शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक बंदीबाबत पालिकेने जनजागृती करावी , व्यापाऱ्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 01:16 IST

प्लास्टिक बंदीबाबत शहरातील व्यापाºयांच्या शिष्टमंडळाने महापौर मीना आयलानी, आयुक्त गणेश पाटील यांची भेट घेऊन जगजागृती करण्याचे आवाहन केले.

उल्हासनगर : प्लास्टिक बंदीबाबत शहरातील व्यापाºयांच्या शिष्टमंडळाने महापौर मीना आयलानी, आयुक्त गणेश पाटील यांची भेट घेऊन जगजागृती करण्याचे आवाहन केले.पालिका पथकाने प्लास्टिक बंदीच्या दोन दिवसात ४०जणांवर कारवाई करत अडीच लाखापेक्षा अधिक दंड वसूल केला. मात्र कोणत्या प्लास्टिकवर बंदी आहे याबाबतची माहिती पालिका अधिकारी, कर्मचारी व्यापाºयांना देत नसल्याने त्यांच्यात नाराजी पसरली आहे. शहरात प्लास्टिक पिशव्या बनवण्याचे व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनविण्याचे असंख्य कारखाने असून कोटयवधी रूपयांची उलाढाल होते. सरकारच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाने शहरातील अनेक कारखाने बंद पडून कामगार बेरोजगार होणार आहे. जीन्स कारखान्यापाठोपाठ प्लास्टिक कारखान्यांवर गंडांतर आल्याने शहराचा आर्थिक कणा तुटल्याची प्रतिक्रीया व्यापाºयांनी व्यक्त केली.यावेळी उपमहापौर जीवन इदनानी, माजी आमदार कुमार आयलानी आदी उपस्थित होते. प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीचे व्यापाºयांनी स्वागत केले. मात्र दंडात्मक कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली. कोणकोणत्या पिशव्या व साहित्यावर बंदी आहे याबाबतची माहिती नागरिकांसह व्यापाºयांना देत जनजागृती करावी, अशी विनंती शिष्टमंडळाने केली. महापालिका अधिकारी थेट दुकानात शिरून दंड आकारात असल्याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. बैठकीला शहरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘प्लास्टिक बंदीबाबत सहकार्य करावे’भिवंडी : प्लास्टिक बंदीमुळे नागरिक व व्यापाºयांना त्रास होत आहे. परंतु भविष्याच्यादृष्टीने ही आवश्यक असल्याने नागरिक व व्यापाºयांनी पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महापौर जावेद दळवी यांनी केले. प्लास्टिक बंदीच्यानिमित्ताने व्यापाºयांसाठी कार्यशाळा झाली. आयुक्त मनोहर हिरे, अतिरीक्त आयुक्त अशोक रणखांब, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कल्याण विभागाचे प्रादेशिक विभागीय अधिकारी धनंजय पाटील व सभागृह नेते प्रशांत लाड उपस्थित होते. आरोग्य विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी प्लास्टिक बंदीची माहिती दिली. रणखांब यांनीही मागदर्शन केले. आयुक्त मनोहर हिरे यांनी उपस्थित व्यापारी वर्गाच्या प्रश्नांना उत्तरे दिली. राज्य सरकारच्या निर्णयात पालिका बदल करू शकत नाही, असे हिरे म्हणाले. धनंजय पाटील यांनी माहिती दिली.दंड वसुली थांबवण्याची मुख्याधिकाºयांकडे केली मागणीअंबरनाथ : अंबरनाथमधील व्यापारी संघटनेने मुख्याधिकाºयांची भेट घेत प्लास्टिक विरोधातील दंड वसुलीवर चर्चा केली. दंडात्मक कारवाई करत असताना व्यापाºयांच्या भूमिकेचा विचार केला जात नाही असे मत यावेळी व्यक्त केले. प्लास्टिकला पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने त्याचा फटका व्यापाºयांना सहन करावा लागत असल्याचे मत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खानजी धल यांनी व्यक्त केले. धल यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी देविदास पवार यांची भेट घेतली. जोवर पर्याय उपलब्ध होत नाही. तोपर्यंत दंडात्मक कारवाई थांबविण्याची मागणी संघटनेने केली. मात्र यास मुख्याधिकारी पवार यांनी प्रशासनाची भूमिका मांडताना कारवाई थांबविता येणार नाही अशी भूमिका घेतली. त्यावर काही व्यापारी संतप्त झाले. सरकारचा निर्णय असल्याने त्याचे पालन करणे बंधनकारक असल्याचे मत प्रशासनाने व्यक्त केले. तर दुकानदारांनी प्रशासनाला आपले निवेदन दिले आणि आपली भूमिका सरकारपर्यंत पोहचविण्याची मागणी केली.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी