शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

प्रांत आदेशाची अंमलबजावणी नाही

By admin | Updated: December 28, 2015 02:27 IST

२७ गावांतील मौजे दावडी आणि सोनारपाडा गावच्या कुळ शेतकऱ्यांच्या जमिनींचे बोगस फेरफारद्वारा झालेले बनावट हस्तांतरण प्रकरण पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे.

अरविंद म्हात्रे, चिकणघर२७ गावांतील मौजे दावडी आणि सोनारपाडा गावच्या कुळ शेतकऱ्यांच्या जमिनींचे बोगस फेरफारद्वारा झालेले बनावट हस्तांतरण प्रकरण पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे. यामुळे कल्याण तहसील कार्यालय संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचे चित्र आहे.कल्याण तहसील कार्यालयांतर्गत २७ गावातील दावडी आणि सोनारपाडा येथील कूळ शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूमाफीयांनी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना हाताशी धरून दि. १६ जाने २०१२ रोजीच्या ४६२, ४६३ या दोन फेरफारद्वारा बोगस हस्तांतरण घडवून आणले होते. शेतकऱ्यांच्या तक्रारी नंतर कल्याणचे प्रांत अधिकारी धनंजय सावळकर यांनी चौकशीअंती ५६० या नव्या फेरफारद्वारा (१४.०८.२०१४) ४६२,४६३ हे बनावट फेरफार रद्द ठरवून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६च्या कलम ८५, ८७ व १४९ तसेच मुंबई कूळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८चे कलम ८८ (ब)(२) व तुकडेबंदी कायद्यातील तरतूदीनुसार सदर जमीन सरकारजमा करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार किरण सुरवसे यांना दिले होते. (आॅगस्ट २०१४) मात्र यानंतर ६० दिवसांनी तरी अद्याप काहीच कारवाई झालेली नसल्याने तक्रारदार शेतकरी गणेश म्हात्रे यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसेंची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे. प्रांताच्या आदेशाला तहसीलदार कार्यालयाने अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडून तात्पुरती स्थगिती आणली मात्र स्थगितीची मुदत संपली असूनही अद्याप कारवाई नाही. यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन त्वरित होणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नसल्याने ४९० दिवसानंतरही कारवाई झाली नाही.गत पाच वर्षात १५ जण (तहसीलचे) ट्रॅप झाले. यामुळेही तहसीलदारांचा कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याचे समोर आले.विशेष म्हणजे या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन तत्कालीन आ. नितीन सरदेसाई, रमेश पाटील, आ. दौलत दरोडा यांनी याप्रकरणी तारांकित प्रश्न (४००५)उपस्थित करून चर्चा घडवून आणली होती. त्यावेळी या प्रश्नाचे उत्तर असा प्रकार घडलाच नसल्याचे देऊन सभागृहाची दिशाभूल करण्यात आली. कारण कल्याण तहसीलदार किरण सुरवसे यांनी दिलेल्या अहवालाचे वाचन मंत्र्यांनी केला. कारण हा प्रकार झालाच नाही मग ते ४६२,४६३ फेरफार रद्द का केला आहे या प्रकरणामुळे कल्याण तहसील कार्यालय संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.