हिरे, अतिरीक्त आयुक्त अशोक रणखांब, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कल्याण विभागाचे प्रादेशिक विभागीय अधिकारी धनंजय पाटील व सभागृह नेते प्रशांत लाड उपस्थित होते. आरोग्य विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी प्लास्टिक बंदीची माहिती दिली. रणखांब यांनीही मागदर्शन केले. आयुक्त मनोहर हिरे यांनी उपस्थित व्यापारी वर्गाच्या प्रश्नांना उत्तरे दिली. राज्य सरकारच्या निर्णयात पालिका बदल करू शकत नाही, असे हिरे म्हणाले. धनंजय पाटील यांनी माहिती दिली.दंड वसुली थांबवण्याची मुख्याधिकाºयांकडे केली मागणीअंबरनाथ : अंबरनाथमधील व्यापारी संघटनेने मुख्याधिकाºयांची भेट घेत प्लास्टिक विरोधातील दंड वसुलीवर चर्चा केली. दंडात्मक कारवाई करत असताना व्यापाºयांच्या भूमिकेचा विचार केला जात नाही असे मत यावेळी व्यक्त केले. प्लास्टिकला पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने त्याचा फटका व्यापाºयांना सहन करावा लागत असल्याचे मत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खानजी धल यांनी व्यक्त केले. धल यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी देविदास पवार यांची भेट घेतली. जोवर पर्याय उपलब्ध होत नाही. तोपर्यंत दंडात्मक कारवाई थांबविण्याची मागणी संघटनेने केली. मात्र यास मुख्याधिकारी पवार यांनी प्रशासनाची भूमिका मांडताना कारवाई थांबविता येणार नाही अशी भूमिका घेतली. त्यावर काही व्यापारी संतप्त झाले. सरकारचा निर्णय असल्याने त्याचे पालन करणे बंधनकारक असल्याचे मत प्रशासनाने व्यक्त केले. तर दुकानदारांनी प्रशासनाला आपले निवेदन दिले आणि आपली भूमिका सरकारपर्यंत पोहचविण्याची मागणी केली.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी