शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

प्रांत आदेशाची अंमलबजावणी नाही

By admin | Updated: December 28, 2015 02:27 IST

२७ गावांतील मौजे दावडी आणि सोनारपाडा गावच्या कुळ शेतकऱ्यांच्या जमिनींचे बोगस फेरफारद्वारा झालेले बनावट हस्तांतरण प्रकरण पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे.

अरविंद म्हात्रे, चिकणघर२७ गावांतील मौजे दावडी आणि सोनारपाडा गावच्या कुळ शेतकऱ्यांच्या जमिनींचे बोगस फेरफारद्वारा झालेले बनावट हस्तांतरण प्रकरण पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे. यामुळे कल्याण तहसील कार्यालय संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचे चित्र आहे.कल्याण तहसील कार्यालयांतर्गत २७ गावातील दावडी आणि सोनारपाडा येथील कूळ शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूमाफीयांनी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना हाताशी धरून दि. १६ जाने २०१२ रोजीच्या ४६२, ४६३ या दोन फेरफारद्वारा बोगस हस्तांतरण घडवून आणले होते. शेतकऱ्यांच्या तक्रारी नंतर कल्याणचे प्रांत अधिकारी धनंजय सावळकर यांनी चौकशीअंती ५६० या नव्या फेरफारद्वारा (१४.०८.२०१४) ४६२,४६३ हे बनावट फेरफार रद्द ठरवून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६च्या कलम ८५, ८७ व १४९ तसेच मुंबई कूळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८चे कलम ८८ (ब)(२) व तुकडेबंदी कायद्यातील तरतूदीनुसार सदर जमीन सरकारजमा करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार किरण सुरवसे यांना दिले होते. (आॅगस्ट २०१४) मात्र यानंतर ६० दिवसांनी तरी अद्याप काहीच कारवाई झालेली नसल्याने तक्रारदार शेतकरी गणेश म्हात्रे यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसेंची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे. प्रांताच्या आदेशाला तहसीलदार कार्यालयाने अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडून तात्पुरती स्थगिती आणली मात्र स्थगितीची मुदत संपली असूनही अद्याप कारवाई नाही. यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन त्वरित होणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नसल्याने ४९० दिवसानंतरही कारवाई झाली नाही.गत पाच वर्षात १५ जण (तहसीलचे) ट्रॅप झाले. यामुळेही तहसीलदारांचा कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याचे समोर आले.विशेष म्हणजे या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन तत्कालीन आ. नितीन सरदेसाई, रमेश पाटील, आ. दौलत दरोडा यांनी याप्रकरणी तारांकित प्रश्न (४००५)उपस्थित करून चर्चा घडवून आणली होती. त्यावेळी या प्रश्नाचे उत्तर असा प्रकार घडलाच नसल्याचे देऊन सभागृहाची दिशाभूल करण्यात आली. कारण कल्याण तहसीलदार किरण सुरवसे यांनी दिलेल्या अहवालाचे वाचन मंत्र्यांनी केला. कारण हा प्रकार झालाच नाही मग ते ४६२,४६३ फेरफार रद्द का केला आहे या प्रकरणामुळे कल्याण तहसील कार्यालय संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.